शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

परप्रांतीय कामगार निघाले गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:11 IST

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने दि. १५ पासून संचारबंदी लागू केली असून, कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. ...

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने दि. १५ पासून संचारबंदी लागू केली असून, कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागू झाल्याच्या भीतीने परप्रांतीय चांगलेच धास्तावले आहेत. बराचसा कामगार वर्ग मिळेल त्या वाहनाने घर गाठत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या काळात या कामगारांचे प्रचंड हाल झाले होते. काहींना वाहन न मिळाल्याने शेवटी या कामगारांनी आपल्या गावी पायी जाणे पसंत केले, तर जाताना त्यांना रस्त्यात उपासमारही सहन करावी लागली होती आणि आता पुन्हा तीच वेळ येऊ नये म्हणून हे कामगार आपआपल्या गावी जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

राज्यात संचारबंदी लागू केल्याने कामगारांअभावी बांधकाम व्यावसायिकांना आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार आहे. बांधकाम व्यवसायाबरोबरच इतर छोटे मोठे उद्योग व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. परप्रांतीय कामगार मिळेल ते काम कमी रोजंदारीवर करत असत. मात्र आता त्यांनी गावाकडची वाट धरल्याने स्वस्त आणि कुशल कामगारांचा तुटवडा भासणार असून, सध्या स्थानिक कामगारांवरच व्यावसायिकांना अवलंबून राहावे लागणार आहे. संचारबंदीच्या काळात काम मिळेल की नाही याबाबत परप्रांतीय कामगारांना शाश्वती नसल्याने दैनंदिन जीवनातील अन्नपाणी, खोलीभाडे व इतर खर्च भागवून घरी किती पैसे पाठवायचे यासारख्या अनेक अडचणी त्यांच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे त्यांनी मिळेल त्या वाहनाने आपल्या घरी जाणे पसंत केले आहे.

१५ रांजणगाव गणपती

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक संचारबंदी जाहीर झाल्याने मजुरांना गावी जाण्याचे वेध लागले आहेत.