शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

गजेंद्र चौहान यांना हटविले; तरच तोडगा निघेल

By admin | Updated: September 24, 2015 03:05 IST

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केलेल्या गजेंद्र चौहान यांना हटविले तरच या आंदोलनावर तोडगा निघेल

पुणे : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केलेल्या गजेंद्र चौहान यांना हटविले तरच या आंदोलनावर तोडगा निघेल, असे स्पष्ट मत अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी बुधवारी व्यक्त केले.गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या वादावरून विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाने शंभरी ओलांडली आहे तर विद्यार्थ्यांच्या बेमुदत उपोषणाला १५ दिवस पूर्ण होत आहे. जवळपास पाच विद्यार्थ्यांना उपोषणामुळे रूग्णालयातही दाखल करण्यात आले आहे, तरीही असंवेदनशील शासनाने अद्याप आंदोलनावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचललेले नाही. या पार्श्वभूमीवर नियामक मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच पल्लवी जोशी यांनी एफटीआयआयमध्ये येऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली.पल्लवी जोशी म्हणाल्या, एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड केली आहे. त्यांची नियुक्ती रद्द केली तरच आंदोलनावर तोडगा निघेल. ही नियुक्ती रद्द झाली तर विद्यार्थीही थोडेसे नमते घेतील. बाकीच्या नियामक मंडळाच्या निवडीबद्दल पुढे निर्णय घेता येतील. चित्रपट क्षेत्रातील लोकांची कमिटी पाठवावी. विद्यार्थी एवढे दिवस आंदोलन करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांची कमिटी तयार करावी आणि ती विद्यार्थ्यांशी चर्चा करायला पाठवावी. सरकार चूक की बरोबर यापेक्षा सरकारने विद्यर्थ्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. सरकार आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद होणे महत्त्वाचे आहे. मी राजीनामा दिल्याने यापासून लाब्ां राहिले, पण असते तर नक्कीच शासनाशी बोलणी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असता, असेही त्यांनी नमूद केले.मुलांनी पडती बाजू घ्यावी, असे मला वाटत नाही, उलट सरकारने पालकत्त्वाची जवाबदारी घेत विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे. शासनाने पडती बाजू घेतली तर, तो समंजसपणा ठरेल. आंदोलन मागे घेतले तर, विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईल. विद्यार्थी उपोषणाला बसूनही त्यांची दखल घेतली गेली नाही. ही कोंडी झाली आहे, ती फोडण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.