सध्या कांदा लावगड सुरु असून ऊस क्षेत्रात बिबट्याची भिती असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी सुरुची माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली होती मात्र त्यांच्या मागणीला विज मंडळाने केराची टोपली दाखविली आहे.
रब्बीचा हंगाम सुरु झाला असून कांदा लागवडीसाठी मिळणारे मजूर हे सकाळी दहा ते पाच या वेळात कामासाठी येतात. मात्र वीज मंडळाकडून रात्री व पहाटे विज पुरवठा सुरु होतो. नेमक्या त्याचवेळी बिबट्याची भिती असल्याने अनेक शेतकरी भितीपोटी बाहेर पडत नाहीत व पंप सुरु न झाल्यामुळे शेती मात्र पाण्याविना कोरटी पडत आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याची रोपे पाण्यात सडून गेली आहेत. नव्याने रोपे तयार करण्यासाठी उपलब्ध होत नाही. अनेक शेतकऱ्यांची मोठ्या चढ्या भावाने बी घेऊन सुद्धा फसवणूक झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कांदा लागवड करीत असून कर्जाचा डोंगर त्यांच्यावर वाढत चालला आहे. मात्र वीज मंडळानेही ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ सुरू केला असून शेतकऱ्यांना विचारात न घेता विजेचा वेळापत्रक तयार केल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते त्याच्यावरच शेतकऱ्यांची वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते.
त्यामुळे सकाळी दहा ते पाच या वेळात वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि वीज मंडळाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्याकडे केली आहे
-
शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षाची असून ती मागणी असून हे सरकार तरी शेतकऱ्यांच्या हाकेला देणार आहे का?
सोनभाऊ मुसळे,
----
शेतकऱ्यांनी शेतकऱ्या निसर्गाच्या चक्रातून सावरत मोठ्या कष्टातून कांदा रोपे तयार केले असून ती लावण्यासाठी सकाळी दहा ते पाच या वेळात शेतीपंपासाठी वीज उपलब्ध करून द्यावी अन्यथा रोजगारात वाढ होऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वाढणार आहे व त्यातून मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्याचे होईल ..
- नानाभाऊ फुलसुंदर ( कांदा उत्पादक शेतकरी
--
उत्पादन घटन्याची शक्यता
पुणे जिल्ह्यात शिरूर खेड जुन्नर आंबेगाव पुरंदर दौंड बारामती इंदापूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होत असून येथील कांदा निर्यात क्षम अशा दर्जाचा आहे. शेतकऱ्यांना मंडळाने दिवसा उपलब्ध करून दिल्यास कांदा लागवड व उत्पादन यावर विपरित परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत .