शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

शेती उत्पादन वाढीसाठी राज्याच्या चार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारने त्यांना साह्य करणाऱ्या चार योजना जाहीर केल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारने त्यांना साह्य करणाऱ्या चार योजना जाहीर केल्या आहेत. राज्याचे सहा विभाग करून त्यांच्या कार्यक्षेत्रात या योजना लागू केल्या आहेत. केंद्र सरकारनेही यात राज्याला साह्य केले असून परराज्यात माल पोहचवण्यासाठी शेतकऱ्यांना रेल्वे डबे उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्या दरात ५० टक्के अनुदानही जाहीर केले आहे.

शेतमाल उत्पादनानुसार राज्याचे सहा विभाग करण्यात आले आहे. यानुसार पिकांचा दर्जा आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. यासाठी राज्य सरकारने एक आराखडा तयार केला असून त्यात या चार योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. शेतमाल पिकवण्यापासून बाजारपेठेत विक्री करेपर्यंत शेतकऱ्याला साह्य करण्यात येणार आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेती योजनेत शेतमालाची नोंद करायची आहे. त्यानंतर शेतमाल दर्जा वाढीच्या उपाययोजना, तो कोणत्या बाजारपेठेत कोणत्या दराने कधी विकला जाईल याची माहिती शेतकऱ्याला दिली जाईल. ‘वन डिस्ट्रीक्ट’ मध्ये जिल्ह्यातील शेतीचा अभ्यास करून तिथे कोणता माल जास्त चांगला पिकू शकतो याचा अभ्यास करुन ‘विकेल ते पिकेल’ या सूत्रानुसान उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले जाईल. ‘किसान रेल’मध्ये सोलापूर, नाशिक व विदर्भातून परराज्यात शेतमाल वाहतुकीसाठी रेल्वे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या वाहतुकीसाठी शेतकऱ्याला दरात ५० टक्के अनुदानही दिले जाणार आहे.

“शेतमालाच्या दर्जात वाढ व्हावी, निर्यातीचे निकष स्थानिक बाजारपेठेतही पाळले जावेत असा सरकारचा उद्देश आहे. केंद्र व राज्याचे कृषी खाते आणि संबंधित विविध विभागांनी यासाठी एकत्रितपणे प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे शेतीला राज्यात चांगली गती मिळत आहे,” असे राज्याच्या निर्यात कक्षाचे सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले.