शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

टेकडीवरून येणारे पाणी रोखण्यासाठी बंधाऱ्यांची मात्रा वन विभागाकडून काम सुरू - पूरग्रस्त भागाला मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:12 IST

गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पावसाळ्यात अनेकदा तळजाई टेकडीवरून जोरात आलेले पाणी सोसायट्यांमध्ये जात आहे. परिणामी अनेक घरांचे नुकसान झाले. टेकडीच्या ...

गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पावसाळ्यात अनेकदा तळजाई टेकडीवरून जोरात आलेले पाणी सोसायट्यांमध्ये जात आहे. परिणामी अनेक घरांचे नुकसान झाले. टेकडीच्या सर्व बाजूने इमारती झालेल्या आहेत. त्यामुळे उतारावरून पाणी आले की या घरांमध्ये जाते. येत्या पावसाळ्यात असा प्रकार होऊ नये म्हणून वन विभागातर्फे टेकडीवर चर खोदून छोटे छोटे तळे तयार केले जात आहेत. त्याचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी पर्यावरण वनराज्यमंत्री दत्ता भरणे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी या भागाची नुकतीच पाहणी केली होती. त्यानंतर तिथे हा उपाय करण्यात येत आहे.

मे महिन्याच्या अखेरीस हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वात वरील भागात एक छोटं तळं केलं आहे. त्यानंतर तिथून पाणी खालील तळ्यात येईल, अशी तीन चार टप्प्यांवर तळी होत आहेत. वेगाने येणारे पाणी या तळ्यांमध्ये थांबणार असल्याने थेट रस्त्यावर येणार नाही.

——————————————

तळजाई टेकडीलगत म्हणजे शिंदे हायस्कूलमागे एक खाण आहे. त्या खाणीपासून एक ओढा होता. तेथून टेकडीवरील पाणी वाहून जात होते. तेव्हा कधीच पूर आलेला नाही. पण हा ओढा बुजविला गेला. त्यानंतर पाण्याचा मार्ग बदलला. त्यामुळे अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरत आहे. या ठिकाणी भिंत कोसळून एका महिेलेचा मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी योग्य उपाययोजना कराव्यात, यासाठी आम्ही दोन वर्षांपासून प्रयत्न करत होतो. आता कुठे वन विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत.

- सुरेश बुद्धिसागर, रहिवासी, सहकारनगर

——————————————