शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भिका-यांच्या पुनर्वसनाचा विसर

By admin | Updated: April 4, 2015 06:00 IST

शहरात चौकांचौकांमध्ये, सिग्नलला, रेल्वे स्थानक, बस थांब्यांवर हजारो भिकारी उघडपणे फिरत असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा

पुणे : शहरात चौकांचौकांमध्ये, सिग्नलला, रेल्वे स्थानक, बस थांब्यांवर हजारो भिकारी उघडपणे फिरत असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा विसर भिक्षेकरी स्वीकार केंद्राला पडलेला आहे. महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत लाखो रुपयांचा निधी या केंद्राला दिला जातो. मात्र, गेल्या वर्षभरात केवळ १८० भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन ११६ जणांचे पुनर्वसन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी अनास्थेमुळे केवळ भिक्षेकरी स्वीकार केंद्रांचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे. फाटक्या कपड्यांंमध्ये लहान मुलांना घेऊन भिक मागणाऱ्या महिला, छोटी मुले यांना पाहून अनेकांना त्यांच्याविषयी दयेची भावना निर्माण होते. मात्र, दोन-चार रूपये त्यांच्या वाडग्यात टाकून हळहळत निघून जाण्याशिवाय ते काहीच करू शकत नाहीत. भिकाऱ्यांना वाईट पद्धतीने जगावे लागू नये म्हणून शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये भिक्षेकरी स्वीकार केंद्र सुरू केले आहे. महिला व बाल विकास आयुक्तालय तसेच पोलिस यांनी संयुक्तपणे भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे घडत नसल्याचे लोकहित फाऊंडेशनचे अजहर खान यांना मिळालेल्या माहितीतून निष्पन्न झाले आहे.शहरात १५०० भिकारी कुटुंब आहेत. त्यांच्याकडे नागरिकत्त्वाचा कोणताही पुरावा नसल्याने शासनाच्या योजनेचा लाभ त्यांना मिळू शकत नाही. काही भिकाऱ्यांकडे मोठ्या रकमा आढळून आल्याचे प्रकार उजेडात आले.(प्रतिनिधी)