शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

विजेच्या लपंडावामुळे पीकांचे भवितव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

सध्या कांदा लावगड सुरु असून ऊस क्षेत्रात बिबट्याची भिती असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ...

सध्या कांदा लावगड सुरु असून ऊस क्षेत्रात बिबट्याची भिती असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी सुरुची माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली होती मात्र त्यांच्या मागणीला विज मंडळाने केराची टोपली दाखविली आहे.

रब्बीचा हंगाम सुरु झाला असून कांदा लागवडीसाठी मिळणारे मजूर हे सकाळी दहा ते पाच या वेळात कामासाठी येतात. मात्र वीज मंडळाकडून रात्री व पहाटे विज पुरवठा सुरु होतो. नेमक्या त्याचवेळी बिबट्याची भिती असल्याने अनेक शेतकरी भितीपोटी बाहेर पडत नाहीत व पंप सुरु न झाल्यामुळे शेती मात्र पाण्याविना कोरटी पडत आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याची रोपे पाण्यात सडून गेली आहेत. नव्याने रोपे तयार करण्यासाठी उपलब्ध होत नाही. अनेक शेतकऱ्यांची मोठ्या चढ्या भावाने बी घेऊन सुद्धा फसवणूक झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कांदा लागवड करीत असून कर्जाचा डोंगर त्यांच्यावर वाढत चालला आहे. मात्र वीज मंडळानेही ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ सुरू केला असून शेतकऱ्यांना विचारात न घेता विजेचा वेळापत्रक तयार केल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते त्याच्यावरच शेतकऱ्यांची वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते.

त्यामुळे सकाळी दहा ते पाच या वेळात वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि वीज मंडळाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्याकडे केली आहे

-

शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षाची असून ती मागणी असून हे सरकार तरी शेतकऱ्यांच्या हाकेला देणार आहे का?

सोनभाऊ मुसळे,

----

शेतकऱ्यांनी शेतकऱ्या निसर्गाच्या चक्रातून सावरत मोठ्या कष्टातून कांदा रोपे तयार केले असून ती लावण्यासाठी सकाळी दहा ते पाच या वेळात शेतीपंपासाठी वीज उपलब्ध करून द्यावी अन्यथा रोजगारात वाढ होऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वाढणार आहे व त्यातून मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्याचे होईल ..

- नानाभाऊ फुलसुंदर ( कांदा उत्पादक शेतकरी

--

उत्पादन घटन्याची शक्यता

पुणे जिल्ह्यात शिरूर खेड जुन्नर आंबेगाव पुरंदर दौंड बारामती इंदापूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होत असून येथील कांदा निर्यात क्षम अशा दर्जाचा आहे. शेतकऱ्यांना मंडळाने दिवसा उपलब्ध करून दिल्यास कांदा लागवड व उत्पादन यावर विपरित परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत .