शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

खुनी हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक

By admin | Updated: October 5, 2015 01:59 IST

पूर्वीच्या भांडणातील रागातून एकावर तलवार, लाकडी बॅट व स्टंपच्या सहाय्याने खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : पूर्वीच्या भांडणातील रागातून एकावर तलवार, लाकडी बॅट व स्टंपच्या सहाय्याने खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मयूर बाळासाहेब चव्हाण (वय २६, रा. मंगळवार पेठ), शब्बीर ऊर्फ इम्रान तौफिक शेख (वय २२, रा. सोमवार पेठ) सागर भुजंग नायडू (वय १९, रा. मंगळवार पेठ) आणि गणेश नागेश कलकुटवार (वय २१, रा. मंगळवार पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विनायक अरुण कदम (वय ३५, रा. सोमवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कदम व आरोपी मयूर यांच्यात २००८ मध्ये भांडण झाले होते. त्यामध्ये कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण त्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली. याचा राग मनात धरून मयूरने इतर तीन आरोपींशी संगनमत करून कदम यांच्यावर शनिवारी रात्री आठ वाजता सोमवार पेठेतील क्रांतिवीर नानासाहेब पाटील चौकात हल्ला केला. यात कदम गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी त्यांना लाकडी बॅट व स्टंपने मारहाण केली आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)कमी भावात जमीन देण्याचे आमिष दाखवून फसवणूकपुणे : रत्नागिरी येथील शेतजमीन कमी भावात मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांची एकूण ५ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आनंद विश्वेश्वर जोशी (वय ४७, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वीरेंद्र विश्वनाथ देशपांडे (वय ६४, रा. रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील शैलेश शशिकुमार सावंत (रा. चिपळूण) हा आरोपी फरार आहे. मार्च २०१३ ते मार्च २०१५ या कालावधीत आरोपींनी फिर्यादीसह आणखी काही जणांची फसवणूक केली आहे. आरोपींनी रत्नागिरी जिल्ह्यातील तलसर येथील शेतजमीन कमी किमतीत विकत घेऊन देण्याचे आमिष फिर्यादींना दाखविले. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी धनादेशाद्वारे ५ लाख ६१ हजार रुपये घेतले. मात्र, कोणताही लेखी स्वरुपाचा करार न करता त्यांची फसवणूक केली.