शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रकल्पांच्या उभारणीसाठी देणार गायरान जमिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:08 IST

आंबेठाण : अनेक गावांमध्ये कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. ...

आंबेठाण : अनेक गावांमध्ये कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील गायरान जागेची मागणी प्रस्ताव तत्काळ जिल्हा परिषदेला पाठवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांनी केले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण जिल्हा कचरामुक्त करण्याची मोहीम जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर खेडच्या पिंपरी-पाईट गटातील गावांचा स्वच्छतेबाबतचा आढावा घेण्यासाठी वराळे येथे गटातील सरपंच व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, जि.प.चे कक्ष अधिकारी विक्रम शिंदे, पंचायत विस्तार अधिकारी एस.डी.थोरात, अशोक तट, जगदीश घाडगे, सुजाता रहाणे आदीसह सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

टोणपे म्हणाले, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला खर्चाची मर्यादा नसून मुद्रांक शुल्क,१५ वा वित्त आयोग,ग्रामपंचायत निधी किंवा इतर फंडातील पैसे खर्च करू शकता. गावाच्या रस्त्यावर कचरा दिसता कामा नये. यासाठी रस्त्याच्या कडेच्या ग्रामपंचायतींनी दक्षता घेऊन उपाययोजना करावी.

ज्या गावांना गायरान जागा नाही त्यांनी गावठाणच्या मोकळ्या जागेचा प्रस्ताव करा. गावठाण जागेचे अधिकार जिल्हा परिषदेचे सीईओ यांना असल्याने लगेच जागा देण्यात येईल. येत्या १५ ऑगस्टला कचरामुक्त जिल्हा म्हणून घोषित होणार असल्याने ग्रामपंचायतींनी तत्काळ कचऱ्याचे व्यवस्थापन प्रकल्प करावा. तसेच एमआयडीसीमधील कंपन्या किंवा छोटे वर्कशॉपवाल्यांनी कचरा रस्त्याच्या कडेला टाकल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायत स्तरावर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा गुन्हा दाखल करावा, अशा सूचना टोणपे यांनी बैठकीत केल्या आहेत.

शरद बुट्टे पाटील म्हणाले, एमआयडीसी टप्पा क्रमांक पाचव्या टप्प्यातील ग्रामपंचायतींनी कचरा प्रकल्पासाठी गायरान जागेचे प्रस्ताव दाखल करावेत. भविष्यात कंपन्यांमुळे गावची लोकसंख्या वाढणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उत्तम प्रकारे करावे. मोठ्या गावांना स्वच्छतागृहासाठी निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार ग्रामसेवक काकासाहेब मिंड यांनी मानले.

२५ आंबेठाण

ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे.