शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

कच-याचे वर्गीकरण कोलमडले, कर्मचारी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:13 IST

ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला त्यात यश मिळनासे झाले आहे

पुणे : ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला त्यात यश मिळनासे झाले आहे. त्यासाठी उभ्या केलेल्या सर्व शेड बंद पडल्या असून नागरिकांमध्ये जागृती करणेही आता थांबले आहे. त्यामुळे कचरा डंप करण्याचे प्रमाण वाढले असून त्या-त्या परिसरातील नागरिकांचा त्याला विरोध सुरू झाला आहे. उभे केलेले प्रकल्प कालांतराने पुरेशा क्षमतेने चालत नाहीत, असे लक्षात आल्यामुळे महापालिका प्रशासनाने असे लहान प्रकल्प उभे करण्याचे थांबवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.कचरा प्रक्रिया प्रकल्पांना ओला व सुका कचरा वेगवेगळा लागतो. ओल्या कचºयापासून खत, गॅस तयार करण्यात येतो. त्यापासून वीज तयार करण्यात येते. तर सुक्या कचºयाचे रिसायकलिंग केले जाते. त्यातील उपयोगात येऊ शकणाºया वस्तूंचा उपयोग केला जातो. उर्वरत कचरा डंपिंग करण्यासाठी म्हणजे फुरसंगी, उरुळी देवाची येथील प्रकल्पांवर पाठवण्यात येतो. तिथे तो जमिनीत जिरवला जातो. ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळाला तर कचरा व्यवस्थापनाची ही सर्व प्रक्रिया सुलभ होते, त्यामुळे पालिकेने गेली काही वर्षे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळण्यासाठी अनेक प्रयत्न केले.स्वच्छ या खासगी संस्थेचे त्यासाठी सहकार्य घेण्यात येत आहे. अन्य काही संस्थांही यात सहभागी आहेत. या संस्थांच्या कर्मचाºयांनी घरोघर जाऊन कचरा जमा केला जातो. नागरिकांनी त्यांच्याकडे ओला व सुका कचरा घरातच वेगळा करून द्यावा यासाठी महापालिकेच्या प्रबोधन मोहिम राबवण्यात येते. मात्र तिचा जोर आता कमी पडला आहे. त्यासाठी कचरा जमा करणाºया वाहनांमधून ध्वनीवर्धकांवर वाजवली जाणारी गाणीही बंद पडली आहेत.त्यामुळे महापालिकेकडे सध्या मिश्र कचराच जमा होत आहे. स्वच्छ संस्थेचे कर्मचारी कचरा फक्त जमा करतात. त्यांनी जमा केलेल्या कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी महापालिकेने काही कायम स्वच्छता कर्मचाºयांची नियुक्ती केली. त्यासाठी शहरात अनेक ठिकाणी शेड बांधण्यात आल्या. या शेडमधून कचरा वर्ग करून नंतर तो कचरा वाहून नेला जात असे. वाहनांच्या अपुºया संख्येमुळे आता हेही काम होत नाही. त्यामुळे जमा झालेला सर्व कचरा आहे त्या वाहनांमधून डंपिग ग्राऊंडकडे नेण्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही.शहरात रोज साधारण १५०० टन कचरा जमा होत असतो. तो वर्गीकरण करूनच जमा होणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र निम्म्यापेक्षा जास्त कचरा मिश्र स्वरूपातच जमा होत आहे. वर्गीकरण झालेला कचरा सामावून घेईल व त्यावर प्रक्रिया केली जाईल, अशी महापालिकेच्या प्रकल्पांची क्षमता राहिलेली नाही. मिश्र कचºयाचा वापर केला तर प्रकल्पांमधील यंत्रसामग्री नादुरूस्त होते. असे वारंवार होत गेल्यास प्रकल्पाची क्षमता कमी होते. त्यामुळे प्रकल्पांकडून शक्यतो मिश्र कचरा स्वीकारलाच जात नाही. शिल्लक कचरा व असा नाकारला गेलेला कचरा दोन्हीची रवानगी अखेरीस डंपिंग ग्राऊंडवर केली जाते.