शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

बाह्यवळण की चौपदरीकरण?

By admin | Updated: December 29, 2014 23:20 IST

पुणे-नाशिक महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणासाठी एकीकडे भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच महामार्गाच्या रुंदीरकण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहेत.

निनाद देशमुख ल्ल पुणे पुणे-नाशिक महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणासाठी एकीकडे भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच महामार्गाच्या रुंदीरकण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहेत. यामुळे मूळ रस्त्याचे चौपदरीकरण होणार, की बाह्यवळण या संभ्रमात येथील शेतकरी आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर चौक, खेड घाट, पेठ घाट, अवसरी घाट, मंचर, कळंब, नारायणगाव बसस्थानक, तसेच आळेफाट्याजवळील कुकडी नदीवरच्या अरुंद पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. या रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी व जलद वाहतुकीसाठी खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांत बाह्यवळण प्रस्तावित आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकीकडे जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांच्या सातबारावर शिक्के मारले जात आहे. त्याचबरोबर आहे त्या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहे. यामुळे बाह्यवळण होणार की चौपदरीकरण याबाबतची संभ्रमावस्था वाढली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव आणि खेड या परिसरात बाह्यवळण प्रस्तावित आहे. यासाठी जमिनींचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. आतापर्यंत मोजणीसाठी आलेल्या अनेक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले आहे. एकीकडे गुंठ्याला ५ लाख रुपये भाव असताना ज्यांच्या जमिनी या बाह्यवळणात जात आहे, त्यांना केवळ गुंठ्याला ६० हजार रुपये भाव देण्यात येत आहे. बहुतांशी शेतकरी या प्रक्रियेमुळे भूमिहीन होणार असल्याने त्यांचाही या रस्त्याला विरोध आहे. बाह्यवळण न करता आहे त्या मार्गाचेच रुंदीकरण करण्यात यावे, अशी त्यांचीभूमिका आहे. कळंब, एकलहरे परिसरातील मोठ्या प्रमाणात झाले रस्ता रुंदीकरणासाठी तोडली जात आहे. या झाडांची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. शेतकऱ्यांचा बाह्यवळणाला विरोध आहे. शासनाने आहे त्या रस्त्याचे रुंदीकरण करावे. असे झाल्यास काही प्रमाणात जमिनी जातील, तसेच या रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्नही सुटेल. प्रभाकर बांगर अध्यक्ष, शेतकरी बचाव कृती समितीजुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीही मोठ्या प्रमाणात अनेक प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत. आता परत या रस्त्यासाठी जमिनी गेल्यास शेतकरी भूमिहीन होणार आहे. भविष्यातही रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहीत होतील. यामुळे शेतकऱ्यांची जमिनी देण्याची मानसिकता नाही. - महेश शिंदे शेतकरी, नारायणगाव४केंद्र शासनाने या रस्त्याचे काम पुणे-नाशिक महामार्ग विभाग क्र. ६२ कडून काढून घेतले आहे. ते केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग नाशिक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या विभागाने चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पुणे-नाशिक महामार्गालगत असलेली सर्व मोठी झाडे तोडण्यात आली आहे. ४मात्र, रस्ता रुंदीकरणासाठी ज्या ज्या ठिकाणी बाह्यवळण आहे, त्या त्या ठिकाणी जागांचा ताबा अद्याप घेतलेला नाही़ पुणे-नाशिक महामार्गावरील खेड, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा या पाच गावांमध्ये बाह्यवळण प्रस्तावित आहे. नगर जिल्ह्यातील बोटा आणि नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे या गावांमध्ये बाह्यवळण (बायपास) करण्यात येणार आहे़ खेड ते सिन्नर असे १३५ किलोमीटरचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी १ हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे़ हे काम २०१६पर्यंत होणे अपेक्षित आहे. या चौपदरीकरणाच्या दरम्यान चाळकवाडी व संगमनेरजवळ असे दोन टोलनाके उभारण्यात येणार आहे़दोन वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मार्गाचे काम चौपदरी एवजी सहा पदरी करण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. मात्र, राजकीय उदासिनतेमुळे हा प्रस्ताव तसाच राहिला.बाह्यवळणासाठी अजून जमिनींचे भूसंपादन झालेले नाही. जोपर्यंत आम्हाला जमिनी मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला कामे करता येणार नाही. नारायणगाव ते आळाफाटादरम्यानचा रस्ता मोठा करण्यासाठी झाडे तोडणे आवश्यक आहे. त्यामुळे ती तोडली जात आहे. जवळपास १२ ते १३ किलोमीटर परिसरातील रस्ता रुंदीकरणामध्ये येणारी झाडे तोडावी लागणार आहे.- डी. एस. झोडगे, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक