शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कच-याचे वर्गीकरण कोलमडले, कर्मचारी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:13 IST

ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला त्यात यश मिळनासे झाले आहे

पुणे : ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला त्यात यश मिळनासे झाले आहे. त्यासाठी उभ्या केलेल्या सर्व शेड बंद पडल्या असून नागरिकांमध्ये जागृती करणेही आता थांबले आहे. त्यामुळे कचरा डंप करण्याचे प्रमाण वाढले असून त्या-त्या परिसरातील नागरिकांचा त्याला विरोध सुरू झाला आहे. उभे केलेले प्रकल्प कालांतराने पुरेशा क्षमतेने चालत नाहीत, असे लक्षात आल्यामुळे महापालिका प्रशासनाने असे लहान प्रकल्प उभे करण्याचे थांबवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.कचरा प्रक्रिया प्रकल्पांना ओला व सुका कचरा वेगवेगळा लागतो. ओल्या कचºयापासून खत, गॅस तयार करण्यात येतो. त्यापासून वीज तयार करण्यात येते. तर सुक्या कचºयाचे रिसायकलिंग केले जाते. त्यातील उपयोगात येऊ शकणाºया वस्तूंचा उपयोग केला जातो. उर्वरत कचरा डंपिंग करण्यासाठी म्हणजे फुरसंगी, उरुळी देवाची येथील प्रकल्पांवर पाठवण्यात येतो. तिथे तो जमिनीत जिरवला जातो. ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळाला तर कचरा व्यवस्थापनाची ही सर्व प्रक्रिया सुलभ होते, त्यामुळे पालिकेने गेली काही वर्षे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळण्यासाठी अनेक प्रयत्न केले.स्वच्छ या खासगी संस्थेचे त्यासाठी सहकार्य घेण्यात येत आहे. अन्य काही संस्थांही यात सहभागी आहेत. या संस्थांच्या कर्मचाºयांनी घरोघर जाऊन कचरा जमा केला जातो. नागरिकांनी त्यांच्याकडे ओला व सुका कचरा घरातच वेगळा करून द्यावा यासाठी महापालिकेच्या प्रबोधन मोहिम राबवण्यात येते. मात्र तिचा जोर आता कमी पडला आहे. त्यासाठी कचरा जमा करणाºया वाहनांमधून ध्वनीवर्धकांवर वाजवली जाणारी गाणीही बंद पडली आहेत.त्यामुळे महापालिकेकडे सध्या मिश्र कचराच जमा होत आहे. स्वच्छ संस्थेचे कर्मचारी कचरा फक्त जमा करतात. त्यांनी जमा केलेल्या कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी महापालिकेने काही कायम स्वच्छता कर्मचाºयांची नियुक्ती केली. त्यासाठी शहरात अनेक ठिकाणी शेड बांधण्यात आल्या. या शेडमधून कचरा वर्ग करून नंतर तो कचरा वाहून नेला जात असे. वाहनांच्या अपुºया संख्येमुळे आता हेही काम होत नाही. त्यामुळे जमा झालेला सर्व कचरा आहे त्या वाहनांमधून डंपिग ग्राऊंडकडे नेण्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही.शहरात रोज साधारण १५०० टन कचरा जमा होत असतो. तो वर्गीकरण करूनच जमा होणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र निम्म्यापेक्षा जास्त कचरा मिश्र स्वरूपातच जमा होत आहे. वर्गीकरण झालेला कचरा सामावून घेईल व त्यावर प्रक्रिया केली जाईल, अशी महापालिकेच्या प्रकल्पांची क्षमता राहिलेली नाही. मिश्र कचºयाचा वापर केला तर प्रकल्पांमधील यंत्रसामग्री नादुरूस्त होते. असे वारंवार होत गेल्यास प्रकल्पाची क्षमता कमी होते. त्यामुळे प्रकल्पांकडून शक्यतो मिश्र कचरा स्वीकारलाच जात नाही. शिल्लक कचरा व असा नाकारला गेलेला कचरा दोन्हीची रवानगी अखेरीस डंपिंग ग्राऊंडवर केली जाते.