शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बारामतीत ‘प्लॅस्टिकमुक्त अभियान’

By admin | Updated: August 11, 2016 02:56 IST

‘प्लॅस्टिक मुक्त बारामती’ अभियान बारामती नगरपालिकेच्या वतीने आजपासून व्यापक स्वरूपात राबविण्यात आले आहे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक वजनाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या

बारामती : ‘प्लॅस्टिक मुक्त बारामती’ अभियान बारामती नगरपालिकेच्या वतीने आजपासून व्यापक स्वरूपात राबविण्यात आले आहे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक वजनाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज पहिल्याच दिवशी ५०० किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. मान्सूनच्या सुरुवातीला पडलेल्या पावसात बारामती शहरात ठिकठिकाणी गटारे तुंबली होती. पाऊस थांबल्यानंतर गटारे मोकळी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली तेव्हा, प्लॅस्टिक पिशव्यांमुळे गटारे तुंबल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगराध्यक्ष योगेश जगताप, मुख्याधिकारी निलेश देशमुख, आरोग्य अधिकारी उका राठोड यांनी प्लॅस्टिकमुक्त बारामती अभियान राबविण्याचे नियोजन केले. आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सागर भोसले, किरण साळवे, मोहन शिंदे, संजय लोंढे, विलास देवकाते या कर्मचारी पथकाने आजपासून प्लॅस्टिक मुक्त बारामतीचे अभियान जोरदारपणे सुरू केले आहे. यापूर्वी आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे आणि त्यांच्या पथकाने गणेश मंडईत प्लॅस्टिकमुक्त मंडई असे अभियान राबविण्यात आले होते. प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या फळ, भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी देखील प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या. पिशव्या बाळगल्यास दंडात्मक कारवाई केली जात होती. त्यामुळे ५० मायक्रॉनपेक्षा अधिक वजनाच्या पिशव्या मंडईमध्ये वापरल्या जात नाहीत. बहुतांश फळभाज्या विक्रेत्यांनी प्लॅस्टिक पिशव्याच ठेवण्याचे बंद केले आहे. याच अनुषंगाने बारामती शहरात प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. त्यामधून फक्त ५० मायक्रॉन वजनाच्या पिशव्या वगळण्यात आल्या आहेत. आज नगरपालिकेच्या पथकाने मोहीम सुरू केल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला. परंतु, जास्त वजनाच्या पिशव्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाची माहिती देण्यात आली. ज्या पिशव्यांवर बंदी आहे, त्या जप्त करण्यात आल्या. आज दिवसभरात ५०० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या. यापुढे संपूर्ण बारामती शहरात व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. बंदी असताना देखील पिशव्या बाळगल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे देखील सुचित करण्यात आले आहे. आजपासून प्लॅस्टिक मुक्त बारामतीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. यापुढे संपूर्ण शहर प्लॅस्टिक मुक्त करण्यावर भर देण्यात येणार आहे. ५० मायक्रॉनच्या पिशव्या देखील वापरू नये, यावर व्यापारी वर्गाचे प्रबोधन केले जाईल. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे जनावरांनी खाल्यास त्यांना धोका होतो. अनेक जनावरे दगावतात. प्लॅस्टिक बंदीनंतर पर्यायी व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. नाराळाच्या झावळ्यांपासून बनविलेले डिश वेगवेगळ्या समारंभात वापरणे योग्य आहे. त्या गाई, जनावरांनी खाल्यास त्यांना कोणताही धोका होत नाही. त्यामुळे यापुढे कागदी कापडी पिशव्यासह पर्यायी साधणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सर्वांच्या सहभागातूनच १०० टक्के प्लॅस्टिक मुक्त बारामती करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)