शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

बारामतीत ‘प्लॅस्टिकमुक्त अभियान’

By admin | Updated: August 11, 2016 02:56 IST

‘प्लॅस्टिक मुक्त बारामती’ अभियान बारामती नगरपालिकेच्या वतीने आजपासून व्यापक स्वरूपात राबविण्यात आले आहे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक वजनाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या

बारामती : ‘प्लॅस्टिक मुक्त बारामती’ अभियान बारामती नगरपालिकेच्या वतीने आजपासून व्यापक स्वरूपात राबविण्यात आले आहे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक वजनाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज पहिल्याच दिवशी ५०० किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. मान्सूनच्या सुरुवातीला पडलेल्या पावसात बारामती शहरात ठिकठिकाणी गटारे तुंबली होती. पाऊस थांबल्यानंतर गटारे मोकळी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली तेव्हा, प्लॅस्टिक पिशव्यांमुळे गटारे तुंबल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगराध्यक्ष योगेश जगताप, मुख्याधिकारी निलेश देशमुख, आरोग्य अधिकारी उका राठोड यांनी प्लॅस्टिकमुक्त बारामती अभियान राबविण्याचे नियोजन केले. आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सागर भोसले, किरण साळवे, मोहन शिंदे, संजय लोंढे, विलास देवकाते या कर्मचारी पथकाने आजपासून प्लॅस्टिक मुक्त बारामतीचे अभियान जोरदारपणे सुरू केले आहे. यापूर्वी आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे आणि त्यांच्या पथकाने गणेश मंडईत प्लॅस्टिकमुक्त मंडई असे अभियान राबविण्यात आले होते. प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या फळ, भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी देखील प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या. पिशव्या बाळगल्यास दंडात्मक कारवाई केली जात होती. त्यामुळे ५० मायक्रॉनपेक्षा अधिक वजनाच्या पिशव्या मंडईमध्ये वापरल्या जात नाहीत. बहुतांश फळभाज्या विक्रेत्यांनी प्लॅस्टिक पिशव्याच ठेवण्याचे बंद केले आहे. याच अनुषंगाने बारामती शहरात प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. त्यामधून फक्त ५० मायक्रॉन वजनाच्या पिशव्या वगळण्यात आल्या आहेत. आज नगरपालिकेच्या पथकाने मोहीम सुरू केल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला. परंतु, जास्त वजनाच्या पिशव्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाची माहिती देण्यात आली. ज्या पिशव्यांवर बंदी आहे, त्या जप्त करण्यात आल्या. आज दिवसभरात ५०० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या. यापुढे संपूर्ण बारामती शहरात व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. बंदी असताना देखील पिशव्या बाळगल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे देखील सुचित करण्यात आले आहे. आजपासून प्लॅस्टिक मुक्त बारामतीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. यापुढे संपूर्ण शहर प्लॅस्टिक मुक्त करण्यावर भर देण्यात येणार आहे. ५० मायक्रॉनच्या पिशव्या देखील वापरू नये, यावर व्यापारी वर्गाचे प्रबोधन केले जाईल. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे जनावरांनी खाल्यास त्यांना धोका होतो. अनेक जनावरे दगावतात. प्लॅस्टिक बंदीनंतर पर्यायी व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. नाराळाच्या झावळ्यांपासून बनविलेले डिश वेगवेगळ्या समारंभात वापरणे योग्य आहे. त्या गाई, जनावरांनी खाल्यास त्यांना कोणताही धोका होत नाही. त्यामुळे यापुढे कागदी कापडी पिशव्यासह पर्यायी साधणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सर्वांच्या सहभागातूनच १०० टक्के प्लॅस्टिक मुक्त बारामती करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)