शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

किल्ल्यांचे भाग्य उजळणार

By admin | Updated: April 18, 2017 03:08 IST

राज्यातील दुर्लक्षित किल्ल्यांचे भाग्यही आता उजळणार असून, राज्य शासनाच्या गॅझेटिअर विभागातर्फे (दर्शनिका विभाग) राज्यातील ५०० ते ६०० किल्ल्यांची सविस्तर माहिती देणारे

राहुल शिंदे,  पुणेराज्यातील दुर्लक्षित किल्ल्यांचे भाग्यही आता उजळणार असून, राज्य शासनाच्या गॅझेटिअर विभागातर्फे (दर्शनिका विभाग) राज्यातील ५०० ते ६०० किल्ल्यांची सविस्तर माहिती देणारे ‘गॅझेट’ प्रसिद्ध केले जाणार आहेत. दुर्लक्षित किल्ल्यांचा ठेवा छायाचित्र व माहितीच्या रूपाने गडप्रेमींच्या समोर येणार आहे. त्याचप्रमाणे संरक्षित किल्ले म्हणून नोंदणी नसणाऱ्या ८८ किल्ल्यांच्या नोंदणीची प्रकिया सुरू झाली आहे. त्यामुळे शासनाकडून या किल्ल्यांची अधिकृतपणे काळजी घेतली जाणार आहे.राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर अधिकृत समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात विविध उपक्रम राबविले जात आहेत. याबाबत माहिती देताना ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक पांडुरंग बलकवडे म्हणाले, ‘‘या समितीच्या माध्यमातून काम करताना आम्ही विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण या विभागांतील किल्ल्यांचे सर्वेक्षण केले. त्यातून प्रथमत: १४ किल्यांची निवड केली.’’गेल्या वर्षी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ६० कोटी रुपयांची कामे सुरू झाली, तर मार्च २०१७पासून ३० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली. किल्ल्यांवर दारूबंदी व प्लॅस्टिकबंदी करावी, अशी सूचना शासनाला करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांमध्ये किल्ले संवर्धनाबाबत जागरूकता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.राज्यातील किल्ल्यांविषयी खूप त्रोटक माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे किल्ल्यांची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे, असे नमूद करून बलकवडे म्हणाले, ‘‘राज्याच्या गॅझेटिअर विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर समितीच्या सदस्यांची बैठक झाली. तीत राज्यातील सुमारे ५०० ते ६०० किल्ल्यांची सविस्तर माहिती व किल्ल्यासंदर्भातील कागदपत्रे ‘गॅझेट’ काढून प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात किल्ल्यांचा सात-बारा, ऐतिहासिक छायाचित्रे, किल्ल्यांचे महत्त्व आदी माहिती प्रकाशित केली जाणार आहे.’’