शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कारभारावर रोष

By admin | Updated: July 1, 2015 23:49 IST

चुकीची बिले पाठविल्याने अनेक वीजग्राहक नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या समस्येस शहरातील शेकडो नागरिकांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे.

पिंपरी : चुकीची बिले पाठविल्याने अनेक वीजग्राहक नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या समस्येस शहरातील शेकडो नागरिकांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे. या विषयास ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ‘ग्राहकांना भरमसाठ वीजबिलाचा शॉक’ या शीर्षकाखाली लोकमतने बुुधवारी ठळक वृत्त प्रसिद्ध केले. मीटरचे छायाचित्र न घेताच अंदाजे सरासरी रीडिंग टाकून बिल पाठविण्याचा प्रकार शहरातील सर्वच भागांत वाढला आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. तडजोड केल्याचे दाखवीत रक्कम थोडी फार कमी केली जाते. मात्र, पुढील बिलात पुन्हा ही रक्कम वाढून येते. पुन्हा तक्रार करीत वेगवेगळी कार्यालये पालथी घालावी लागतात. यात वेळ आणि प्रवासाचा अतिरिक्त भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. काहींना मुदतीनंतर बिले पाठविली जातात. त्यामुळे वाढीव बिलासोबत दंडाची रक्कमही भरावी लागते. हा आर्थिक भुर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामध्ये नागरिकांची काहीच चूक नसते. या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांसह, व्यापारी, लघुउद्योजक यांच्या तक्रारी आहेत. वीजजोड खंडित कारवाईमुळे अंधारात राहण्याची वेळ येईल म्हणून नाईलाजास्तव अनेक जण निमूटपणे बिल भरून मोकळे होतात. मात्र, वीज कंपनीच्या कामकाजात सुधारणा होताना दिसत नाही. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अधिक रक्कम भरावी लागत आहे. पिंपळे गुरव येथील चक्रनारायण नाथन यांनी अधिक रीडिंगचे बिल येत असल्याची तक्रार पिंपरी विभागीय कार्यालयात केली. मीटर तपासा किंवा तो बदलून द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. मीटरची तपासणी करून रीडिंग चुकीचे येत असल्यास ते बदलून दिले जाणार असल्याचे पिंपरीचे कार्यकारी अभियंता डी. आर. औंढेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केवळ तीनच तक्रारीपिंपरी विभागीय कार्यालयांतर्गत एकूण २ लाख ८६ हजार, तर भोसरी विभागीय कार्यालयांतर्गत एक लाख ८० हजार ग्राहक आहेत. पिंपरीत केवळ ३ तक्रारी आल्या. भोसरीत तर एकही तक्रार आली नाही. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन घेण्यात येतो. पिंपरी कार्यालयात वाढीव वीज बिल आले असून, मीटर बदलून द्यावा,अशी एक तक्रार पिंपळे गुरव येथील रहिवाशाने केली. तीन दिवसांसाठी तात्पुरता वीजजोड घेतला होता. त्यासाठी भरलेली सुरक्षा ठेव परत करावी, अशी तक्रार जाधव कॉलनी, पिंपरीतील एकाने केली. ही ठेव गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भरली होती. घरमालकाचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना भाडेकरूस वीजजोड दिल्याची तक्रार दापोडीतील एका रहिवाशाने केली. या संदर्भात बिलिंग विभागाचे श्रीकृष्ण बागे आणि तांत्रिक विभागाचे एस. एम. क्षीरसागर यांनी तक्रारी स्वीकारल्या. तक्रारींवर त्वरित तोडगा काढण्याचा सूचना कार्यकारी अभियंता डी. आर. औंढेकर यांनी दिल्या आहेत. भोसरीत एकही तक्रार आली नाही, अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. भरणे यांनी दिली. नियमितपणे तक्रारी येतात. फोनवरही तक्रारी घेतल्या जातात. अधिकारी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे त्वरित कारवाई होऊन नागरिकांचे समाधान केले जाते. त्यामुळे तक्रार निवारण दिनाची कोणी वाट बघत बसत नाही. पाच वर्षांपूर्वी १० ते २० तक्रारी या दिवशी येत. सध्या ही संख्या नाही इतकी आहे. गेल्या महिन्यातही एकही तक्रार आली नाही, असे भरणे यांनी सांगितले.