शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परप्रांतीय कामगार निघाले गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:11 IST

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने दि. १५ पासून संचारबंदी लागू केली असून, कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. ...

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने दि. १५ पासून संचारबंदी लागू केली असून, कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागू झाल्याच्या भीतीने परप्रांतीय चांगलेच धास्तावले आहेत. बराचसा कामगार वर्ग मिळेल त्या वाहनाने घर गाठत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या काळात या कामगारांचे प्रचंड हाल झाले होते. काहींना वाहन न मिळाल्याने शेवटी या कामगारांनी आपल्या गावी पायी जाणे पसंत केले, तर जाताना त्यांना रस्त्यात उपासमारही सहन करावी लागली होती आणि आता पुन्हा तीच वेळ येऊ नये म्हणून हे कामगार आपआपल्या गावी जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

राज्यात संचारबंदी लागू केल्याने कामगारांअभावी बांधकाम व्यावसायिकांना आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार आहे. बांधकाम व्यवसायाबरोबरच इतर छोटे मोठे उद्योग व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. परप्रांतीय कामगार मिळेल ते काम कमी रोजंदारीवर करत असत. मात्र आता त्यांनी गावाकडची वाट धरल्याने स्वस्त आणि कुशल कामगारांचा तुटवडा भासणार असून, सध्या स्थानिक कामगारांवरच व्यावसायिकांना अवलंबून राहावे लागणार आहे. संचारबंदीच्या काळात काम मिळेल की नाही याबाबत परप्रांतीय कामगारांना शाश्वती नसल्याने दैनंदिन जीवनातील अन्नपाणी, खोलीभाडे व इतर खर्च भागवून घरी किती पैसे पाठवायचे यासारख्या अनेक अडचणी त्यांच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे त्यांनी मिळेल त्या वाहनाने आपल्या घरी जाणे पसंत केले आहे.

१५ रांजणगाव गणपती

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक संचारबंदी जाहीर झाल्याने मजुरांना गावी जाण्याचे वेध लागले आहेत.