शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

शहरातील २०० ठिकाणांवर मिळणार मोफत इंटरनेट

By admin | Updated: January 2, 2017 02:35 IST

महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्पांर्तगत शहरातील प्रमुख २०० सार्वजनिक ठिकाणांवर वाय-फाय सुविधा कार्यान्वित करून मोफत इंटरनेट उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पुणे : महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्पांर्तगत शहरातील प्रमुख २०० सार्वजनिक ठिकाणांवर वाय-फाय सुविधा कार्यान्वित करून मोफत इंटरनेट उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ठिकाणांवरून अर्ध्या तासामध्ये ५० एमबीपर्यंत इंटरनेट मिळू शकणार आहे. प्रमुख पर्यटनस्थळे, बसथांबे, बगीचे, हॉस्पिटल आदी सार्वजनिक ठिकाणांवर ही वाय-फाय सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या मोबाइलवर इंटरनेट सुविधा उपलब्ध असणे ही मूलभूत गरज झाली आहे. कॅशलेस व्यवस्थेचा पुरस्कार करताना मोबाइल बँकिंग व व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे, त्यासाठी इंटरनेट ही निकडीची गरज ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकांवर मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचबरोबर काही नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर मोफत इंटरनेट देण्याचा उपक्रम राबविला होता. आता पालिकेच्या वतीनेच वाय-फायद्वारे मोफत इंटरनेट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली आहे.शहराला मोफत इंटरनेटसह वाय-फायसह इमर्जन्सी बॉक्स, पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम, व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले आणि एन्व्हायर्नमेंटल सेन्सर्स आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १४० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. या सेवांचे कंट्रोल बाणेर येथील अद्यवयात नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे. सुरक्षा-आपत्कालीन स्थितीत अत्यंत कमी वेळात संपर्क साधता यावा, यासाठीची एक यंत्रणा उभारली जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या संदेशांचे फलक शहरात ठिकठिकाणी बसविले जाणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मोफत इंटरनेटबरोबरच इतरही महत्त्वपूर्ण सुविधा दिल्या जाणार आहेत. शहराचे पर्यावरण सुस्थितीत राहावे यासाठी विविध ५० ठिकाणी इन्व्हायरन्मेंट मॉनिटरिंग सिस्टिम बसविल्या जाणार आहेत. तापमान, हवेची गुणवत्ता, ध्वनिप्रदूषण आदींचा अभ्यास या सिस्टीमद्वारे केला जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची अचूक माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर शहरात १२५ ठिकाणी महत्त्वाचे संदेश देण्याची यंत्रणा उभारली जाणार आहे. आत्पकालीन परिस्थितीमध्ये तसेच आवश्यक त्या सूचना देण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी ठरणार आहे. विशेषत: पोलिसांना याचा खूपच उपयोग होऊ शकेल. आपद्कालीन प्रतिसाद यंत्रणेद्वारे नागरिकांना कमीत कमी वेळात मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)