शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

शेती उत्पादन वाढीसाठी राज्याच्या चार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारने त्यांना साह्य करणाऱ्या चार योजना जाहीर केल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारने त्यांना साह्य करणाऱ्या चार योजना जाहीर केल्या आहेत. राज्याचे सहा विभाग करून त्यांच्या कार्यक्षेत्रात या योजना लागू केल्या आहेत. केंद्र सरकारनेही यात राज्याला साह्य केले असून परराज्यात माल पोहचवण्यासाठी शेतकऱ्यांना रेल्वे डबे उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्या दरात ५० टक्के अनुदानही जाहीर केले आहे.

शेतमाल उत्पादनानुसार राज्याचे सहा विभाग करण्यात आले आहे. यानुसार पिकांचा दर्जा आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. यासाठी राज्य सरकारने एक आराखडा तयार केला असून त्यात या चार योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. शेतमाल पिकवण्यापासून बाजारपेठेत विक्री करेपर्यंत शेतकऱ्याला साह्य करण्यात येणार आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेती योजनेत शेतमालाची नोंद करायची आहे. त्यानंतर शेतमाल दर्जा वाढीच्या उपाययोजना, तो कोणत्या बाजारपेठेत कोणत्या दराने कधी विकला जाईल याची माहिती शेतकऱ्याला दिली जाईल. ‘वन डिस्ट्रीक्ट’ मध्ये जिल्ह्यातील शेतीचा अभ्यास करून तिथे कोणता माल जास्त चांगला पिकू शकतो याचा अभ्यास करुन ‘विकेल ते पिकेल’ या सूत्रानुसान उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले जाईल. ‘किसान रेल’मध्ये सोलापूर, नाशिक व विदर्भातून परराज्यात शेतमाल वाहतुकीसाठी रेल्वे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या वाहतुकीसाठी शेतकऱ्याला दरात ५० टक्के अनुदानही दिले जाणार आहे.

“शेतमालाच्या दर्जात वाढ व्हावी, निर्यातीचे निकष स्थानिक बाजारपेठेतही पाळले जावेत असा सरकारचा उद्देश आहे. केंद्र व राज्याचे कृषी खाते आणि संबंधित विविध विभागांनी यासाठी एकत्रितपणे प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे शेतीला राज्यात चांगली गती मिळत आहे,” असे राज्याच्या निर्यात कक्षाचे सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले.