शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

गारपीट रकमेत गैरव्यवहार

By admin | Updated: February 2, 2016 01:09 IST

मार्च २०१४ मध्ये गारपिटीमध्ये लासुर्णे (ता. इंदापूर) गावात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शासनाने या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला

लासुर्णे : मार्च २०१४ मध्ये गारपिटीमध्ये लासुर्णे (ता. इंदापूर) गावात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शासनाने या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला. परंतु, लासुर्णे गावात या गारपिटीच्या नुकसानभरपाईच्या मदतीत गैरव्यवहार झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. लासुर्णेतील आरटीआय कार्यकर्ते पंकज निंबाळकर यांनी इंदापूरच्या तहसीलदारांकडे सबळ पुराव्यासह प्रकरण २२ मे २०१५ रोजी दाखल केले. आठ महिने उलटले तरीही गारपीट नुकसानभरपाईच्या गैरव्यवहारातील अधिकारी मोकाट आहेत. इंदापूरचे तहसीलदार चौकशीसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते निंबाळकर यांनी केला आहे. येथील गावात गारपिटीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. गारपिटीच्या नुकसानभरपाईच्या मदतीत गैरव्यवहार केल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. यामध्ये शासकीय नियमानुसार हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात येते. अनेकांना ३० गुंठे क्षेत्राला ४५ ते ४८ हजार रुपये मदत म्हणून वाटण्यात आले. आठ ‘अ’ क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर वाटप केले गेले आहे. पंचनामे करताना भुसार पिकाऐवजी फळबागा दाखविल्या गेल्या. खरे नुकसान झाल्ोल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच दिली गेली नाही. काही शेतकऱ्यांना एकाच पिकासाठी दोन वेळा नुकसानभरपाई दिली गेली. या पंचनाम्याची कोठेही आवक-­जावकची नोंद दिसून येत नाही. काही शेतकऱ्यांची नमूद केलेली खाती नसतानाही नुकसानभरपाई काढली गेली आहे. तलाठी व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मदतीत गैरव्यवहार झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे,असा निंबाळकर यांचा आरोप आहे. तक्रार करूनही भरपाईच्या वाटपात गैरव्यवहार करणारे कर्मचारी मोकाट आहेत.