शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कचरा प्रकल्पांच्या उभारणीसाठी देणार गायरान जमिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:08 IST

आंबेठाण : अनेक गावांमध्ये कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. ...

आंबेठाण : अनेक गावांमध्ये कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील गायरान जागेची मागणी प्रस्ताव तत्काळ जिल्हा परिषदेला पाठवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांनी केले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण जिल्हा कचरामुक्त करण्याची मोहीम जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर खेडच्या पिंपरी-पाईट गटातील गावांचा स्वच्छतेबाबतचा आढावा घेण्यासाठी वराळे येथे गटातील सरपंच व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, जि.प.चे कक्ष अधिकारी विक्रम शिंदे, पंचायत विस्तार अधिकारी एस.डी.थोरात, अशोक तट, जगदीश घाडगे, सुजाता रहाणे आदीसह सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

टोणपे म्हणाले, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला खर्चाची मर्यादा नसून मुद्रांक शुल्क,१५ वा वित्त आयोग,ग्रामपंचायत निधी किंवा इतर फंडातील पैसे खर्च करू शकता. गावाच्या रस्त्यावर कचरा दिसता कामा नये. यासाठी रस्त्याच्या कडेच्या ग्रामपंचायतींनी दक्षता घेऊन उपाययोजना करावी.

ज्या गावांना गायरान जागा नाही त्यांनी गावठाणच्या मोकळ्या जागेचा प्रस्ताव करा. गावठाण जागेचे अधिकार जिल्हा परिषदेचे सीईओ यांना असल्याने लगेच जागा देण्यात येईल. येत्या १५ ऑगस्टला कचरामुक्त जिल्हा म्हणून घोषित होणार असल्याने ग्रामपंचायतींनी तत्काळ कचऱ्याचे व्यवस्थापन प्रकल्प करावा. तसेच एमआयडीसीमधील कंपन्या किंवा छोटे वर्कशॉपवाल्यांनी कचरा रस्त्याच्या कडेला टाकल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायत स्तरावर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा गुन्हा दाखल करावा, अशा सूचना टोणपे यांनी बैठकीत केल्या आहेत.

शरद बुट्टे पाटील म्हणाले, एमआयडीसी टप्पा क्रमांक पाचव्या टप्प्यातील ग्रामपंचायतींनी कचरा प्रकल्पासाठी गायरान जागेचे प्रस्ताव दाखल करावेत. भविष्यात कंपन्यांमुळे गावची लोकसंख्या वाढणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उत्तम प्रकारे करावे. मोठ्या गावांना स्वच्छतागृहासाठी निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार ग्रामसेवक काकासाहेब मिंड यांनी मानले.

२५ आंबेठाण

ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे.