शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बासरी-व्हायोलिनच्या सुरावटीने चैतन्य

By admin | Updated: December 11, 2015 00:58 IST

सनईची मधुर सुरावट, सावनी कुलकर्णी आणि शिल्पा पुणतांबेकर या भगिनींचे अप्रतिम सादरीकरण, रंगलेली जुगलबंदी, तर पं. विश्वनाथ यांनी संगीतक्षेत्रातील अनुभवाच्या शिदोरीवर बंदिशी सादर करून

पुणे : सनईची मधुर सुरावट, सावनी कुलकर्णी आणि शिल्पा पुणतांबेकर या भगिनींचे अप्रतिम सादरीकरण, रंगलेली जुगलबंदी, तर पं. विश्वनाथ यांनी संगीतक्षेत्रातील अनुभवाच्या शिदोरीवर बंदिशी सादर करून महोत्सवाची रंगत वाढविली. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा उत्तरार्ध रूपक कुलकर्णी आणि प्रवीण शेलोलिकर यांच्या बासरी आणि व्हायोलिनच्या जुगलबंदीने रंगला. बासरी आणि व्हायोलिनच्या सुरावटीने रसिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. तर, पं. राजन-साजन मिश्रा यांच्या श्रवणीय गायनाचा रसिकांनी पुन्हा नव्याने अनुभव घेतला.आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६३व्या सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाला दिमाखदार सुरुवात झाली. नम्रता गायकवाड हिने पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीस अभिवादन करून सुरेल सनईवादन सादर केले. तिने पेश केलेल्या मधुवंती रागाने सर्वांची मने जिंकली. पे्ररणा गायकवाड (सूर सनई), सीमा गायकवाड (सनई), हरदीपसिंग सोधी (तबला) यांनी नम्रताच्या सनईवादनाला सुरेख साथसंगत केली. सवाईरूपी गंगौघामध्ये भास्करबुवा बखले यांच्या पणती शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी कुलकर्णी यांनी कळस चढवला. लहानपणापासून संगीताची साधना करीत आणि घराण्याची परंपरा जपत रागांचा अभ्यास केलेल्या दोन्ही बहिणींनी बखले बुवांच्या बंदिशींची जुगलबंदी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. ‘अरि तेरो तेजोबन’, ‘सुंदर सूर मतवाला’ या बंदिशींमधील मुलतानी रागाचा विस्तार, मांडणी, एकाच विचारातून आणि समजातून केलेली स्वरांची सुरेल मांडणी थक्क करणारी होती. तबल्यावरील विलंबित एकताल आणि दृत तीनतालाने बंदिशींमध्ये अधिकच रंग भरले. सुधीर दातार यांचा त्या दोघींनी गायलेला तराणा, जगन्नाथराव पुरोहित यांची मारवा रागातील ‘हो पुनीजन मिलकाओ बजाओ’ ही बंदिश, आलापांना मिळालेला रसिकांचा प्रतिसाद यांमुळे ‘सवाई’ची मैफल आणखीनच रंगली. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली संत रामदासांची ‘ताने स्वर रंगवावा’ ही रचना हेही शिल्पा आणि सावनी यांच्या गायनाचे वैशिष्ट्य ठरले. याच अभंगाच्या वेळी माऊली टाकळकर मंचावर आले आणि टाळ्ंयांचा कडकडाट झाला. त्यांनी केलेले टाळवादन आणि संदीप कुलकर्णी यांच्या बासरीवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. चैतन्य कुंटे (हार्मोनियम), समीर पुणतांबेकर (तबला), राजेंद्र दूरकर (पखवाज), संदीप कुलकर्णी (बासरी), मनाली तुंगे, वर्षा सोनावडीकर (तानपुरा) यांनी जुगलबंदीला साथसंगत केली.कृ. प्र. खाडिलकर यांच्या ‘संगीत स्वयंवर’ संगीत नाटकाच्या शताब्दी वर्षानिमित्त एखादे नाट्यसंगीत सादर करण्याच्या संगीतपे्रमींच्या विनंतीला मान देऊन दोघींनी ‘एकच नयनाला’ हे पहाडी धून असलेले पद गायले. ‘संगीत स्वयंवर’च्या शताब्दी वर्षानिमित्त सवाईत गायला मिळणे हे आपले अहोभाग्य असल्याची भावना सावनीने व्यक्त केली. शिल्पा व सावनी यांच्या जुगलबंदीनंतर किराणा घराण्याचे नामवंत गायक पं. विश्वनाथ यांनी ‘हे मन बावरे’, ‘गुणिजन की संगती करले’ या बंदिशी सादर करून आपल्या गायनाची सुंदर झलक दाखवली. त्यानंतर ठुमरी सादर करीत त्यांनी मैफलीचा प्रवास पुढे नेला. ‘हरि बिन जग अंधारा’ या भजनात त्यांचे सुपुत्र मनुमहाराज यांनीही साथ दिली. मिलिंद कुलकर्णी, पांडुरंग पवार, मोहसीन मिरजकर, वैष्णवी अवधाली यांनी पं. विश्वनाथ यांना साथसंगत केली. (प्रतिनिधी)> स्वप्न पूर्ण झाले, तरी सवाईत पुन्हा यायला आवडेल : नम्रता गायकवाडलहानपणापासून सवाई बघत-ऐकत आले आहे. सवाईच्या स्वरमंचावर येता यावे, असे लहानपणापासूनचे स्वप्न होते. स्वप्न पूर्ण तर झाले आहे; भविष्यातही या स्वरमंचावर यायला निश्चित आवडेल, अशा भावना युवा सनईवादक नम्रता गायकवाड हिने व्यक्त केल्या. नम्रताच्या सनईवादनाने गुरुवारी सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाची सुरुवात झाली. सादरीकरणानंतर तिने ‘लोकमत’शी संवाद साधला. सवाईत सादरीणाविषयी जेव्हा पहिला फोन आला त्या वेळी पहिल्यांदा स्वत:वर विश्वासच बसला नाही. इतक्या लहान वयात संधी मिळेल असे वाटले नव्हते; पण संधीचे सोने करायचा निश्चय केला आहे. नव्या जोमाने तयारीला सुरुवात केली. सादरीकरणात कुठलीही कसर राहू नये म्हणून थेट दिल्ली गाठून पं. विजयकुमार, पं. दयाशंकर तसेच संजीव शंकर, अश्विनी शंकर यांच्याकडून सादरीकरण कशा पद्धतीचे असावे, याचे धडे घेतले. त्याचे तंत्र नव्याने आत्मसात केले. सनईवादन गायकी अंगाने सादर करण्याचा प्रयत्न केला.नम्रता म्हणाली, ‘‘हा स्वरमंच कलाकारांचे मंदिरच आहे. शुद्ध अंत:करणाने प्रत्येक कलाकार या स्वरमंचावर सेवा बजावतो. मीही अंत:करणापासून सादरीकरणाचा प्रयत्न केला. स्वरमंचावर आले तेव्हा नर्व्हस होते; पण सादरीकरण झाल्यानंतर ताण कुठल्याकुठे पळून गेला. हा मंच किती मोठा आहे, हे खऱ्या अर्थान आज कळाले.’’