शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीचा तिढा वाढला; राज्याचा वाटा मिळणार नाही!

By admin | Updated: June 16, 2015 00:33 IST

उसाच्या एफआरपीसाठी केंद्र सरकारने दिलेल्या १८५० कोटींबरोबर राज्य सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे २ हजार कोटी रुपये दिले, तरच साखर कारखानदारी वाचणार आहे,

महेश जगताप, सोमेश्वरनगरउसाच्या एफआरपीसाठी केंद्र सरकारने दिलेल्या १८५० कोटींबरोबर राज्य सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे २ हजार कोटी रुपये दिले, तरच साखर कारखानदारी वाचणार आहे, अशी आग्रही भूमिका साखर कारखानदारांनी घेतली आहे. मात्र, केंद्राचे पैसे आम्हीच आणलेत, तर राज्याचे २ हजार कोटी मिळणार नसल्याची स्पष्ट भूमिका सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’कडे मांडली. तर, दुसरीकडे केंद्राच्या व राज्याच्या पॅकेजचे आम्हाला काही घेणे-देणे नाही. एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याजासह वर्ग करा, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. यामुळे एफआरपीचा तिढा वाढण्याची चिन्हे आहेत. सन २०१४-१५ चा साखर हंगाम संपून दोन महिने होतील. मात्र, अजूनही ऊसउत्पादक शेतकऱ्यांचा एफआरपीचा मुद्दा अडगळीत पडला आहे. दोन महिन्यांपूर्वी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऊस उत्पादकांसाठी २ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र, त्यावर काहीच निर्णय झाला नाही. त्यानंतर केंद्र सरकारने देशातील साखर कारखानदारीसाठी ६५०० कोटी रुपयांच्या घोषणेनंतर राज्य सरकारने केलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या घोषणेचा मुद्दा अडगळीतच पडला. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ६५०० कोटी रुपयांपैकी महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला १८५० कोटी रुपये येत आहेत. मात्र, या १८५० कोटींमधून उर्वरित ४०० ते ४५० रुपये एफआरपी अदा होऊच शकत नाही. यासाठी केंद्र सरकारचे १८५० कोटी व राज्य सरकारने २ हजार कोटी, असे ३८५० कोटी रुपये मदत मिळण्याची मागणी राज्यातील साखर कारखानदारांनी केली आहे. नुकतीच राज्यातील साखर कारखानदारांची गुप्त बैठक साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुलात पार पडली. या वेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सहकारतज्ज्ञ चंदरराव तावरे, माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे, भुर्इंज कारखान्याचे अध्यक्ष मदनराव भोसले, देवदत्त निकम यांच्यासह राज्यातील अनेक कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक उपस्थित होते. या वेळी साखर कारखानदारीबाबतीत अनेक विषयांवर चर्चा पार पडली. यामध्ये राज्यातील साखर कारखानदारीपुढे एफआरपीचे ४ हजार कोटींचे शॉर्ट मार्जीन असताना १८५० कोटी रुपयांत एफआरपी देणार कशी, असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यामुळे केंद्र सरकारच्या १८५० कोटी रुपयांत राज्य सरकारनेही पूर्वी जाहीर केलेले २ हजार कोटी रुपये द्यावेत, तरच एफआरपीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अन्यथा येणाऱ्या हंगामात अनेक कारखाने बंद ठेवावे लागतील. जर हे पैसे मिळाले नाहीत, तर अनेक कारखाने पुढील हंगामात चालू होणार नसल्याची भीती अनेक कारखानदारांनी व्यक्त केली. दरम्यान, आता एफआरपीचा मुद्दा आता पेटण्याची चिन्हे आहे. शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. ऊसउत्पादाकांना व्याजासह एफआरपी देण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. २२ जूनपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयापुढे आंदोलन करणार आहे. जोपर्यंत एफआरपीचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका खासदार शेट्टी यांनी घेतली आहे. राज्य शासन, साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांच्या तिढ्यात मात्र ऊसउत्पादक शेतकरी भरडून निघाला आहे. एकीकडे ऊस शेतीचा वाढलेला खर्च व दुसरीकडे अजून न मिळालेली एफआरपी यामध्ये शेतकरी हतबल झाला आहे. एफआरपीचे १८५० कोटी रुपये आम्हीच केंद्र सरकारकडून आणले. त्यामुळे राज्य सरकार अजून २ हजार कोटी रुपये वेगळे देणार नाही. या कर्जाचे केंद्र सरकार एक वर्ष व्याज भरणार असून, उर्वरित ४ वर्ष राज्य सरकारला व्याज भरावे लागणार आहे. - चंद्रकांत पाटील सहकारमंत्री

पॅकेजचे आम्हाला काही घेणे-देणे नाही. व्याजासह एफआरपी खात्यावर भरावी. कारखानदार पैसे नसल्याचे नाटक करीत शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचे काम करीत आहेत. जर पूर्ण एफआरपी दिली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे. - खासदार राजू शेट्टी नेते शेतकरी स्वाभिमानी संघटना

एफआरपी देण्यासाठी ४ हजार कोटी रुपयांचे शॉर्ट मार्जीन आहे. त्यामुळे १८५० रुपयांत कसे भागणार? जर पैसे मिळाले नाहीत, तर ऊसतोड व वाहतूक यंत्रणेसाठी पैसेच उपलब्ध झाले नाही, तर येणाऱ्या हंगामात अनेक कारखाने बंद राहतील. - पुरुषोत्तम जगताप अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना

कारखान्याच्या एमडींना भरमसाट पगार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळालेच पाहिजेत. राज्य सरकारकडून अनुदानाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. कर्जाच्या पॅकेजचे व्याज शासन भरणार आहे. एफआरपीचे पैसे १५ टकके व्याजासह द्यावेत. - पृथ्वीराज जाचक माजी अध्यक्ष, साखर संघ