शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

चारच दिवसांत कोंढापुरी तलावात आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:08 IST

रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावामध्ये चासकमानच्या चालू आवर्तनाचे पाणी सोडून तलाव पूर्ण क्षमतेने पाण्याने भरून ...

रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावामध्ये चासकमानच्या चालू आवर्तनाचे पाणी सोडून तलाव पूर्ण क्षमतेने पाण्याने भरून द्यावा, अन्यथा रांजणगाव गणपती पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह आंदोलन करण्यात येईल, असा कडक इशारा आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी एका निवेदनाद्वारे दिल्याची बातमी दै. लोकमतमध्ये दि.२४ रोजी फोटोसह प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन चासकमान प्रकल्प उपअभियंता यांनी तातडीने कार्यवाही करून चालू आवर्तनातून चारच दिवसांत कोंढापुरी तलाव पाण्याने ७५% क्षमतेने भरून दिल्याने तलावातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या परिसरातील गावच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पाण्यावर पाणीपुरवठा अवलंबून असणाऱ्या विविध गावच्या नागरिकांनीही पाणीटंचाई दूर झाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही या बाबत निवेदन देण्यात आले होते त्यांच्या सूचनेनुसार व लोकमतच्या बातमीमुळे चासकमानच्या अधिकाऱ्यांनी तलावात पाणी सोडल्याचे पाचुंदकर यांनी यावेळी सांगितले.कोंढापुरी ग्रामपंचायतीनेही तलावात पाणी सोडण्याची मागणी यापूर्वी केली होती. कोंढापुरी तलावात पाणी सोडल्यानंतर आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर,कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड,माजी सदस्य उमेश दरवडे,मुक्ता बांगर,गणेश ढोकले, मारुती नरवडे,अविनाश नळकांडे,पोपटराव गायकवाड आदींनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

या निवेदनात पुढे म्हटले होते की,सध्या उन्हाळ्यामध्ये बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. शेतकऱ्यांनी चासकमान प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेटी घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती .

या तलावातील पाण्यावरती रांजणगाव गणपती, कोंढापुरी, खंडाळे, पिंपरी दुमाला, गणेगाव खालसा, वरुडे , वाघाळे या गावातील नळपाणीपुरवठा योजना व परिसरातील हजारो एकर शेती अवलंबून असल्याने चासकमानच्या अधिकाऱ्यांनी या तलावात प्रत्येक आवर्तनाला पाणी सोडावे, अशी मागणी मानसिंग पाचुंदकर यांनी या वेळी केली आहे.

कोंढापुरी तलावात पाणी सोडल्यानंतर तलावाची पाहणी करताना मानसिंग पाचुंदकर, स्वप्निल गायकवाड व इतर.