शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंची घंटागाडी ठरतेय शोभेची वस्तू

By admin | Updated: May 31, 2017 01:34 IST

परिसरात आलेल्या कारखानदारीमुळे अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या वराळेत कचऱ्याची समस्या बिकट होत आहे. गावातील कचरा

लोकमत न्यूज नेटवर्कआंबेठाण : परिसरात आलेल्या कारखानदारीमुळे अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या वराळेत कचऱ्याची समस्या बिकट होत आहे. गावातील कचरा उचलण्यासाठी मंजूर होऊन आलेली घंटागाडी सुरू होण्याआधीच अखेरच्या घटका मोजू लागली आहे. या गाडीचा वापर होत नसल्याने ती गंजू लागली आहे. कचरा उचलला जात नसल्यामुळे गावात कचऱ्याचे ढीग साचले आहे. याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. काँर्निंग इंडिया, सिंड्रेल, महिंद्रा यासह अनेक लहान मोठ्या कंपन्या वराळे गावाच्या परिसरात आल्या आहेत; त्यामुळे गावचे नागरिकीकरण वाढले आहे. परंतु या वाढत्या नागरिकीकरणाला सेवा देण्यास ग्रामपंचायत अपयशी ठरत आहे. कचऱ्याच्या समस्येने तर गावाला वेढले आहे. उद्योगांमुळे गावात बाहेरील नागरिक कामानिमित्त आले आहेत. यामुळे पायाभूत सुविधांवरील भार वाढला आहे. गावाची कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सुरेखा ठाकर यांनी त्यांच्या निधीतून एक घंटागाडी मंजूर केली होती. परंतु ही गाडी गावात आल्यापासून एकाच जागी उभी आहे. नवी कोरी गाडी येथील प्राथमिक शाळेच्या आवारात एका कोपऱ्यात उभी आहे. तीचा वापरच होत नसल्याने तिला गंज चढतो आहे. यामूळे ही गाडी खराब होण्याच्या मार्गावर आहे. गाडीवर फक्त जाहिरातबाजी होत आहे. गाडीला नंबर फ्लेटही नाही. त्यामुळे ही घंटागाडी गावासाठी केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. कचरा पेटवल्याने धुराचे लोट : आरोग्य धोक्यातसाठलेला कचरा कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे धुराचे लोट तयार होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेक वेळा त्यात ओला कचरा असल्याने त्याची दुर्गंधी सुटत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने यासाठी सिमेंटच्या कचरा कुंड्या आणल्या आहेत. परंत कचरा त्यात टाकण्याऐवजी आजुबाजुलाच टाकत आहेत. वाढत्या कचऱ्याच्या खाद्य पदार्थावर जगणाऱ्या घुशी आणि भटक्या कुत्र्यांचे मात्र चांगले फावले आहे. या मोठमोठ्या घुशींचा त्रास मात्र गावातील नागरिकांना भोगावा लागत आहे. तसेच काही ठिकाणी भटक्या कुत्र्यांपासून वाटसरूंना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. गावातील कचऱ्याचे वाढते साम्राज्य आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास याचा विचार करून अडगळीत पडलेली आणि कचरा जमा करणारी घंटागाडी गाडी बाहेर काढून तिचा वापर करावा आणि नागरिकांना सेवा द्यावी.