शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

यंदा गणेश फेस्टिव्हल - नितीन काळजे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:44 IST

कला आणि कलावंतांविषयी जाण नसल्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही राजकारण घुसल्याने पंधरा वर्षांपूर्वी बंद केलेला पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हल या वर्षीपासून सुरू होणार आहे. ‘महाराष्ट्रीय लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पिंपरी : कला आणि कलावंतांविषयी जाण नसल्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही राजकारण घुसल्याने पंधरा वर्षांपूर्वी बंद केलेला पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हल या वर्षीपासून सुरू होणार आहे. ‘महाराष्ट्रीय लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर आर. एस. कुमार असताना १९९६ मध्ये पुणे फेस्टिव्हलाच्या धर्तीवर गणेश फेस्टिव्हला आयोजित केला होता. हा महोत्सव पिंपरी, निगडी, भोसरी अशा विविध परिसरांत झाला होता. लोककलांपासून शास्त्रीय, उपशास्त्रीय कलांचा आस्वाद शहरवासीयांना मिळत होता. या महोत्सवाचा लौकिक एवढा वाढला की पदाधिकाºयांमध्ये हा महोत्सव कोठे भरवायचा यावरून चढाओढ लागत असे. भारतरत्न भीमसेन जोशी यांच्यापासून प्रसिद्ध गायक अन्नू मल्लीक, उदीत नारायणन, साधना सरगम अशा विविध मान्यवर कलावंतांचा कलाविष्कार अनुभवयास मिळला होता.महोत्सवाच्या आयोजनावरून २००२ मध्ये राजकारण झाले होते. तत्कालीन महापौर प्रकाश रेवाळे यांनी हा महोत्सव बंद केला. त्यानंतर एक वर्षे पिंपरी-चिंचवड उत्सव सांस्कृतिक समितीच्या माध्यमातून महोत्सव सुरू केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड सोशल क्लबच्या माध्यमातून लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे, उमा खापरे, प्रवीण तुपे यांच्यासह अन्य कलाप्रेमींनी एकत्र येऊन लोकसहभागातून महोत्सवाची परंपरा पुढे कायम ठेवली. २०१४ पर्यंत हा महोत्सव सुरू होता.आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही गणेश फेस्टिव्हला उपक्रमांवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. या वेळी बंद पडलेला गणेश फेस्टिव्हला सुरू करावा, अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. तसेच शहरातील विविध संस्थांनीही गणेश फेस्टिव्हला सुरू करावा, अशी मागणी यापूर्वी केली होती. महापौर काळजे यांनी शहरवासीयांच्या मागणीचा विचार करून फेस्टिव्हलाच्या आयोजनाचे नियोजन केले आहे.आविष्कार : शास्त्रीय संगीताचा कार्यक्रममहापौर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, मान्यवर कलावंतांचा अविष्कार शहरातील रसिकांना पाहता यावा, यासाठी गणेश फेस्टीव्हल सुरू करण्यात येणार आहे. तीन ते पाच दिवसांचा महोत्सव असावा. तसेच शहरातील विविध भागांत हा महोत्सव व्हावा, असे नियोजन करण्यात येणार आहे. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमांचे नियोजन केले जाणार आहे.’’