शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर, परंतु आझाद मैदान सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील ठाम
3
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
4
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
5
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
6
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
7
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
8
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
9
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
10
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
11
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
12
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
13
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
14
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
15
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
16
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
17
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
18
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
19
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
20
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'

खुनी हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक

By admin | Updated: October 5, 2015 01:59 IST

पूर्वीच्या भांडणातील रागातून एकावर तलवार, लाकडी बॅट व स्टंपच्या सहाय्याने खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : पूर्वीच्या भांडणातील रागातून एकावर तलवार, लाकडी बॅट व स्टंपच्या सहाय्याने खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मयूर बाळासाहेब चव्हाण (वय २६, रा. मंगळवार पेठ), शब्बीर ऊर्फ इम्रान तौफिक शेख (वय २२, रा. सोमवार पेठ) सागर भुजंग नायडू (वय १९, रा. मंगळवार पेठ) आणि गणेश नागेश कलकुटवार (वय २१, रा. मंगळवार पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विनायक अरुण कदम (वय ३५, रा. सोमवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कदम व आरोपी मयूर यांच्यात २००८ मध्ये भांडण झाले होते. त्यामध्ये कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण त्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली. याचा राग मनात धरून मयूरने इतर तीन आरोपींशी संगनमत करून कदम यांच्यावर शनिवारी रात्री आठ वाजता सोमवार पेठेतील क्रांतिवीर नानासाहेब पाटील चौकात हल्ला केला. यात कदम गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी त्यांना लाकडी बॅट व स्टंपने मारहाण केली आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)कमी भावात जमीन देण्याचे आमिष दाखवून फसवणूकपुणे : रत्नागिरी येथील शेतजमीन कमी भावात मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांची एकूण ५ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आनंद विश्वेश्वर जोशी (वय ४७, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वीरेंद्र विश्वनाथ देशपांडे (वय ६४, रा. रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील शैलेश शशिकुमार सावंत (रा. चिपळूण) हा आरोपी फरार आहे. मार्च २०१३ ते मार्च २०१५ या कालावधीत आरोपींनी फिर्यादीसह आणखी काही जणांची फसवणूक केली आहे. आरोपींनी रत्नागिरी जिल्ह्यातील तलसर येथील शेतजमीन कमी किमतीत विकत घेऊन देण्याचे आमिष फिर्यादींना दाखविले. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी धनादेशाद्वारे ५ लाख ६१ हजार रुपये घेतले. मात्र, कोणताही लेखी स्वरुपाचा करार न करता त्यांची फसवणूक केली.