शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

परप्रांतीय कामगार निघाले गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:11 IST

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने दि. १५ पासून संचारबंदी लागू केली असून, कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. ...

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने दि. १५ पासून संचारबंदी लागू केली असून, कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागू झाल्याच्या भीतीने परप्रांतीय चांगलेच धास्तावले आहेत. बराचसा कामगार वर्ग मिळेल त्या वाहनाने घर गाठत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या काळात या कामगारांचे प्रचंड हाल झाले होते. काहींना वाहन न मिळाल्याने शेवटी या कामगारांनी आपल्या गावी पायी जाणे पसंत केले, तर जाताना त्यांना रस्त्यात उपासमारही सहन करावी लागली होती आणि आता पुन्हा तीच वेळ येऊ नये म्हणून हे कामगार आपआपल्या गावी जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

राज्यात संचारबंदी लागू केल्याने कामगारांअभावी बांधकाम व्यावसायिकांना आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार आहे. बांधकाम व्यवसायाबरोबरच इतर छोटे मोठे उद्योग व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. परप्रांतीय कामगार मिळेल ते काम कमी रोजंदारीवर करत असत. मात्र आता त्यांनी गावाकडची वाट धरल्याने स्वस्त आणि कुशल कामगारांचा तुटवडा भासणार असून, सध्या स्थानिक कामगारांवरच व्यावसायिकांना अवलंबून राहावे लागणार आहे. संचारबंदीच्या काळात काम मिळेल की नाही याबाबत परप्रांतीय कामगारांना शाश्वती नसल्याने दैनंदिन जीवनातील अन्नपाणी, खोलीभाडे व इतर खर्च भागवून घरी किती पैसे पाठवायचे यासारख्या अनेक अडचणी त्यांच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे त्यांनी मिळेल त्या वाहनाने आपल्या घरी जाणे पसंत केले आहे.

१५ रांजणगाव गणपती

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक संचारबंदी जाहीर झाल्याने मजुरांना गावी जाण्याचे वेध लागले आहेत.