शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

उड्डाणपुलांचे जोड नीट करणार

By admin | Updated: April 14, 2017 04:32 IST

शहरातील अनेक उड्डाणपुलांचे जोड खराब झाले असून, वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या वतीने लवकरच या जोडदुरुस्तीची मोहीम सुरू

पुणे : शहरातील अनेक उड्डाणपुलांचे जोड खराब झाले असून, वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या वतीने लवकरच या जोडदुरुस्तीची मोहीम सुरू करण्यात येणार असून त्यात पुलांचीही तपासणी होणार आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून ही माहिती देण्यात आली.राजाराम पूल, गरवारे महाविद्यालयाशेजारचे एस. एम. जोशी व स्वातंत्र्यवीर सावरकर पूल व अन्य काही पुलांचे जोड खराब झाल्यामुळे पुलावर आडवी रेघ असलेला मोठा खड्डा तयार झाला आहे. पुलाचा रोज वापर करणाऱ्या वाहनचालकांना त्याचा शारिरीक त्रास होत आहे; त्याचबरोबर वाहनेही मोठ्या संख्येने नादुरुस्त होत आहेत. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त गुरुवारच्या अंकात छायाचित्रासह प्रसिद्ध केले होते.महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या अखत्यारीत हे पूल येतात. त्यांच्याकडून बातमीची दखल घेण्यात आली. या विभागाचे अधीक्षक अभियंता विजय शिंदे याबाबत म्हणाले, ‘‘पुलावरचे डांबरी लेअर व हा जोड एकाच लेव्हलला असणे अपेक्षित आहे. पूल नवा असताना ते तसेच असतात. कालांतराने ते खराब होतात. नव्याने डांबरीकरण करताना ते पूर्वीसारखे केले जाणे आवश्यक असते; मात्र तसे होत नाही व नंतर खड्डा वाढत जातो.’’शास्त्रीय तत्त्वानुसार हा जोड मोकळा ठेवणे गरजेचे आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. वातावरणाचा परिणाम म्हणून सिमेंट प्रसरण व आकुंचन पावत असते. अशी मोकळी जागा ठेवली नाही, तर त्यातून संपूर्ण बांधकामाला तडा जातो. त्यामुळे मोकळी जागा ठेवावीच लागते, असे शिंदे म्हणाले. आता काही पुलांवरचे जोड खराब झाले आहेत. ते दुरुस्त करण्याची मोहीम सुरू करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)