शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सूर्योदयानंतर चार तासांत करा घटस्थापना, आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:51 IST

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव. हा उत्सव म्हणजे भक्ती, शक्ती आणि पराक्रम यांची उपासना.

पुणे : आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव. हा उत्सव म्हणजे भक्ती, शक्ती आणि पराक्रम यांची उपासना. संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू तुकाराम आदी संतांनीसुद्धा कुलदेवीच्या उपासनेचे समर्थन त्यांच्या अभंगामध्ये केले आहे. उद्यापासून (गुरुवारी) शारदीय नवरात्राला प्रारंभ होत आहे. तरी देवीच्या घटस्थापनेसाठी कुठलाही अमृत वा इतर लाभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही. सप्तशती या ग्रंथांमध्ये देवी उपासना ही प्रात:काळी करण्यात यावी, असे सांगितले आहे. त्यामुळे घटस्थापनेसाठी सूर्योदयापासून पुढील चार तास हा सर्वोत्तम काळ आहे, असे देशपांडे पंचांगकर्ते गौरवशास्त्री देशपांडे यांनी सांगितले.देशपांडे म्हणाले, की शारदीय नवरात्र संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी प्रामुख्याने महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रिगुणात्मक स्वरूपातील देवींच्या विविध रूपांची म्हणजेच कुलदेवीचीच मनोभावे पूजन करण्याचा प्रयत्न करतो. या उत्सवात घटस्थापना, मालाबंधन, वेदिकापूजन, कुमारिकापूजन या विधींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्त्रीशक्ती नवरात्र महोत्सवाचा अविभाज्य घटक आहे, याचा दाखला आपल्याला सप्तशती किंवा देवीमाहात्म्य ग्रंथात मिळतो. त्यात दोन वर्षे ते दहा वर्षांदरम्यानच्या मुलींना कुमारिका असे संबोधले गेले आहे. यातील प्रत्येक वर्षाच्या मुलीला रोहिणी, कल्याणी, सुभद्रा अशा विविध नावांनी संबोधले जाते. कुमारिका पूजनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष आदी चारही पुरुषार्थ उत्तम प्रकारे सिद्ध होतात. या नवरात्रातील उपासना म्हणून देवीच्या नाममंत्राचा जप, दुर्गास्तोत्र, कनकधारा, अर्गला आदी स्तोत्रांचे पठण करता येते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सांगायचे झाले तर हे नवरात्र झोपाळा या वाहनावर आहे. हे वाहन धनधान्याच्या समृध्द्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे शेतकºयांसाठी या वर्षीचे नवरात्र फलदायी असणार आहे. तसेच घागर फुंकणे या नवरात्रातील विधीला महत्त्व आहे, असे सांगत त्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.शहरात घटस्थापनेच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. तसेच, कुटुंबासह मंदिरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शहरातील सारसबागेजवळचे महालक्ष्मी मंदिर, पद्मावती, तळजाई, चतु:शृंगी, भवानी पेठेतील भवानीमाता मंदिर आदी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.या मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, होमहवन, कथासप्ताह अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शहरात पावसाने चांगलाच जोर पकडल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. मातीचा घट, फुले, फळे, पूजा साहित्य खरेदीसाठी शहरातील मंडई,मार्केट यार्ड आदी मध्यवर्ती भागांत नागरिकांनी गर्दी केली आहे. शहरातील वातावरण भक्तिरंगात न्हाऊन निघाले आहे.