शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

यंदा गणेश फेस्टिव्हल - नितीन काळजे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:44 IST

कला आणि कलावंतांविषयी जाण नसल्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही राजकारण घुसल्याने पंधरा वर्षांपूर्वी बंद केलेला पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हल या वर्षीपासून सुरू होणार आहे. ‘महाराष्ट्रीय लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पिंपरी : कला आणि कलावंतांविषयी जाण नसल्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही राजकारण घुसल्याने पंधरा वर्षांपूर्वी बंद केलेला पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हल या वर्षीपासून सुरू होणार आहे. ‘महाराष्ट्रीय लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर आर. एस. कुमार असताना १९९६ मध्ये पुणे फेस्टिव्हलाच्या धर्तीवर गणेश फेस्टिव्हला आयोजित केला होता. हा महोत्सव पिंपरी, निगडी, भोसरी अशा विविध परिसरांत झाला होता. लोककलांपासून शास्त्रीय, उपशास्त्रीय कलांचा आस्वाद शहरवासीयांना मिळत होता. या महोत्सवाचा लौकिक एवढा वाढला की पदाधिकाºयांमध्ये हा महोत्सव कोठे भरवायचा यावरून चढाओढ लागत असे. भारतरत्न भीमसेन जोशी यांच्यापासून प्रसिद्ध गायक अन्नू मल्लीक, उदीत नारायणन, साधना सरगम अशा विविध मान्यवर कलावंतांचा कलाविष्कार अनुभवयास मिळला होता.महोत्सवाच्या आयोजनावरून २००२ मध्ये राजकारण झाले होते. तत्कालीन महापौर प्रकाश रेवाळे यांनी हा महोत्सव बंद केला. त्यानंतर एक वर्षे पिंपरी-चिंचवड उत्सव सांस्कृतिक समितीच्या माध्यमातून महोत्सव सुरू केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड सोशल क्लबच्या माध्यमातून लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे, उमा खापरे, प्रवीण तुपे यांच्यासह अन्य कलाप्रेमींनी एकत्र येऊन लोकसहभागातून महोत्सवाची परंपरा पुढे कायम ठेवली. २०१४ पर्यंत हा महोत्सव सुरू होता.आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही गणेश फेस्टिव्हला उपक्रमांवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. या वेळी बंद पडलेला गणेश फेस्टिव्हला सुरू करावा, अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. तसेच शहरातील विविध संस्थांनीही गणेश फेस्टिव्हला सुरू करावा, अशी मागणी यापूर्वी केली होती. महापौर काळजे यांनी शहरवासीयांच्या मागणीचा विचार करून फेस्टिव्हलाच्या आयोजनाचे नियोजन केले आहे.आविष्कार : शास्त्रीय संगीताचा कार्यक्रममहापौर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, मान्यवर कलावंतांचा अविष्कार शहरातील रसिकांना पाहता यावा, यासाठी गणेश फेस्टीव्हल सुरू करण्यात येणार आहे. तीन ते पाच दिवसांचा महोत्सव असावा. तसेच शहरातील विविध भागांत हा महोत्सव व्हावा, असे नियोजन करण्यात येणार आहे. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमांचे नियोजन केले जाणार आहे.’’