शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

गजेंद्र चौहान यांना हटविले; तरच तोडगा निघेल

By admin | Updated: September 24, 2015 03:05 IST

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केलेल्या गजेंद्र चौहान यांना हटविले तरच या आंदोलनावर तोडगा निघेल

पुणे : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केलेल्या गजेंद्र चौहान यांना हटविले तरच या आंदोलनावर तोडगा निघेल, असे स्पष्ट मत अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी बुधवारी व्यक्त केले.गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या वादावरून विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाने शंभरी ओलांडली आहे तर विद्यार्थ्यांच्या बेमुदत उपोषणाला १५ दिवस पूर्ण होत आहे. जवळपास पाच विद्यार्थ्यांना उपोषणामुळे रूग्णालयातही दाखल करण्यात आले आहे, तरीही असंवेदनशील शासनाने अद्याप आंदोलनावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचललेले नाही. या पार्श्वभूमीवर नियामक मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच पल्लवी जोशी यांनी एफटीआयआयमध्ये येऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली.पल्लवी जोशी म्हणाल्या, एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड केली आहे. त्यांची नियुक्ती रद्द केली तरच आंदोलनावर तोडगा निघेल. ही नियुक्ती रद्द झाली तर विद्यार्थीही थोडेसे नमते घेतील. बाकीच्या नियामक मंडळाच्या निवडीबद्दल पुढे निर्णय घेता येतील. चित्रपट क्षेत्रातील लोकांची कमिटी पाठवावी. विद्यार्थी एवढे दिवस आंदोलन करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांची कमिटी तयार करावी आणि ती विद्यार्थ्यांशी चर्चा करायला पाठवावी. सरकार चूक की बरोबर यापेक्षा सरकारने विद्यर्थ्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. सरकार आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद होणे महत्त्वाचे आहे. मी राजीनामा दिल्याने यापासून लाब्ां राहिले, पण असते तर नक्कीच शासनाशी बोलणी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असता, असेही त्यांनी नमूद केले.मुलांनी पडती बाजू घ्यावी, असे मला वाटत नाही, उलट सरकारने पालकत्त्वाची जवाबदारी घेत विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे. शासनाने पडती बाजू घेतली तर, तो समंजसपणा ठरेल. आंदोलन मागे घेतले तर, विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईल. विद्यार्थी उपोषणाला बसूनही त्यांची दखल घेतली गेली नाही. ही कोंडी झाली आहे, ती फोडण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.