शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

विद्यार्थ्यांकडून अडीच लाखांचा निधी

By admin | Updated: February 10, 2015 01:28 IST

एचए स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वनवासी कल्याणाश्रमासाठी अडीच लाख रुपयांचा निधी संकलीत केला. आदिवासी समाजाचे

पिंपरी : एचए स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वनवासी कल्याणाश्रमासाठी अडीच लाख रुपयांचा निधी संकलीत केला.आदिवासी समाजाचे शहरी समाजाशी आपुलकीचे नाते व्हावे, त्यांच्यातील मानसिक दुरावा नाहीसा व्हावा, आधार मानून वनवासी कल्याण आश्रमासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या सप्ताहात शालेय विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी निधी संकलनास सुरुवात करून आठ दिवसांत २ लाख ५० हजार एवढा निधी उभारला. विद्यार्थ्यांना समारंभात निधी संकलनाची रीत समजावून सांगण्यात आली. मुलींसाठी निधी संकलनाची आचारसंहिता घालून देण्यात आली. योग्य ती शाब्दिक, भाषिक कौशल्ये वापरून वनवासी कल्याण आश्रमाची ज्ञात माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात विद्यार्थी कुशलतेने यशस्वी झाले. दैनंदिन अभ्यास सांभाळून विद्यार्थ्यांनी सकाळ-संध्याकाळी एक तास आपले नातेवाईक, शेजारी-पाजारी, व्यवहारी इत्यादी लोकांकडून पाच, दहा, पन्नासच्या पटीत मुलांनी निधी संकलन केले. पाचवी (क) या वर्गाने सर्वांत जास्त २६ हजार निधी उभा केला. याच वर्गातील तनाज सलीम सय्यद या विद्यार्थिनीने २६०० रुपये एवढी सर्वांत जास्त रक्कम उभी केली. सोमवारी शाळेच्या प्रांगणात वनवासी कल्याणाश्रमाच्या पिंपरी-चिंचवड विभागाध्यक्षा अंजली घारपुरे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्त केला. अध्यक्षस्थानी प्रशालेचे माजी विद्यार्थी रवींद्र नेर्लीकर यांनी या स्तूत्य उपक्रमाचे कौतुक केले. खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी ओळखून मुलांनी डोंगराएवढे कार्य केले, असे अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथी नगरसेवक सद्गुरू कदम यांनी मनोगत व्यक्त केले. आदिवासी कलाकारांचे योगदान या विषयाचे प्रदर्शन लावले होते. शालाप्रमुख एकनाथ बुरसे यांनी प्रास्ताविक केले. वनवासी कल्याणाश्रमाने पुस्तके व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपप्रमुख सुनंदा कांबळे यांनीआभार मानले. विजया तरटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)