शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

सिद्धनाथाच्या यात्रेत शिखरी काठ्यांचा खेळ

By admin | Updated: April 10, 2017 02:00 IST

श्रीक्षेत्र नायगाव येथे चैत्र पौर्णिमा तथा हनुमान जयंतीनिमित्त यात्रा भरते. या यात्रेचे वेगळेपण म्हणजे पुरंदरसह

सासवड : श्रीक्षेत्र नायगाव येथे चैत्र पौर्णिमा तथा हनुमान जयंतीनिमित्त यात्रा भरते. या यात्रेचे वेगळेपण म्हणजे पुरंदरसह आसपासच्या तालुक्यांतील काही गावांतील मानाच्या काठ्यांचे शिखर स्पर्धेचे आकर्षण असते आणि यानिमित्त हजारो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात. सिदोबाचे नायगाव म्हणून या गावाची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणार म्हणून हजारो भाविकांची श्री सिद्धनाथावर श्रद्धा आहे. वर्षातील सर्व पौर्णिमा, रविवार, मंगळवार या दिवशी नायगावला भाविकांची गर्दी असते आणि श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी आणि चैत्र पौर्णिमा तथा हनुमान जयंतीला याठिकाणी यात्रा भरते. चैत्र पौणिमेची यात्रा मोठी असून साधारण तीन दिवस चालते. हनुमान जयंती तथा चैत्र पौर्णिमेच्या आधीच्या दिवशी श्री सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा हळदीचा कार्यक्रम होतो. चैत्र पौर्णिमेला सकाळी ७ वाजता हनुमान जन्मोत्सव होतो, त्यानंतर श्रींच्या पालखीही सवाद्य आणि खेळगड्यांच्या उपस्थितीत ग्रामप्रदक्षिणा होते. या वेळी परिट समाजाकडून पालखीपुढे पायघड्या अंथरण्यात येतात, त्यावेळी पालखीपुढे लहान मुलांना झोपवून देव अंगात संचारलेले भक्त व पालखीने त्यांना ओलांडण्याची पारंपरिक प्रथा पाहायला मिळते. दिवसभर नवसाची दंडवते आणि गूळ व प्ोढ्यांची शेरणी वाटप होते. सायंकाळी मनाच्या काठ्यांचे स्वागत, मिरवणूक आणि रात्री ८ वाजता शिखर भेट स्पर्धा होते. रात्री १० वाजता श्रींच्या पालखीची वाजत-गाजत मिरवणूक निघते. आलेल्या प्रत्येक काठीच्या विसाव्याठिकाणी पालखी जाते, त्याठिकाणी पारंपरिक पद्धतीने घोंगडी अंथरून काठीच्या मानकऱ्यांचा मानाचा विडा देण्याचा कार्यक्रम होतो, तर पेरणेकरांकडून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीला जोडे ठेवण्याचा पारंपरिक कार्यक्रम संपन्न होतो. रात्रभर मंदिरासमोर छबिना सुरु असतो. पहाटे ३ नंतर सर्व काठ्यांच्या तळावर जाऊन पालखी देऊळवाड्यात परतते. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी लोकनाट्य तमाशा फड रंगतो व दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा भरतो. (वार्ताहर)४यानिमित्त परिसरात सासवड, पारगाव, सिंगापूर, एखतपूर, मुंजवडी, कोथळे (ता. पुरंदर), पेरणे (ता. हवेली), एल्केभादे (ता. खंडाळा), न्हावरे (ता. शिरूर) आणि भोंडवेवाडी (ता. बारामती) येथील काठ्यांची शिखर भेट स्पर्धा होते. हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. ४हा सोहळा अनेक वर्षानुवर्षे सुरू आहे. मागील काही वर्षांपूर्वी दुष्काळामुळे परिसरातील अनेक गावांनी आपल्या यात्रा रद्द केल्या होत्या. मात्र, नायगावमध्ये असा प्रकार कधीही झालेला नाही.