शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

गजेंद्र चौहान यांना हटविले; तरच तोडगा निघेल

By admin | Updated: September 24, 2015 03:05 IST

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केलेल्या गजेंद्र चौहान यांना हटविले तरच या आंदोलनावर तोडगा निघेल

पुणे : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केलेल्या गजेंद्र चौहान यांना हटविले तरच या आंदोलनावर तोडगा निघेल, असे स्पष्ट मत अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी बुधवारी व्यक्त केले.गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या वादावरून विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाने शंभरी ओलांडली आहे तर विद्यार्थ्यांच्या बेमुदत उपोषणाला १५ दिवस पूर्ण होत आहे. जवळपास पाच विद्यार्थ्यांना उपोषणामुळे रूग्णालयातही दाखल करण्यात आले आहे, तरीही असंवेदनशील शासनाने अद्याप आंदोलनावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचललेले नाही. या पार्श्वभूमीवर नियामक मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच पल्लवी जोशी यांनी एफटीआयआयमध्ये येऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली.पल्लवी जोशी म्हणाल्या, एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड केली आहे. त्यांची नियुक्ती रद्द केली तरच आंदोलनावर तोडगा निघेल. ही नियुक्ती रद्द झाली तर विद्यार्थीही थोडेसे नमते घेतील. बाकीच्या नियामक मंडळाच्या निवडीबद्दल पुढे निर्णय घेता येतील. चित्रपट क्षेत्रातील लोकांची कमिटी पाठवावी. विद्यार्थी एवढे दिवस आंदोलन करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांची कमिटी तयार करावी आणि ती विद्यार्थ्यांशी चर्चा करायला पाठवावी. सरकार चूक की बरोबर यापेक्षा सरकारने विद्यर्थ्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. सरकार आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद होणे महत्त्वाचे आहे. मी राजीनामा दिल्याने यापासून लाब्ां राहिले, पण असते तर नक्कीच शासनाशी बोलणी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असता, असेही त्यांनी नमूद केले.मुलांनी पडती बाजू घ्यावी, असे मला वाटत नाही, उलट सरकारने पालकत्त्वाची जवाबदारी घेत विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे. शासनाने पडती बाजू घेतली तर, तो समंजसपणा ठरेल. आंदोलन मागे घेतले तर, विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईल. विद्यार्थी उपोषणाला बसूनही त्यांची दखल घेतली गेली नाही. ही कोंडी झाली आहे, ती फोडण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.