शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
2
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
3
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
4
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
5
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
6
125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
7
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला
8
३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड?
9
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
10
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
11
“गणेश नाईक कसलेले पैलवान, अंतिम तेच विजयी होतील, शिंदे हे...”; संजय राऊतांचा मोठा दावा
12
AUS vs IND ODI Series Launch Event: 'जानी दुश्मन'सोबत गप्पा मारल्या; मग ते फोटो काढायला गेले, पण... (VIDEO)
13
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला का आणि कसे करावे यमदीपदान? अकाली मृत्यू खरंच टळतो का?
14
पराभवाच्या भीतीमुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव; भाजपाची बोचरी टीका
15
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
16
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' वस्तूंची खरेदी करेल मोठे नुकसान; ऐन दिवाळीत होईल पश्चात्ताप!
17
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ट्रॅव्हिस हेडचं मोठं वक्तव्य, रोहित-विराटबद्दल म्हणाला...
18
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खूश; म्हणाले- "अंगावर काटा आला..."
19
'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अ‍ॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
20
टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी

पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया होणार नाही रद्द; मराठा आरक्षण स्थगितीनंतर काढलेले परिपत्रक मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 07:28 IST

शैक्षणिक संस्थांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणाशिवाय राबवावी, असे परिपत्रक उच्च शिक्षण संचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आले होते.

पुणे : राज्यातील उच्च शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. मराठा आरक्षण स्थगित झाल्याने महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रियाच रद्द करण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी दिले होते. परंतु, दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे परिपत्रक मागे घेतले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी महाविद्यालयांची मात्र धावपळ उडाली होती.शैक्षणिक संस्थांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणाशिवाय राबवावी, असे परिपत्रक उच्च शिक्षण संचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आले होते. यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच नव्याने राबवावी लागणार होती.मात्र, त्यामुळे होणारा संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन शुक्रवारी काढण्यात आलेले परिपत्रक शनिवारी रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना नव्याने पुन्हा प्रवेश घ्यावे लागणार नाहीत.राज्य शासनाने विधि व न्याय विभागाकडून अभिप्राय मागविला. त्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही. परंतु, महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमध्ये एसईबीसी आरक्षणासह प्रवेश प्रक्रिया राबविली असल्यास ती पुन्हा एसईबीसी आरक्षणाशिवाय राबवा, असे नमूद करण्यात आलेहोते. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी महाविद्यालयांनी पूर्ण केलेली वसध्या सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने राबवावी लागणार होती.परंतु, शासनाने व शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळाला आहे. अन्यथा प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने पुन्हा सगळी प्रक्रियाकरावी लागली असती. त्यासाठी महाविद्यालयांवरही ताण आला असता.

...अन्यथा मराठा समाजात उद्रेक होईलराज्य सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि नोकरीतील नुकसान होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. अन्यथा मराठा समाजातील उद्रेकाचा भडका उडू शकतो. हे टाळण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. तसेच विधिमंडळात मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, अशी मागणी संभाजी बिग्रेडने पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, अध्यक्ष संतोष शिंदे आदी उपस्थित होते. समाजातील कोणीही हिंसा करू नये, जीवावर बेतेल असे चुकीचे पाऊल टाकू नये, असेही आवाहन संघटनेने केले आहे.

टॅग्स :examपरीक्षा