शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धनाथाच्या यात्रेत शिखरी काठ्यांचा खेळ

By admin | Updated: April 10, 2017 02:00 IST

श्रीक्षेत्र नायगाव येथे चैत्र पौर्णिमा तथा हनुमान जयंतीनिमित्त यात्रा भरते. या यात्रेचे वेगळेपण म्हणजे पुरंदरसह

सासवड : श्रीक्षेत्र नायगाव येथे चैत्र पौर्णिमा तथा हनुमान जयंतीनिमित्त यात्रा भरते. या यात्रेचे वेगळेपण म्हणजे पुरंदरसह आसपासच्या तालुक्यांतील काही गावांतील मानाच्या काठ्यांचे शिखर स्पर्धेचे आकर्षण असते आणि यानिमित्त हजारो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात. सिदोबाचे नायगाव म्हणून या गावाची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणार म्हणून हजारो भाविकांची श्री सिद्धनाथावर श्रद्धा आहे. वर्षातील सर्व पौर्णिमा, रविवार, मंगळवार या दिवशी नायगावला भाविकांची गर्दी असते आणि श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी आणि चैत्र पौर्णिमा तथा हनुमान जयंतीला याठिकाणी यात्रा भरते. चैत्र पौणिमेची यात्रा मोठी असून साधारण तीन दिवस चालते. हनुमान जयंती तथा चैत्र पौर्णिमेच्या आधीच्या दिवशी श्री सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा हळदीचा कार्यक्रम होतो. चैत्र पौर्णिमेला सकाळी ७ वाजता हनुमान जन्मोत्सव होतो, त्यानंतर श्रींच्या पालखीही सवाद्य आणि खेळगड्यांच्या उपस्थितीत ग्रामप्रदक्षिणा होते. या वेळी परिट समाजाकडून पालखीपुढे पायघड्या अंथरण्यात येतात, त्यावेळी पालखीपुढे लहान मुलांना झोपवून देव अंगात संचारलेले भक्त व पालखीने त्यांना ओलांडण्याची पारंपरिक प्रथा पाहायला मिळते. दिवसभर नवसाची दंडवते आणि गूळ व प्ोढ्यांची शेरणी वाटप होते. सायंकाळी मनाच्या काठ्यांचे स्वागत, मिरवणूक आणि रात्री ८ वाजता शिखर भेट स्पर्धा होते. रात्री १० वाजता श्रींच्या पालखीची वाजत-गाजत मिरवणूक निघते. आलेल्या प्रत्येक काठीच्या विसाव्याठिकाणी पालखी जाते, त्याठिकाणी पारंपरिक पद्धतीने घोंगडी अंथरून काठीच्या मानकऱ्यांचा मानाचा विडा देण्याचा कार्यक्रम होतो, तर पेरणेकरांकडून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीला जोडे ठेवण्याचा पारंपरिक कार्यक्रम संपन्न होतो. रात्रभर मंदिरासमोर छबिना सुरु असतो. पहाटे ३ नंतर सर्व काठ्यांच्या तळावर जाऊन पालखी देऊळवाड्यात परतते. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी लोकनाट्य तमाशा फड रंगतो व दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा भरतो. (वार्ताहर)४यानिमित्त परिसरात सासवड, पारगाव, सिंगापूर, एखतपूर, मुंजवडी, कोथळे (ता. पुरंदर), पेरणे (ता. हवेली), एल्केभादे (ता. खंडाळा), न्हावरे (ता. शिरूर) आणि भोंडवेवाडी (ता. बारामती) येथील काठ्यांची शिखर भेट स्पर्धा होते. हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. ४हा सोहळा अनेक वर्षानुवर्षे सुरू आहे. मागील काही वर्षांपूर्वी दुष्काळामुळे परिसरातील अनेक गावांनी आपल्या यात्रा रद्द केल्या होत्या. मात्र, नायगावमध्ये असा प्रकार कधीही झालेला नाही.