शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

विभागातील जंगलाचे वणवे रोखण्यासाठी ‘वन वणवा’ परिषद घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यासह शहर आणि परिसरात वनक्षेत्राला मानवी चुकांमुळे लागणाऱ्या वणव्याच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाकडून वन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यासह शहर आणि परिसरात वनक्षेत्राला मानवी चुकांमुळे लागणाऱ्या वणव्याच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाकडून वन वणवा परिषदेचे आयोजन केले आहे. वन विभागाकडून अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी महसूल विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जिल्हा प्रशासन अशा यंत्रणांतील अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधण्यात येणार आहे. दरम्यान लोकसहभागाशिवाय वणवे रोखणे कठीण असल्याचे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.

पंधरवड्यापूर्वी कात्रज घाट परिसरात मोठी आग लागली होती. ज्या भागात आग भडकली होती. ते क्षेत्र पीएमआरडीएच्या अखत्यारीत होते. पुणे शहरालगत टेकड्या आहेत. टेकड्यांवर आग लागण्याच्या घटना घडतात. बऱ्याचदा मानवी चुकांमुळे आग लागते. आगीत अनेक दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पती तसेच वृक्षांना झळ पोहोचते. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी विविध यंत्रणांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. या विचाराने वनविभागाकडून वनवणवा परिषदेचे आयोजन केले असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.

वन वणवा परिषदेच्या निमित्ताने, महसूल, महापालिका, पीएमआरडीए तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी एकत्र येऊन उपाययोजना करणार आहेत. शहरी भागातील टेकड्यांवर आग लागल्यास टेकड्यांवर फिरायला येणारे नागरिक वन विभागाला माहिती कळवितात. वनविभागातील एका रक्षकाकडे सातशे ते आठशे हेक्टर क्षेत्र असते. त्याला दोन मदतनीस साहाय्य करतात. टेकडीवर फिरायला येणारे नागरिक वनविभागातील अधिकारी आणि रक्षकांच्या संपर्कात असतात. नियमित फिरायला येणा-या नागरिकांनी समाजमाध्यमावर गट स्थापन केले असून त्याद्वारे आम्हाला माहिती कळविण्यात येते. वनविभागाचा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून माहिती कळविण्यात येते, असे त्यांनी नमूद केले.

शहरात टेकडीवर येणारे काहीजण जळत्या सिगारेटची थोटके टाकतात. काहीजण वनविभागाच्या जागेपासून काही अंतरावर शेकोटी पेटवतात. वनविभागाच्या जगतात चूल पेटवून जेवण केले जाते. त्यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात. पुणे जिल्ह्यत ऊस लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. काही भागात ऊस जमिनीला लागूनच वनविभागाच्या जागा असतात. ऊसतोडणी झाल्यानंतर काही शेतकरी उर्वरित राहिलेल्या भागाला आग लावतात. त्यामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. वन वणव्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणार असून पुणे-सातारा महामार्गावर लवकरच जागोजागी फलक बसविणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.