शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

माळीण अद्याप पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 29, 2015 23:43 IST

निसर्गाच्या कोपाने जगाच्या पाठीवरुन पुसल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला सहा महिने झाले असतानाही या गावाच्या पूनर्वसनाचा तिढा अद्याप कायम

निलेश काण्णव, घोडेगावनिसर्गाच्या कोपाने जगाच्या पाठीवरुन पुसल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला सहा महिने झाले असतानाही या गावाच्या पूनर्वसनाचा तिढा अद्याप कायम आहे़ प्रशासनाच्या वतीने पर्यायी जागेच्या शोधाचा प्रयत्न सुरु आहे़ ग्रामस्थांचे प्रशासनाला आवश्यक तेवढे सहकार्य न मिळाल्याने जागेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही़.दुर्घटना ३० जुलै रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली. यामध्ये १५१ लोक दगावले. या दुर्घटनेला सहा महिने पूर्ण होत आहेत. बचावलेले माळीण ग्रामस्थ धक्क्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थांना सावरण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. शासनाने ११ कोटी २८ लाख रुपयांचे वाटप आत्तापर्यंत केले आहे. तसेच, ४० तात्पुरती निवारा शेड बांधून दिली आहेत; मात्र कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या ८ एकर जागेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रशासन सुरुवातीपासून खूप प्रयत्न करीत आहे. मुळात माळीण गाव व त्याचा परिसर पाहिला असता, सर्व उंच डोंगराळ भाग आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठी सपाटीची, सुरक्षित व लोकांच्या सोईची जागा मिळणे अवघड. तसेच, माळीणचे पुनर्वसन केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा असे घडू नये. यासाठी जीएसआयला जागा दाखवून त्यांची मान्यता घेणे महत्त्वाचे. पुणे, मुंबई शहरांमध्ये राहणाऱ्या माळीण ग्रामस्थांनी सुरुवातीला पेठ, मंचर, घोडेगाव, डिंभे अशा ठिकाणी पुनर्वसन व्हावे, अशी मागणी केली होती, तर माळीणमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आम्हाला येथेच जवळपास पुनर्वसन करून द्या, अशी अग्रही भूमिका ठेवली. त्यामुळे प्रशासनाने माळीणच्या जवळपास जागेचा शोध सुरू केला.माळीणचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी सप्टेंबर २०१४ मध्ये झांजरेवाडी, कोकणेवाडी व अडिवरे या तीन जागा पाहण्यात आल्या. यापैकी झांजरेवाडी व कोकणेवाडी जागेला जागा मालकांनी संमती दिली, तर अडिवरेची जागा देण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. झांजरेवाडी जागेला जीएसआयने मान्यता दिली, तर कोकणेवाडीची जागा लांब असल्याने माळीण ग्रामस्थांनी या जागेला नकार दिला. दरम्यान, अडिवरे ग्रामस्थांशी पुन्हा बोलणी करण्यात आली; मात्र त्यांनी कडक शब्दांत जागा देण्यास विरोध केला. त्यामुळे प्रशासनाने झांजरेवाडीमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला.