शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 29, 2014 23:24 IST

राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे दौंडच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे भिमनगर परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दौंड : राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे दौंडच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे भिमनगर परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचरा डेपोची विल्हेवाट लावावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या परिसरातील रहिवाशांनी दिला आहे. दौंड -सिद्धटेक रोडलगतच हा मोठ्या स्वरुपाचा कचरा डेपो आहे. येथून मोठी दूर्गंधी येते. श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे जाण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. मात्र, या दूर्गंधीमुळे नाक मुठीत धलन प्रवास करावा लागतो. रस्त्याच्या कडेलाच कचरा डेपोचे डोंगर असल्याने याठिकाणी जनावरांचा वावर असतो. कचरा रस्त्यावरही येतो. तसेच शहरात आणि रस्त्यावर मेलेली जनावरे याच ठिकाणी आणून टाकतात. यामुळे भिमनगरचे रहिवाशी तसेच सद्धटेकला जाणारे भाविक त्रस्त झालेले आहेत. याच परिसरात विद्यालय असून भिमनगरची वस्ती गजबजलेली असते. या भागातील न्नागरीकांना यामुळे आजारही झडू लागले आहेत. येथे डेंग्युचा रुग्ण देखील आढळला होता. ४यासंदर्भात माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले की, दौंडच्या कचरा डेपोसाठी पर्यायी जागा मिळावी म्हणून राज्य शासनाकडे मी नगराध्यक्ष असताना वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे दौंडच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र यातून काहीतरी चांगला मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कटारिया म्हणाले. ४मुख्याधिकारी शिवाजी कापरे म्हणाले की, कचरा डेपोसाठी पर्यायी जागा मेरगळवाडी परिसरात बघितली होती, मात्र सदरची जागा वनखात्याची असल्याने यासंदर्भात भोपाळ येथील वनखात्याच्या मुख्य कार्यालयाकडे त्याचबरोबरीने केंद्र शासनाकडे याचा पाठपुरावा लवकरच नगर परिषद करणार आहे.