शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सूर्योदयानंतर चार तासांत करा घटस्थापना, आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:51 IST

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव. हा उत्सव म्हणजे भक्ती, शक्ती आणि पराक्रम यांची उपासना.

पुणे : आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव. हा उत्सव म्हणजे भक्ती, शक्ती आणि पराक्रम यांची उपासना. संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू तुकाराम आदी संतांनीसुद्धा कुलदेवीच्या उपासनेचे समर्थन त्यांच्या अभंगामध्ये केले आहे. उद्यापासून (गुरुवारी) शारदीय नवरात्राला प्रारंभ होत आहे. तरी देवीच्या घटस्थापनेसाठी कुठलाही अमृत वा इतर लाभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही. सप्तशती या ग्रंथांमध्ये देवी उपासना ही प्रात:काळी करण्यात यावी, असे सांगितले आहे. त्यामुळे घटस्थापनेसाठी सूर्योदयापासून पुढील चार तास हा सर्वोत्तम काळ आहे, असे देशपांडे पंचांगकर्ते गौरवशास्त्री देशपांडे यांनी सांगितले.देशपांडे म्हणाले, की शारदीय नवरात्र संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी प्रामुख्याने महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रिगुणात्मक स्वरूपातील देवींच्या विविध रूपांची म्हणजेच कुलदेवीचीच मनोभावे पूजन करण्याचा प्रयत्न करतो. या उत्सवात घटस्थापना, मालाबंधन, वेदिकापूजन, कुमारिकापूजन या विधींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्त्रीशक्ती नवरात्र महोत्सवाचा अविभाज्य घटक आहे, याचा दाखला आपल्याला सप्तशती किंवा देवीमाहात्म्य ग्रंथात मिळतो. त्यात दोन वर्षे ते दहा वर्षांदरम्यानच्या मुलींना कुमारिका असे संबोधले गेले आहे. यातील प्रत्येक वर्षाच्या मुलीला रोहिणी, कल्याणी, सुभद्रा अशा विविध नावांनी संबोधले जाते. कुमारिका पूजनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष आदी चारही पुरुषार्थ उत्तम प्रकारे सिद्ध होतात. या नवरात्रातील उपासना म्हणून देवीच्या नाममंत्राचा जप, दुर्गास्तोत्र, कनकधारा, अर्गला आदी स्तोत्रांचे पठण करता येते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सांगायचे झाले तर हे नवरात्र झोपाळा या वाहनावर आहे. हे वाहन धनधान्याच्या समृध्द्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे शेतकºयांसाठी या वर्षीचे नवरात्र फलदायी असणार आहे. तसेच घागर फुंकणे या नवरात्रातील विधीला महत्त्व आहे, असे सांगत त्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.शहरात घटस्थापनेच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. तसेच, कुटुंबासह मंदिरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शहरातील सारसबागेजवळचे महालक्ष्मी मंदिर, पद्मावती, तळजाई, चतु:शृंगी, भवानी पेठेतील भवानीमाता मंदिर आदी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.या मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, होमहवन, कथासप्ताह अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शहरात पावसाने चांगलाच जोर पकडल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. मातीचा घट, फुले, फळे, पूजा साहित्य खरेदीसाठी शहरातील मंडई,मार्केट यार्ड आदी मध्यवर्ती भागांत नागरिकांनी गर्दी केली आहे. शहरातील वातावरण भक्तिरंगात न्हाऊन निघाले आहे.