शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राभिमान जागविण्याचे काम गणेशोत्सवाने केले : डॉ.सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:13 IST

पुणे : ब्रिटिश राजवट आल्यानंतर लोकमान्य टिळक हे भारताचे पहिले नेते म्हणून ओळखले गेले. त्यांच्यापूर्वी अनेक नेते होते. परंतु ...

पुणे : ब्रिटिश राजवट आल्यानंतर लोकमान्य टिळक हे भारताचे पहिले नेते म्हणून ओळखले गेले. त्यांच्यापूर्वी अनेक नेते होते. परंतु ते ठरावीक भागापुरते मर्यादित होते. स्वातंत्र चळवळ उभी करताना उत्सवाचा उपयोग करता येईल, ही कल्पना त्यांना सुचली आणि गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. याच गणेशोत्सवातून स्वराज्याची प्रेरणा सामान्यांना मिळाली असून, राष्ट्राभिमान जागविण्याचे काम गणेशोत्सवाने केले, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

पार्वती चव्हाण सोशल फाउंडेशन आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ यांच्यातर्फे बाजीराव रस्त्यावरील वरदश्री सभागृह येथे विघ्नहर्ता कृतज्ञता सन्मान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, निवृत्त पोलीस अधिकारी मारुतीराव देशमुख, फाउंडेशनचे संस्थापक गणेश चव्हाण, पीयुष शाह, नितीन यंदे, अमर राव, भोला वांजळे, नरेंद्र व्यास आदी उपस्थित होते.

गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्थिर पाण्याचे हौद तसेच फिरत्या हौदांची तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था करणाऱ्या आठ गणेशोत्सव मंडळांना विघ्नहर्ता कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. अष्टविनायक मित्र मंडळ विश्रांतवाडी, वाघजाई मित्र मंडळ फाउंडेशन जनता वसाहत, हिंदमाता तरुण मंडळ नाना पेठ, देशप्रेमी मित्र मंडळ कोथरूड, युगंधर मित्र मंडळ आनंदनगर, श्री रास्ता पेठ सार्वजनिक नायडू गणपती मंडळ, वंदे मातरम् मित्र मंडळ कसबा पेठ आणि गवळीवाडा श्री अरण्येश्वर मित्र मंडळ सहकार नगर या मंडळांचा उपरणे, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

गार्गी कोळपकर हिने गणेशवंदना नृत्य सादर केले. पीयुष शाह यांनी प्रास्ताविक केले. विद्या यंदे यांनी सूत्रसंचालन केले.