शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

टोलनाक्यांवरून मुक्तप्रवास! चालकांमध्ये समाधान

By admin | Updated: November 17, 2016 02:37 IST

नोटबंदीच्या निर्णयानंतर सध्या टोलनाक्यांवर टोलवसुली बंद असल्याने वाहने विनाअडथळा धावत असून टोलनाक्याजवळ होणारा वाहतूकखोळंबा थांबल्याने चालक समाधान व्यक्त करीत आहेत.

राजगुरुनगर : नोटबंदीच्या निर्णयानंतर सध्या टोलनाक्यांवर टोलवसुली बंद असल्याने वाहने विनाअडथळा धावत असून टोलनाक्याजवळ होणारा वाहतूकखोळंबा थांबल्याने चालक समाधान व्यक्त करीत आहेत. राजगुरूनगरच्या चांडोली टोलनाक्यावर त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळे चित्र दिसत होते. येत्या १८ तारखेपर्यंत आम्हाला कुठल्याही वाहनांकडून टोल घेऊ नयेत अशा आमच्या व्यवस्थापनाने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही फक्त कामावर हजर आहोत, पण टोलवसुली बंद आहे, असे आयआरबी कंपनीच्या चांडोली टोलनाक्याचे सहव्यवस्थापक नानासाहेब गायकवाड यांनी सांगितले. टोलवसुली नसल्याने वाहने या ठिकाणाहून मुक्तपणे जा-ये करीत होती. त्यामुळे टोलनाक्यावर नेहमी दिसणारे वाहने खोळंबल्याचे चित्र सध्या दिसत नाही. टोलनाक्यावरील टोलवसुली करणारी मुले त्यामुळे सक्तीची विश्रांती घेताना दिसत होती. मात्र टोलनाक्यावर थांबून हार, गजरा विकणारे विक्रेते केविलवाणे दिसत होते. ते हातातला हार दाखवून गाड्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत होते, पण टोलमुक्तीचा आनंद घेणारे वाहनचालक थांबत नव्हते. नाक्यावर थांबावे लागत नसल्याने आज हायसे वाटत आहे, असे एक वाहनचालक सुदाम थिगळे यांनी सांगितले. टोल भरण्यापेक्षा टोलनाक्यावर होणारी वाहतूककोंडी. कटकटी, वादावादी नको वाटते, असे ते म्हणाले. टोलनाका सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच विनाटोल जाणारी वाहने मी पाहत आहे. यापूर्वी एकदा मनसेचे आंदोलन झाले तेव्हा एक दिवस काही वेळासाठी टोल बंद होता. मध्यंतरी मराठा मोर्चाच्यावेळी एक दिवस काही वाहनांना सूट होती. पण आताएवढी मुक्त वाहतूक पहिल्यांदाच होत आहे, असे येथे जवळच नर्सरीचा व्यवसाय करणारे राजेश घुमटकर यांनी सांगितले. वाहन खरेदी करतानाच एकरकमी टोल घेतला गेला तर हि रोजची अडवणूक कमी होऊ शकेल अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने व्यक्त केली. (वार्ताहर)