शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

‘एफआरपी’चे सूत्र आता ८०-२० निश्चित

By admin | Updated: December 13, 2015 02:58 IST

साखर कारखान्यांनी एफआरपी एकाच हप्त्यात देण्याची भूमिका राज्य शासनाने बदलली आहे. आता ८०-२०चे सूत्र लागू करून तोडगा काढला आहे. कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आक्रमक

बारामती : साखर कारखान्यांनी एफआरपी एकाच हप्त्यात देण्याची भूमिका राज्य शासनाने बदलली आहे. आता ८०-२०चे सूत्र लागू करून तोडगा काढला आहे. कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आक्रमक भूमिका घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कृती समितीच्या स्थानिक नेत्यांना हा निर्णय पसंत पडलेला नाही. साखरेच्या दरावरच ‘एफआरपी’ची रक्कम देण्याची भूमिका कारखानदारांची आहे. त्यामुळे त्यांनी अद्याप ‘वेट अँड वॉच’ अशी सावध भूमिका घेतली आहे.मागील तीन हंगामांची एफआरपीची पूर्ण रक्कम अनेक कारखान्यांनी दिलेली नाही. त्याचबरोबर या हंगामातील हप्त्याच्या बाबतीत जाहीर केलेला दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पसंत पडलेला नाही. साखर कारखान्यांनी जाहीर केलेला १,५०० रुपयांचा पहिल्या हप्त्याबाबत नाराजीचा सूर आहे. त्यातच एफआरपीच्या रक्कमेसाठी ८०-२० असे सूत्र आहे. माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले, साखर कारखानदारी मोठ्या अडचणीतून वाटचाल करीत आहे. अडचणींमुळे साखर कारखानदारी आर्थिक संकटात सापडली आहे. शेतकरी संघटनांची वर्षभरातील भूमिका मवाळ आहे. एफआरपीसाठी आंदोलने केली; परंतु त्यासाठी तीव्र भूमिका घेतली नाही.