शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

विजेच्या लपंडावामुळे पीकांचे भवितव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

सध्या कांदा लावगड सुरु असून ऊस क्षेत्रात बिबट्याची भिती असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ...

सध्या कांदा लावगड सुरु असून ऊस क्षेत्रात बिबट्याची भिती असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी सुरुची माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली होती मात्र त्यांच्या मागणीला विज मंडळाने केराची टोपली दाखविली आहे.

रब्बीचा हंगाम सुरु झाला असून कांदा लागवडीसाठी मिळणारे मजूर हे सकाळी दहा ते पाच या वेळात कामासाठी येतात. मात्र वीज मंडळाकडून रात्री व पहाटे विज पुरवठा सुरु होतो. नेमक्या त्याचवेळी बिबट्याची भिती असल्याने अनेक शेतकरी भितीपोटी बाहेर पडत नाहीत व पंप सुरु न झाल्यामुळे शेती मात्र पाण्याविना कोरटी पडत आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याची रोपे पाण्यात सडून गेली आहेत. नव्याने रोपे तयार करण्यासाठी उपलब्ध होत नाही. अनेक शेतकऱ्यांची मोठ्या चढ्या भावाने बी घेऊन सुद्धा फसवणूक झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कांदा लागवड करीत असून कर्जाचा डोंगर त्यांच्यावर वाढत चालला आहे. मात्र वीज मंडळानेही ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ सुरू केला असून शेतकऱ्यांना विचारात न घेता विजेचा वेळापत्रक तयार केल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते त्याच्यावरच शेतकऱ्यांची वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते.

त्यामुळे सकाळी दहा ते पाच या वेळात वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि वीज मंडळाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्याकडे केली आहे

-

शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षाची असून ती मागणी असून हे सरकार तरी शेतकऱ्यांच्या हाकेला देणार आहे का?

सोनभाऊ मुसळे,

----

शेतकऱ्यांनी शेतकऱ्या निसर्गाच्या चक्रातून सावरत मोठ्या कष्टातून कांदा रोपे तयार केले असून ती लावण्यासाठी सकाळी दहा ते पाच या वेळात शेतीपंपासाठी वीज उपलब्ध करून द्यावी अन्यथा रोजगारात वाढ होऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वाढणार आहे व त्यातून मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्याचे होईल ..

- नानाभाऊ फुलसुंदर ( कांदा उत्पादक शेतकरी

--

उत्पादन घटन्याची शक्यता

पुणे जिल्ह्यात शिरूर खेड जुन्नर आंबेगाव पुरंदर दौंड बारामती इंदापूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होत असून येथील कांदा निर्यात क्षम अशा दर्जाचा आहे. शेतकऱ्यांना मंडळाने दिवसा उपलब्ध करून दिल्यास कांदा लागवड व उत्पादन यावर विपरित परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत .