शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

माळीण पुनर्वसनात भिंतींना तडे

By admin | Updated: June 26, 2017 03:43 IST

माळीण पुनर्वसनात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेल्याने रस्ते खचले, ड्रेनेजलाइन उखडल्या, गटारे छोटी झाल्याने पाणी वाहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : माळीण पुनर्वसनात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेल्याने रस्ते खचले, ड्रेनेजलाइन उखडल्या, गटारे छोटी झाल्याने पाणी वाहिले. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, ८-१० कुटुंबे पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहण्यास जाण्याची मागणी करू लागले आहेत. ३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर डोंगर कोसळून ४४ कुटुंबांतील १५१ लोक मृत्युमुखी पडले. रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साचून डोंगराचा कडा कोसळला. यातून नशिबाने बचावलेल्या ग्रामस्थांचे नवीन माळीण वसून कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आले आहे. यातील ६७ घरांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व इतर मान्यवरांच्या हस्ते झाला. परंतु पहिल्याच पावसात या गावाची दयनीय अवस्था झाली आहे. दि. २४ रोजी झालेल्या संततधार पावसाने अनेक घरांचे भराव खचले, रस्त्यांना तडे गेले. भिंतींना तडे गेले, घरांच्या पायऱ्या खचल्या, ड्रेनेजच्या पाइपलाइन उखडल्या आहेत. गटारांचे चेंबर खचले आहेत. तसेच अंगणवाडीजवळील मोठी भिंत तुटल्याने शाळेला मोठा धोका निर्माण झाला आहे. शाळेमागील भराव वाहून आल्यामुळे व बाजूच्या भिंतीला तडे गेल्याने तेथे शाळा भरविता येणार नाही. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या आरसीसी भिंती घरांवर पडल्या तर गावावर मोठे संकट येऊ शकते. यासाठी काही लोक पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहायला जायची मागणी करू लागले आहेत. सुमारे ८-१० कुटुंबांनी तेथून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ही परिस्थिती समजल्यानंतर तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार विजय केंगले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.