शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री पाटील तयारीत, राज्यमंत्री भरणेंचे अलिप्त धोरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:12 IST

सतीश सांगळे लोकमत न्यूज नेटवर्क कळस : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम काही दिवसांमध्ये ...

सतीश सांगळे

लोकमत न्यूज नेटवर्क

कळस : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. या कारखान्यावर भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कायम एकहाती सत्ता असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या कारखान्याच्या राजकारणापासून नेहमीच अलिप्त राहण्याचे धोरण पसंत ठेवले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामसूम राहिल्यास हा कारखाना भाजपला आदंणच मिळणार आहे.

तालुक्यातील या साखर कारखान्याची गाळपक्षमता मोठी आहे. सहवीजनिर्मिती, आसवानी, व इथेनाॅल प्रकल्प असूनही आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे. हा कारखाना हर्षवर्धन पाटील यांच्या कायम ताब्यात आहे. उपपदार्थ निर्मिती असलेला हा साखर कारखाना माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांनी वालचंदनगर येथील जुना कारखाना विकत घेऊन बिजवडी येथील माळरानावर ३५ वर्षांपूर्वी सुरू केला. कारखान्याच्या स्थापनेपासून पाटील घराण्याकडे निर्विवाद सत्ता आहे. अनेकवेळा निवडणूक झाली. कधी काही जागा बिनविरोध झाल्या. मात्र,सत्ता कायम पाटील घराण्यात राहिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पतित पावन संघटनेत असताना त्यांनी १९९४ व ९९ ला सत्ताधारी पाटील गटाच्या विरोधात पॅनल तयार करून आव्हान दिले. नंतरच्या काळात २००५ व १० साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दिग्गज नेते मंडळी उभी राहिली. मात्र, माजी मंत्री पाटील यांनी एकहाती सत्ता कायम ठेवली. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चक्र फिरवल्यामुळे तालुका नेत्यांनीही दुर्लक्ष केल्याने स्थानिक पातळीवर पॅनल उभी करण्यात अपयश आले. पाटील गटाच्या काही जागा बिनविरोध होऊन पॅनल मोठ्या फरकाने विजयी झाले.

यासहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यात होता. मात्र निवडणुकीवरील स्थगिती दिल्याने नामनिर्देशन पत्र दोन दिवसच भरण्यात आले. आता स्थगिती संपल्याने २० सप्टेंबरनंतर निवडणूक पहिल्या टप्प्यातच होणार आहे. आहे त्याच टप्प्यावर निवडणूक सुरू होणार असल्याने लवकरच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

चौकट

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कळस पळसदेव, भिगवण, निमगाव-केतकी हे जिल्हा परिषदेचे गट येतात यामध्ये निमगाव-केतकी वगळता सर्व गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, सर्वसामान्य शेतकरी सभासदांसाठी ऊसदर व कारखान्याच्या निगडीत प्रश्नांची कधीही राष्ट्रवादी काँग्रेसने पोलखोल केली नाही मात्तबर नेत्यांनी आपला ऊस खासगी कारखान्यांना देऊन या सहकारी तत्वावरील कारखान्याकडे दुर्लक्ष केले.

फोटो,

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील फोटो वापरणे