शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

डोलारा सावरण्यास मसाप शाखांना निधी द्या

By admin | Updated: July 12, 2016 01:32 IST

महाराष्ट्र परिषदेच्या महाराष्ट्रासह इतर राज्यांतही जवळपास ७२ शाखा आहेत. पण यातील बऱ्याच शाखांचा डोलारा निधीअभावी उभा ठेवणे अवघड जात आहे

पुणे : महाराष्ट्र परिषदेच्या महाराष्ट्रासह इतर राज्यांतही जवळपास ७२ शाखा आहेत. पण यातील बऱ्याच शाखांचा डोलारा निधीअभावी उभा ठेवणे अवघड जात आहे. त्यामुळे शाखांना निधी द्यावा, वर्षात जे ५५ कार्यक्रम परिषद घेते त्यांपैकी काही कार्यक्रम शाखांना द्यावेत व त्यासाठी निधी द्यावा, या व इतर काही मागण्या परिषदेचे पदाधिकारी, विश्वस्त आणि महामंडळच्या सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत करण्यात आल्या आहेत.परिषदेच्या काही शाखा जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत, तर काही शाखा तालुकास्तरावर आहेत. शहरी भागातील शाखांना कार्यक्रमासाठी निधीची अडचण येत नाही; पण तालुकापातळीवरील शाखांना आर्थिक चणचण भासते. शाखांची नियमित कार्यक्रम करण्याची इच्छा असते; पण निधीअभावी कार्यक्रम घेणे शाखांना शक्य होत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी शाखांना निधी मिळण्यासंदर्भात काही प्रस्ताव ठेवले.या संदर्भात ते म्हणाले, साहित्य परिषद वर्षात ५५ कार्यक्रम घेते. ते सर्व कार्यक्रम पुण्यात होतात. यातील काही कार्यक्रम शाखांना द्यावे, अशा कार्यक्रमांसाठी परिषद जो खर्च करते तो निधी शाखांना द्यावा असा प्रस्ताव दिला आहे. काही शाखा नियमित व्याख्यानमाला घेतात; पण वक्त्यांचे मानधन, प्रवासखर्च शाखांना झेपत नाही. त्यामुळे वक्त्याचे मानधन परिषदेने द्यावे, असेही सुचविले आहे. साहित्य परिषदेकडे असलेल्या ८२ लाखांच्या निधीद्वारे मिळणाऱ्या व्याजातून कार्यक्रम घेतले जातात. तोच निधी मिळावा, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. आजीव सदस्यत्व देताना एक हजार रुपये घेतले जातात. त्यातील ६० टक्के रक्कम परिषद घेते, उरलेली ४० टक्के रक्कम शाखेला परत दिली जाते. ४० टक्क्यांऐवजी ५० टक्के रक्कम मिळावी, यास मंजुरी मिळाली असल्याचे बेडकिहाळ म्हणाले. साहित्य परिषदेतर्फे विभागीय संमेलन घेतले जाते. त्याची जबाबदारी शाखांवर असते. संमेलनासाठी परिषद ५० हजार रुपये देते. पण हा निधी पुरत नाही. त्यामुळे विभागीय संमेलनासाठी १ लाख रुपये द्यावेत, असाही प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आला आहे. परिषदेच्या वेगवेगळ्या शाखांद्वारे शाखा मेळावे घेतले जातात. त्यासाठीही अनुदान द्यावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली.या बैठकीला विश्वस्त, पदाधिकारी, जिल्हा प्रतिनिधी, कार्यवाह उपस्थित होते. (प्रतिनिधी)