शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

उड्डाणपुलांचे जोड नीट करणार

By admin | Updated: April 14, 2017 04:32 IST

शहरातील अनेक उड्डाणपुलांचे जोड खराब झाले असून, वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या वतीने लवकरच या जोडदुरुस्तीची मोहीम सुरू

पुणे : शहरातील अनेक उड्डाणपुलांचे जोड खराब झाले असून, वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या वतीने लवकरच या जोडदुरुस्तीची मोहीम सुरू करण्यात येणार असून त्यात पुलांचीही तपासणी होणार आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून ही माहिती देण्यात आली.राजाराम पूल, गरवारे महाविद्यालयाशेजारचे एस. एम. जोशी व स्वातंत्र्यवीर सावरकर पूल व अन्य काही पुलांचे जोड खराब झाल्यामुळे पुलावर आडवी रेघ असलेला मोठा खड्डा तयार झाला आहे. पुलाचा रोज वापर करणाऱ्या वाहनचालकांना त्याचा शारिरीक त्रास होत आहे; त्याचबरोबर वाहनेही मोठ्या संख्येने नादुरुस्त होत आहेत. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त गुरुवारच्या अंकात छायाचित्रासह प्रसिद्ध केले होते.महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या अखत्यारीत हे पूल येतात. त्यांच्याकडून बातमीची दखल घेण्यात आली. या विभागाचे अधीक्षक अभियंता विजय शिंदे याबाबत म्हणाले, ‘‘पुलावरचे डांबरी लेअर व हा जोड एकाच लेव्हलला असणे अपेक्षित आहे. पूल नवा असताना ते तसेच असतात. कालांतराने ते खराब होतात. नव्याने डांबरीकरण करताना ते पूर्वीसारखे केले जाणे आवश्यक असते; मात्र तसे होत नाही व नंतर खड्डा वाढत जातो.’’शास्त्रीय तत्त्वानुसार हा जोड मोकळा ठेवणे गरजेचे आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. वातावरणाचा परिणाम म्हणून सिमेंट प्रसरण व आकुंचन पावत असते. अशी मोकळी जागा ठेवली नाही, तर त्यातून संपूर्ण बांधकामाला तडा जातो. त्यामुळे मोकळी जागा ठेवावीच लागते, असे शिंदे म्हणाले. आता काही पुलांवरचे जोड खराब झाले आहेत. ते दुरुस्त करण्याची मोहीम सुरू करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)