शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बाह्यवळण की चौपदरीकरण?

By admin | Updated: December 29, 2014 23:20 IST

पुणे-नाशिक महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणासाठी एकीकडे भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच महामार्गाच्या रुंदीरकण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहेत.

निनाद देशमुख ल्ल पुणे पुणे-नाशिक महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणासाठी एकीकडे भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच महामार्गाच्या रुंदीरकण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहेत. यामुळे मूळ रस्त्याचे चौपदरीकरण होणार, की बाह्यवळण या संभ्रमात येथील शेतकरी आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर चौक, खेड घाट, पेठ घाट, अवसरी घाट, मंचर, कळंब, नारायणगाव बसस्थानक, तसेच आळेफाट्याजवळील कुकडी नदीवरच्या अरुंद पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. या रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी व जलद वाहतुकीसाठी खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांत बाह्यवळण प्रस्तावित आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकीकडे जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांच्या सातबारावर शिक्के मारले जात आहे. त्याचबरोबर आहे त्या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहे. यामुळे बाह्यवळण होणार की चौपदरीकरण याबाबतची संभ्रमावस्था वाढली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव आणि खेड या परिसरात बाह्यवळण प्रस्तावित आहे. यासाठी जमिनींचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. आतापर्यंत मोजणीसाठी आलेल्या अनेक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले आहे. एकीकडे गुंठ्याला ५ लाख रुपये भाव असताना ज्यांच्या जमिनी या बाह्यवळणात जात आहे, त्यांना केवळ गुंठ्याला ६० हजार रुपये भाव देण्यात येत आहे. बहुतांशी शेतकरी या प्रक्रियेमुळे भूमिहीन होणार असल्याने त्यांचाही या रस्त्याला विरोध आहे. बाह्यवळण न करता आहे त्या मार्गाचेच रुंदीकरण करण्यात यावे, अशी त्यांचीभूमिका आहे. कळंब, एकलहरे परिसरातील मोठ्या प्रमाणात झाले रस्ता रुंदीकरणासाठी तोडली जात आहे. या झाडांची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. शेतकऱ्यांचा बाह्यवळणाला विरोध आहे. शासनाने आहे त्या रस्त्याचे रुंदीकरण करावे. असे झाल्यास काही प्रमाणात जमिनी जातील, तसेच या रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्नही सुटेल. प्रभाकर बांगर अध्यक्ष, शेतकरी बचाव कृती समितीजुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीही मोठ्या प्रमाणात अनेक प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत. आता परत या रस्त्यासाठी जमिनी गेल्यास शेतकरी भूमिहीन होणार आहे. भविष्यातही रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहीत होतील. यामुळे शेतकऱ्यांची जमिनी देण्याची मानसिकता नाही. - महेश शिंदे शेतकरी, नारायणगाव४केंद्र शासनाने या रस्त्याचे काम पुणे-नाशिक महामार्ग विभाग क्र. ६२ कडून काढून घेतले आहे. ते केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग नाशिक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या विभागाने चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पुणे-नाशिक महामार्गालगत असलेली सर्व मोठी झाडे तोडण्यात आली आहे. ४मात्र, रस्ता रुंदीकरणासाठी ज्या ज्या ठिकाणी बाह्यवळण आहे, त्या त्या ठिकाणी जागांचा ताबा अद्याप घेतलेला नाही़ पुणे-नाशिक महामार्गावरील खेड, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा या पाच गावांमध्ये बाह्यवळण प्रस्तावित आहे. नगर जिल्ह्यातील बोटा आणि नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे या गावांमध्ये बाह्यवळण (बायपास) करण्यात येणार आहे़ खेड ते सिन्नर असे १३५ किलोमीटरचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी १ हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे़ हे काम २०१६पर्यंत होणे अपेक्षित आहे. या चौपदरीकरणाच्या दरम्यान चाळकवाडी व संगमनेरजवळ असे दोन टोलनाके उभारण्यात येणार आहे़दोन वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मार्गाचे काम चौपदरी एवजी सहा पदरी करण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. मात्र, राजकीय उदासिनतेमुळे हा प्रस्ताव तसाच राहिला.बाह्यवळणासाठी अजून जमिनींचे भूसंपादन झालेले नाही. जोपर्यंत आम्हाला जमिनी मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला कामे करता येणार नाही. नारायणगाव ते आळाफाटादरम्यानचा रस्ता मोठा करण्यासाठी झाडे तोडणे आवश्यक आहे. त्यामुळे ती तोडली जात आहे. जवळपास १२ ते १३ किलोमीटर परिसरातील रस्ता रुंदीकरणामध्ये येणारी झाडे तोडावी लागणार आहे.- डी. एस. झोडगे, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक