शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

खुनी हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक

By admin | Updated: October 5, 2015 01:59 IST

पूर्वीच्या भांडणातील रागातून एकावर तलवार, लाकडी बॅट व स्टंपच्या सहाय्याने खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : पूर्वीच्या भांडणातील रागातून एकावर तलवार, लाकडी बॅट व स्टंपच्या सहाय्याने खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मयूर बाळासाहेब चव्हाण (वय २६, रा. मंगळवार पेठ), शब्बीर ऊर्फ इम्रान तौफिक शेख (वय २२, रा. सोमवार पेठ) सागर भुजंग नायडू (वय १९, रा. मंगळवार पेठ) आणि गणेश नागेश कलकुटवार (वय २१, रा. मंगळवार पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विनायक अरुण कदम (वय ३५, रा. सोमवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कदम व आरोपी मयूर यांच्यात २००८ मध्ये भांडण झाले होते. त्यामध्ये कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण त्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली. याचा राग मनात धरून मयूरने इतर तीन आरोपींशी संगनमत करून कदम यांच्यावर शनिवारी रात्री आठ वाजता सोमवार पेठेतील क्रांतिवीर नानासाहेब पाटील चौकात हल्ला केला. यात कदम गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी त्यांना लाकडी बॅट व स्टंपने मारहाण केली आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)कमी भावात जमीन देण्याचे आमिष दाखवून फसवणूकपुणे : रत्नागिरी येथील शेतजमीन कमी भावात मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांची एकूण ५ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आनंद विश्वेश्वर जोशी (वय ४७, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वीरेंद्र विश्वनाथ देशपांडे (वय ६४, रा. रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील शैलेश शशिकुमार सावंत (रा. चिपळूण) हा आरोपी फरार आहे. मार्च २०१३ ते मार्च २०१५ या कालावधीत आरोपींनी फिर्यादीसह आणखी काही जणांची फसवणूक केली आहे. आरोपींनी रत्नागिरी जिल्ह्यातील तलसर येथील शेतजमीन कमी किमतीत विकत घेऊन देण्याचे आमिष फिर्यादींना दाखविले. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी धनादेशाद्वारे ५ लाख ६१ हजार रुपये घेतले. मात्र, कोणताही लेखी स्वरुपाचा करार न करता त्यांची फसवणूक केली.