शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री पाटील तयारीत, राज्यमंत्री भरणेंचे अलिप्त धोरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:12 IST

सतीश सांगळे लोकमत न्यूज नेटवर्क कळस : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम काही दिवसांमध्ये ...

सतीश सांगळे

लोकमत न्यूज नेटवर्क

कळस : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. या कारखान्यावर भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कायम एकहाती सत्ता असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या कारखान्याच्या राजकारणापासून नेहमीच अलिप्त राहण्याचे धोरण पसंत ठेवले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामसूम राहिल्यास हा कारखाना भाजपला आदंणच मिळणार आहे.

तालुक्यातील या साखर कारखान्याची गाळपक्षमता मोठी आहे. सहवीजनिर्मिती, आसवानी, व इथेनाॅल प्रकल्प असूनही आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे. हा कारखाना हर्षवर्धन पाटील यांच्या कायम ताब्यात आहे. उपपदार्थ निर्मिती असलेला हा साखर कारखाना माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांनी वालचंदनगर येथील जुना कारखाना विकत घेऊन बिजवडी येथील माळरानावर ३५ वर्षांपूर्वी सुरू केला. कारखान्याच्या स्थापनेपासून पाटील घराण्याकडे निर्विवाद सत्ता आहे. अनेकवेळा निवडणूक झाली. कधी काही जागा बिनविरोध झाल्या. मात्र,सत्ता कायम पाटील घराण्यात राहिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पतित पावन संघटनेत असताना त्यांनी १९९४ व ९९ ला सत्ताधारी पाटील गटाच्या विरोधात पॅनल तयार करून आव्हान दिले. नंतरच्या काळात २००५ व १० साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दिग्गज नेते मंडळी उभी राहिली. मात्र, माजी मंत्री पाटील यांनी एकहाती सत्ता कायम ठेवली. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चक्र फिरवल्यामुळे तालुका नेत्यांनीही दुर्लक्ष केल्याने स्थानिक पातळीवर पॅनल उभी करण्यात अपयश आले. पाटील गटाच्या काही जागा बिनविरोध होऊन पॅनल मोठ्या फरकाने विजयी झाले.

यासहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यात होता. मात्र निवडणुकीवरील स्थगिती दिल्याने नामनिर्देशन पत्र दोन दिवसच भरण्यात आले. आता स्थगिती संपल्याने २० सप्टेंबरनंतर निवडणूक पहिल्या टप्प्यातच होणार आहे. आहे त्याच टप्प्यावर निवडणूक सुरू होणार असल्याने लवकरच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

चौकट

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कळस पळसदेव, भिगवण, निमगाव-केतकी हे जिल्हा परिषदेचे गट येतात यामध्ये निमगाव-केतकी वगळता सर्व गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, सर्वसामान्य शेतकरी सभासदांसाठी ऊसदर व कारखान्याच्या निगडीत प्रश्नांची कधीही राष्ट्रवादी काँग्रेसने पोलखोल केली नाही मात्तबर नेत्यांनी आपला ऊस खासगी कारखान्यांना देऊन या सहकारी तत्वावरील कारखान्याकडे दुर्लक्ष केले.

फोटो,

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील फोटो वापरणे