शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

नाशिक फाटा उड्डाणपुलावर उडतोय गोंधळ

By admin | Updated: February 13, 2015 05:03 IST

कासारवाडी येथील भारतरत्न जे.आर.डी. टाटा दुमजली उड्डानपुलावरील दिशादर्शक फलक दिसत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.

पिंपरी : कासारवाडी येथील भारतरत्न जे.आर.डी. टाटा दुमजली उड्डानपुलावरील दिशादर्शक फलक दिसत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. दिशाभूल होऊन वाहने चूकीच्या मार्गाने ये- जा करावी लागते. त्यामुळे अनेकांना दूर अंतरावरुन वळसा घालून ये-जा करण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषता नव्याने या मार्गावर आलेल्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. पुणे- मुंबई जुना महामार्ग आणि पुणे- नाशिक महामार्गाला छेद देणारा कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात हा दुमजली उड्डान पुल नव्यानेच उभारला आहे. शहरातील सर्वांत उंच आणि अधिक लांबीचा असे या पुलाचे वैशिष्टये आहे. कासारवाडीकडून भोसरीकडे जाणारा आणि रस्ता, नदी आणि लोहमार्गावरुन जाणारा भोसरी आणि पिंपळे गुरव असे दोन पुल आहेत. ग्रेडसेपरेटरमधून दापोडीहून कासारवाडीत आल्यानंतर भोसरीकडे जाण्यासाठी पुल सुरू होतो. मात्र, तेथे लावलेला दिशादर्शक फलक खूपच छोटा आहे. वेगात असलेल्या वाहनांना तो दिसत नाही. त्यामुळे वाहने थेट पिंपरीकडे जातात. त्यामुळे त्याची फसगत होते. थेट पुलावर न गेल्याने चौकातील सिग्नलला थांबून वळण घेऊन भोसरीकडे जाण्याची वेळ येते. पिंपळे गुरव-भोसरी पुलाकडे ये- जा करण्यासाठी कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूने उपरस्ता आहे. मात्र, जाणे आणि येण्याच्या माार्गवर दिशादर्शक फलक दर्शनी आणि मोठ्या आकारात नसल्याने कोठून वळण घ्यायचे हे समजत नाही. यामुळे चालक वाहन चुकीच्या मार्गाने पुढे जातो. वाहने विरुद्ध दिशेने वाहने जातात. यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. उपरस्त्याचे वळण अधिक वर्तुळाकार असल्याने टर्न घेताना धांदल उडते. उपरस्त्याचे कठडे अधिक उंच असल्याने पलीकडील वाहने दृष्टिस पडत नाही. पिंपळे गुरवहून कासारवाडीत जाण्यासाठी उपरस्ता आहे. तो न समजल्याने भोसरी मार्गावरील वाहतूक पोलीस कक्षापर्यत जाऊन पुन्हा मागे वळून यावे लागते. त्यात सुमारे दीड ते दोन किलोमीटरचा वळसा पडतो. या पुलावरुन पिंपरीकडे जाण्यासाठी अवजड वाहनांना वाहतूक पोलीस कक्षापर्यतच गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. तेथून वळसा घ्यावा लागतो.