शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

‘सेझचा’ पेच महिनाभरात सोडवा

By admin | Updated: November 3, 2015 03:29 IST

सेझमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच केडीएल कंपनीच्या भागधारकांना परताव्याच्या १५ टक्के विकसित जमिनी द्याव्यात किंवा आजच्या दराने मोबदला द्यावा

राजगुरुनगर : सेझमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच केडीएल कंपनीच्या भागधारकांना परताव्याच्या १५ टक्के विकसित जमिनी द्याव्यात किंवा आजच्या दराने मोबदला द्यावा आणि महिनाभरात प्रश्न मार्गी लावावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केडीएल आणि केईआयपीएल या कंपन्यांना दिले. खेड तालुक्यातील सेझच्या प्रस्तावित दुसऱ्या टप्प्यासाठी १३ गावांच्या जमिनींवर टाकलेले प्रस्तावित भूसंपादनासाठीचे शिक्के काढण्यात येतील, असेही आश्वासन त्यांनी पुन्हा दिले आहे; अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी दिली. आज मुंबई येथे खेड सेझप्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, योगेश पांडे, बापू करंडे यांनी बाजू मांडली. त्यांनी केडीएल व केआयईपीएल कंपनी यांच्या ताब्यात असलेल्या १५ टक्के जमिनी करारानुसार ताबडतोब परत करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना करारानुसार जमिनी परत मिळायला पाहिजे किंवा बाजारदराने योग्य मोबदला दिला गेला पाहिजे, अशी भूमिका घेतली. परताव्यानुसार जमिनी परत करण्यासंबंधी एमआयडीसीचे राज्याचे मुख्याधिकारी भूषण गगरानी यांना केआयईपीएलची भूमिका जाणून घेण्यासंबधी सांगितले. प्रकल्पग्रस्तांची १८३ हेक्टर जमीन अविकसित परत देणे आणि विकसनासाठी कपात केलेली २५% रक्कम सव्याज परत करणे, असाही प्रस्ताव आज मांडण्यात आला. आज तोडगा अपेक्षित होता; पण महिनाभरात तो काढावा, असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले. पण केडीएल कंपनी गुंडाळणार असल्याचे संकेत मात्र आज मिळाले. आजच्या बैठकीसाठी पालकमंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, केडीएल व केईआयपीएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीकरिता शेतकरी काशिनाथ दौंडकर, बाळासाहेब माशेरे, विष्णू दौंडकर, राजाराम गोरडे, मारुती गोरडे, मारुती सुक्रे, धोंडीबा साकोरे, नाना लोखंडे, काशीनाथ हजारे आदी सेझबाधित शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)आजच्या बैठकीत दुसरा निर्णय १३ गावांचे सातबारा कोरा करण्यासंबंधीचा झाला. 'संपादनासाठी प्रस्तावित' या नोंदी रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी १० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही झाली नाही. आजही त्यांनी हे शिक्के काढण्यात येतील असे आश्वासन पुन्हा दिले. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले ८ नोव्हेंबर रोजी पुकारलेले प्रस्तावित आंदोलन मागे घेतले.