शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

गुंजवणी धरण ५५.१७ टक्के भरले

By admin | Updated: July 21, 2014 04:04 IST

वेल्हे तालुक्यात या वर्षी १५ जुलैपर्यंत पाऊस न झाल्याने तालुक्यातील शेतीवर परिणाम झाला असून, भातपिकासह इतर पिकांचे उत्पादनदेखील घटणार आहे.

मार्गासनी : वेल्हे तालुक्यात या वर्षी १५ जुलैपर्यंत पाऊस न झाल्याने तालुक्यातील शेतीवर परिणाम झाला असून, भातपिकासह इतर पिकांचे उत्पादनदेखील घटणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाने उशीर केला असून, या पावसामुळे भातलावण्या रखडल्या आहेत. साधारणत: सात जूनला वेल्ह्यात पाऊस पडतो. या वर्षी वेल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाताचे बियाणे पेरले होते. सुरुवातीला पाऊस झाल्याने भातरोपे जोमात आली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने ही भातरोपे जळाली. यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. तालुक्यात मागील वर्षी (२०१३) जुलैअखेर ९० टक्के शेतकऱ्यांनी भातलावणी केली होती. पण या वर्षी मात्र १५ ते २० टक्केच भाताची लावणी झाली आहे. तालुक्यातील पासली व गुंजवणी धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने गुंजवणी धरण ५५.१७ धरण भरले आहे. तर याच परिसरात सध्या भातलावणी सुरू आहे तर वेल्हे, पाबे, दापोडे, मार्गासनी परिसरात भातरोपे लहान असल्याने तसेच पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणी शेतात साठले नाही. त्यामुळे या परिसरातील भातलावणी रखडली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त पाऊस वेल्ह्यात पडतो. पण या वर्षी २० जुलैपर्यंत ५५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. (वार्ताहर)