शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

‘एफआरपी’चे सूत्र आता ८०-२० निश्चित

By admin | Updated: December 13, 2015 02:58 IST

साखर कारखान्यांनी एफआरपी एकाच हप्त्यात देण्याची भूमिका राज्य शासनाने बदलली आहे. आता ८०-२०चे सूत्र लागू करून तोडगा काढला आहे. कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आक्रमक

बारामती : साखर कारखान्यांनी एफआरपी एकाच हप्त्यात देण्याची भूमिका राज्य शासनाने बदलली आहे. आता ८०-२०चे सूत्र लागू करून तोडगा काढला आहे. कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आक्रमक भूमिका घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कृती समितीच्या स्थानिक नेत्यांना हा निर्णय पसंत पडलेला नाही. साखरेच्या दरावरच ‘एफआरपी’ची रक्कम देण्याची भूमिका कारखानदारांची आहे. त्यामुळे त्यांनी अद्याप ‘वेट अँड वॉच’ अशी सावध भूमिका घेतली आहे.मागील तीन हंगामांची एफआरपीची पूर्ण रक्कम अनेक कारखान्यांनी दिलेली नाही. त्याचबरोबर या हंगामातील हप्त्याच्या बाबतीत जाहीर केलेला दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पसंत पडलेला नाही. साखर कारखान्यांनी जाहीर केलेला १,५०० रुपयांचा पहिल्या हप्त्याबाबत नाराजीचा सूर आहे. त्यातच एफआरपीच्या रक्कमेसाठी ८०-२० असे सूत्र आहे. माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले, साखर कारखानदारी मोठ्या अडचणीतून वाटचाल करीत आहे. अडचणींमुळे साखर कारखानदारी आर्थिक संकटात सापडली आहे. शेतकरी संघटनांची वर्षभरातील भूमिका मवाळ आहे. एफआरपीसाठी आंदोलने केली; परंतु त्यासाठी तीव्र भूमिका घेतली नाही.