शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

टोलनाक्यांवरून मुक्तप्रवास! चालकांमध्ये समाधान

By admin | Updated: November 17, 2016 02:37 IST

नोटबंदीच्या निर्णयानंतर सध्या टोलनाक्यांवर टोलवसुली बंद असल्याने वाहने विनाअडथळा धावत असून टोलनाक्याजवळ होणारा वाहतूकखोळंबा थांबल्याने चालक समाधान व्यक्त करीत आहेत.

राजगुरुनगर : नोटबंदीच्या निर्णयानंतर सध्या टोलनाक्यांवर टोलवसुली बंद असल्याने वाहने विनाअडथळा धावत असून टोलनाक्याजवळ होणारा वाहतूकखोळंबा थांबल्याने चालक समाधान व्यक्त करीत आहेत. राजगुरूनगरच्या चांडोली टोलनाक्यावर त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळे चित्र दिसत होते. येत्या १८ तारखेपर्यंत आम्हाला कुठल्याही वाहनांकडून टोल घेऊ नयेत अशा आमच्या व्यवस्थापनाने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही फक्त कामावर हजर आहोत, पण टोलवसुली बंद आहे, असे आयआरबी कंपनीच्या चांडोली टोलनाक्याचे सहव्यवस्थापक नानासाहेब गायकवाड यांनी सांगितले. टोलवसुली नसल्याने वाहने या ठिकाणाहून मुक्तपणे जा-ये करीत होती. त्यामुळे टोलनाक्यावर नेहमी दिसणारे वाहने खोळंबल्याचे चित्र सध्या दिसत नाही. टोलनाक्यावरील टोलवसुली करणारी मुले त्यामुळे सक्तीची विश्रांती घेताना दिसत होती. मात्र टोलनाक्यावर थांबून हार, गजरा विकणारे विक्रेते केविलवाणे दिसत होते. ते हातातला हार दाखवून गाड्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत होते, पण टोलमुक्तीचा आनंद घेणारे वाहनचालक थांबत नव्हते. नाक्यावर थांबावे लागत नसल्याने आज हायसे वाटत आहे, असे एक वाहनचालक सुदाम थिगळे यांनी सांगितले. टोल भरण्यापेक्षा टोलनाक्यावर होणारी वाहतूककोंडी. कटकटी, वादावादी नको वाटते, असे ते म्हणाले. टोलनाका सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच विनाटोल जाणारी वाहने मी पाहत आहे. यापूर्वी एकदा मनसेचे आंदोलन झाले तेव्हा एक दिवस काही वेळासाठी टोल बंद होता. मध्यंतरी मराठा मोर्चाच्यावेळी एक दिवस काही वाहनांना सूट होती. पण आताएवढी मुक्त वाहतूक पहिल्यांदाच होत आहे, असे येथे जवळच नर्सरीचा व्यवसाय करणारे राजेश घुमटकर यांनी सांगितले. वाहन खरेदी करतानाच एकरकमी टोल घेतला गेला तर हि रोजची अडवणूक कमी होऊ शकेल अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने व्यक्त केली. (वार्ताहर)