शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

‘एफआरपी’साठी बारामतीत ठिय्या!

By admin | Updated: December 22, 2014 23:41 IST

छत्रपती कारखान्याने पहिली उचल एफआरपीनुसार २२०४ रुपये प्रतिटन द्यावी, या मागणीसाठी शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली

बारामती : छत्रपती कारखान्याने पहिली उचल एफआरपीनुसार २२०४ रुपये प्रतिटन द्यावी, या मागणीसाठी शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कृती समितीच्या वतीने काटाबंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र, जमावबंदीच्या आदेशामुळे काटाबंद ऐवजी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, बाळासाहेब कोळेकर, तानाजीराव थोरात, शिवाजीराव निंबाळकर, बाळासाहेब शिंदे, सतीश काटे, अ‍ॅड. शिवाजी थोरात, अ‍ॅड. संभाजीराव काटे, किशोर मासाळ, गणेशराव फडतरे, जयवंतराव जाचक आदींसह इतर ऊसउत्पादक उपस्थित होते. या वेळी जाचक म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारकिर्दीत सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढण्याचे काम जाणीवपूर्वक करण्यात आले. मात्र, आता सत्तापालट झाल्याने सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आणणारी मंडळी घरी बसली आहे. छत्रपती कारखान्याचा एफआरपीनुसार पहिला हप्ता २२०४ रुपये असूनदेखील १८०० रुपये देण्यात आला. खासगी कारखानदारांच्या हितासाठीच पहिली उचल ४०० रुपयाने कमी देण्यात आली. वास्तविक पाहता एफआरपी कायद्यानुसार पहिला हप्ता १४ दिवसांच्या आत न दिल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. गेल्या वर्षी आम्ही एफआरपी कमी दिल्याने न्यायालयात गेल्याने एफआरपीच्या फरकाची रक्कम कारखान्याला व्याजासह सभासदांना द्यावी लागली. याचा बोजा सभासदांवरच पडला आहे.