शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

एफआरपीवरून साखर कारखानदारीत मतभेदांची दरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : साखर उद्योगासमोर केंद्र सरकारच्या धोरणामुळे पेच उभा राहिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यांनी द्यायची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : साखर उद्योगासमोर केंद्र सरकारच्या धोरणामुळे पेच उभा राहिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यांनी द्यायची उसाची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) एकरकमी द्यायची की तीन हप्त्यांमध्ये, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकरकमी दिल्याने कारखान्यांवर कर्जाचा बोजा वाढत असून, शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. त्यांना एकरकमीच रक्कम हवी आहे.

केंद्र सरकारच्या निती आयोगाने हा मुद्दा उपस्थित केला आहे. सहकारी साखर कारखान्यांची स्थापना सुरू होऊन ६० वर्षे झाली तरीही हा उद्योग अजून स्वबळावर उभा राहिलेला नाही. दरवर्षी त्याला केंद्र तसेच राज्य सरकारच्या आर्थिक कुबड्या द्याव्या लागतात. त्यातून निती आयोगाने हा मुद्दा पुढे आणला आहे, असे या क्षेत्रात बोलले जाते.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याने दिलेल्या उसाचे एकरकमी पैसे कारखान्याला द्यावे लागतात. त्या तुलनेत या उसापासून तयार झालेली साखर विकली जात नाही. त्यामुळे त्या साखरेवर कर्ज काढून कारखान्याला कोट्यवधी रुपये द्यावे लागतात. दिले नाहीत तर संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाते.

यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून निती आयोगाने एफआरपीची रक्कम एकरकमी न देता तीन हप्त्यांत द्यावी, असा उपाय केंद्र सरकारला सुचवला आहे. केद्र सरकारने निर्णय घेण्याआधी राज्यांचे मत मागवले आहे. त्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे.

बहुसंख्य कारखानदारांनी याला मान्यता द्यावी असे सुचवले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मात्र याला विरोध आहे. संघटनांच्या माध्यमातून तो व्यक्त होतो आहे. केंद्र सरकारला याबाबतचे मत कळवण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली. मात्र, त्यात कारखानदारांचेच प्रतिनिधी व साखर चळवळीशी संबंधित नसलेल्यांचा भरणा असल्याची टीका होत आहे.