शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया होणार नाही रद्द; मराठा आरक्षण स्थगितीनंतर काढलेले परिपत्रक मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 07:28 IST

शैक्षणिक संस्थांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणाशिवाय राबवावी, असे परिपत्रक उच्च शिक्षण संचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आले होते.

पुणे : राज्यातील उच्च शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. मराठा आरक्षण स्थगित झाल्याने महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रियाच रद्द करण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी दिले होते. परंतु, दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे परिपत्रक मागे घेतले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी महाविद्यालयांची मात्र धावपळ उडाली होती.शैक्षणिक संस्थांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणाशिवाय राबवावी, असे परिपत्रक उच्च शिक्षण संचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आले होते. यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच नव्याने राबवावी लागणार होती.मात्र, त्यामुळे होणारा संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन शुक्रवारी काढण्यात आलेले परिपत्रक शनिवारी रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना नव्याने पुन्हा प्रवेश घ्यावे लागणार नाहीत.राज्य शासनाने विधि व न्याय विभागाकडून अभिप्राय मागविला. त्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही. परंतु, महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमध्ये एसईबीसी आरक्षणासह प्रवेश प्रक्रिया राबविली असल्यास ती पुन्हा एसईबीसी आरक्षणाशिवाय राबवा, असे नमूद करण्यात आलेहोते. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी महाविद्यालयांनी पूर्ण केलेली वसध्या सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने राबवावी लागणार होती.परंतु, शासनाने व शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळाला आहे. अन्यथा प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने पुन्हा सगळी प्रक्रियाकरावी लागली असती. त्यासाठी महाविद्यालयांवरही ताण आला असता.

...अन्यथा मराठा समाजात उद्रेक होईलराज्य सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि नोकरीतील नुकसान होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. अन्यथा मराठा समाजातील उद्रेकाचा भडका उडू शकतो. हे टाळण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. तसेच विधिमंडळात मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, अशी मागणी संभाजी बिग्रेडने पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, अध्यक्ष संतोष शिंदे आदी उपस्थित होते. समाजातील कोणीही हिंसा करू नये, जीवावर बेतेल असे चुकीचे पाऊल टाकू नये, असेही आवाहन संघटनेने केले आहे.

टॅग्स :examपरीक्षा