शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

विजेच्या लपंडावामुळे पीकांचे भवितव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

सध्या कांदा लावगड सुरु असून ऊस क्षेत्रात बिबट्याची भिती असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ...

सध्या कांदा लावगड सुरु असून ऊस क्षेत्रात बिबट्याची भिती असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी सुरुची माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली होती मात्र त्यांच्या मागणीला विज मंडळाने केराची टोपली दाखविली आहे.

रब्बीचा हंगाम सुरु झाला असून कांदा लागवडीसाठी मिळणारे मजूर हे सकाळी दहा ते पाच या वेळात कामासाठी येतात. मात्र वीज मंडळाकडून रात्री व पहाटे विज पुरवठा सुरु होतो. नेमक्या त्याचवेळी बिबट्याची भिती असल्याने अनेक शेतकरी भितीपोटी बाहेर पडत नाहीत व पंप सुरु न झाल्यामुळे शेती मात्र पाण्याविना कोरटी पडत आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याची रोपे पाण्यात सडून गेली आहेत. नव्याने रोपे तयार करण्यासाठी उपलब्ध होत नाही. अनेक शेतकऱ्यांची मोठ्या चढ्या भावाने बी घेऊन सुद्धा फसवणूक झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कांदा लागवड करीत असून कर्जाचा डोंगर त्यांच्यावर वाढत चालला आहे. मात्र वीज मंडळानेही ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ सुरू केला असून शेतकऱ्यांना विचारात न घेता विजेचा वेळापत्रक तयार केल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते त्याच्यावरच शेतकऱ्यांची वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते.

त्यामुळे सकाळी दहा ते पाच या वेळात वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि वीज मंडळाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्याकडे केली आहे

-

शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षाची असून ती मागणी असून हे सरकार तरी शेतकऱ्यांच्या हाकेला देणार आहे का?

सोनभाऊ मुसळे,

----

शेतकऱ्यांनी शेतकऱ्या निसर्गाच्या चक्रातून सावरत मोठ्या कष्टातून कांदा रोपे तयार केले असून ती लावण्यासाठी सकाळी दहा ते पाच या वेळात शेतीपंपासाठी वीज उपलब्ध करून द्यावी अन्यथा रोजगारात वाढ होऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वाढणार आहे व त्यातून मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्याचे होईल ..

- नानाभाऊ फुलसुंदर ( कांदा उत्पादक शेतकरी

--

उत्पादन घटन्याची शक्यता

पुणे जिल्ह्यात शिरूर खेड जुन्नर आंबेगाव पुरंदर दौंड बारामती इंदापूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होत असून येथील कांदा निर्यात क्षम अशा दर्जाचा आहे. शेतकऱ्यांना मंडळाने दिवसा उपलब्ध करून दिल्यास कांदा लागवड व उत्पादन यावर विपरित परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत .