शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गणेशोत्सव यंदाही मंगलमय ठरेल

By admin | Updated: April 24, 2017 05:12 IST

भारतीय समाजमनामध्ये उत्सवांचे स्थान महत्त्वाचे असून, गणेशोत्सवही तेवढ्याच धार्मिकतेने आणि उत्साहात साजरा केला जातो.

पुणे : भारतीय समाजमनामध्ये उत्सवांचे स्थान महत्त्वाचे असून, गणेशोत्सवही तेवढ्याच धार्मिकतेने आणि उत्साहात साजरा केला जातो. पुण्यातल्या गणेशोत्सवाचे वेगळे महत्त्व असून, यंदाही हा उत्सव तेवढ्याच मंगलमय वातावरणात साजारा होईल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाच्या देखाव्याच्या कामाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. यंदा मंडळाकडून ब्रहस्पती मंदिराचा देखावा उभा करण्यात येणार आहे. या वेळी महापौर मुक्ता टिळक, पं. वसंतराव गाडगीळ, नगरसेवक हेमंत रासने, दगडूशेठ हलवाई मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे, माणिकराव चव्हाण, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.बापट म्हणाले, गणेशोत्सवादरम्यान शहरातील मंडळांकडून रक्तदान, आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. समाजोपयोगी कामांमुळे गणेश मंडळांची समाजाशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे सामाजिक एकोपा वाढलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावता येतो. रात्री उशिरापर्यंत स्पीकर सुरू ठेवल्याने इतर लोकांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. हा त्रास टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ही बंधने घातली आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन करून अतिशय शिस्तबद्धरीत्या यंदाचा गणेशोत्सव कार्यकर्ते साजरा करतील असा विश्वास असल्याचे ते म्हणाले. सर्व शुभचिन्हांचा या देखाव्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.