शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

वीज दुर्घटनेतील मृत मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:09 IST

नसरापूर-चेलाडी येथे दोन मे रोजी सीमा अरुण हिलम (वय ११), अनिता सिकंदर मोरे (वय ९) आणि चांदणी प्रकाश जाधव ...

नसरापूर-चेलाडी येथे दोन मे रोजी सीमा अरुण हिलम (वय ११), अनिता सिकंदर मोरे (वय ९) आणि चांदणी प्रकाश जाधव (वय ९) या मुली घरापासून जवळ असलेल्या डोंगरालगत खेळत होत्या. त्यावेळी वीज अंगावर पडून सीमा आणि अनिता या दोघींचा मृत्यू झाला तर चांदणी ही जखमी झाली होती. भोर वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, भोर तहसीलदार अजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समितीचे उपसभापती लहूनाना शेलार, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, जालिंदर बरकडे, नसरापूरच्या सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, खरेदी-विक्री संघाचे संचालक बाबू झोरे, ग्रा. पं. सदस्य नामदेव चव्हाण, दत्त दिगंबर वाहतूक संस्थेचे चेअरमन उत्तम थोपटे, सामाजिक कार्यकर्ते अनिल शेटे, शंकर शेटे, राजू वाल्हेकर आदी हिलम आणि मोरे कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

या दुर्घटनेनंतर नैसर्गिक आपत्ती साहाय्यता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. त्याकरीता आमदार संग्राम थोपटे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या बाबतची मागणी करण्यात आली होती. त्याकरीता जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे दाखल झालेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी शासनाच्या नियमांच्या आधीन राहून तातडीने आर्थिक मदत करावी, असा आदेश दिले होते त्यानुसार ही मदत मृत कुटुंबीयांच्या वारसांना तातडीने धनादेशाद्वारे आर्थिक मदत देण्यात आली.

२२ नसरापूर

दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश देताना संग्राम थोपटे, राजेंद्र जाधव, अजित पाटील व इतर.