शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

चार तालुके हगणदरीमुक्त

By admin | Updated: December 26, 2016 02:47 IST

३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद प्रशासनाने सोडला असून आतापर्यंत १३ पैैकी ४ तालुके हगणदरीमुक्त करण्यात यश आले

पुणे : ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद प्रशासनाने सोडला असून आतापर्यंत १३ पैैकी ४ तालुके हगणदरीमुक्त करण्यात यश आले असून हवेली तालुका ३१ डिसेंबरपर्यंत होऊ शकतो. या मोहिमेला गती देण्यासाठी आता प्रशासनाने प्रोत्साहनपर बक्षीस योजनाही जाहीर केली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाच्याआदेशानुसार जिल्हा हगणदरीमुक्तीची मोहीम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. १३ तालुक्यांपैैकी मुळशी तालुका यापूर्वी झाला होता. उर्वरित १२ तालुके ३१ डिसेंबरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद प्रशासनाने सोडला आहे. मात्र याला आता फक्त आठवडा उरला असून ते टार्गेट अशक्य आहे. मात्र शासनाने दिलेल्या मुदतीत ते करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत भोर, वेल्हा व खेड हे तीन तालुके या मोहिमेत हगणदरीमुक्त झाले आहेत. हवेली तालुका ९७.२३ टक्के झाला असून या आठवडाभरात ते टार्गेट पूर्ण होऊ शकते. या मोहिमेला गती देण्यासाठी आतापर्र्यंत प्रशासनाने विद्यार्थ्यांमार्फत शौचालय नसलेल्या लाभार्थ्याला पत्र पाठवून ते बांधण्याचे आवाहन केले. घरभेटी करून त्याचे महत्त्व पटवून दिले, भाऊबीज भेट यांसह हगणदरीमुक्त गट झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांना मानपत्र हा नावीन्यपूर्ण उपक्रमही राबविण्यात येत आहे. तसेच १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत ठराव करून ज्यांच्याकडे शौचालये नाहीत, त्यांच्या मूलभूत सुविधाही बंद करण्याचा इशारा देण्यात आला. आता या मोहिमेला आणखी गती देण्यासाठी लोकसहभागाचे आवाहन केले होते. याला ग्रामसेवक संघटना दौैंड, खेड, शिरूर, आरोग्य कर्मचारी संघटना इंदापूर, दौैंड, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना दौंड, एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कर्मचारी संघटना दौैंड, लिपिकवर्गीय संघटना दौैंड व पशुसंवर्धन विभाग दौैंड यांनी त्या त्या तालुक्यातील गावे हगणदरीमुक्तसाठी दत्तक घेतली आहेत.मानपत्र आणि बक्षीस योजनाया मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या संकल्पनेतून सुरुवातीला जो जिल्हा परिषद गट व तालुका हगणदरीमुक्त होईल त्यांना मानपत्र देण्यात येत आहे. आता लोकसहभागाद्वारे गावे हगणदरीमुक्त करण्याचे ठरविले असून यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. या कामात व्यापक स्वरूप देऊन सर्व घटकांचा स्वच्छ भारत मिशन कामात सहभाग वाढावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ५१ कुटुंबांपेक्षा जास्त शौचालये राहिलेली गावे दत्तक घेऊन तिथे शौचालये बांधणाऱ्यास मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.