शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

गरोदरपणातील आहाराची पहिली पायरी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST

- डॉ. गिरिजा वाघ राष्ट्रीय आहार सप्ताहा प्रीत्यर्थआहार हा नुसताच भूक शमविण्यासाठी नसून आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्यासाठी अतिमहत्त्वाचा असा मूलभूत ...

- डॉ. गिरिजा वाघ

राष्ट्रीय आहार सप्ताहा प्रीत्यर्थआहार हा नुसताच भूक शमविण्यासाठी नसून आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्यासाठी अतिमहत्त्वाचा असा मूलभूत घटक आहे. गरोदर अवस्थेत आहाराचे एक विशेष महत्त्व आहे. याचे कारण की, गरोदरपण ही एक गतिशील स्थिती आहे. जिथे ऊर्जेची आवश्यकता अफाट असते. शिवाय, आहारात अशा काही गोष्टींचा समाविष्ट असणे गरजेचे असते की, ज्याने गर्भाचे कुपोषण होता कामा नये, तसेच मातेचे आरोग्य टिकून राहणे गरजेचे आहे.

सध्याच्या काळात स्थूलपणा, रक्तदाब, थायरॉईड व्याधी आणि हृदयरोग अशा आजारांचे वाढते प्रमाण हे आहाराशी नक्कीच निगडित आहे. नुसताच मातेचाच नव्हे तर गर्भाचे पण संस्करण आईच्या आहारावर अवलंबून असते. फर्स्ट 1000 days असा एक नवीन उपक्रम सध्या बराच चर्चेत आहे. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा हा देशभर राष्ट्रीय आहार सप्ताह म्हणून मानला जातो त्या निमित्ताने गरोदर मातेचा आहार, विहार आणि फर्स्ट 1000days ह्या उपक्रमाबद्दल लिहिण्याची इच्छा झाली. आरोग्य सप्ताहाच्या प्रयोजनच मुळी प्रबोधन आणि माहिती असेच असल्याने हे मला योग्य वाटते. गरोदर मातेच्या आहाराला पहिले गालबोट लागते म्हणजे सुरुवातीच्या काळात अनुभवयास येणारी मळमळ आणि वांती. खरतर हा काळ पूरक, समतोल आणि पोषक असणे फार गरजेचे असते. कारण या काळात गर्भाच्या प्रारंभिक अवस्थेत शरीरातील सर्व संस्थांची स्थापना होत असते त्याच बरोबर वारेचे रोपण हे झपाट्याने होत असते. ह्या अंतर्गत घटना घडत असताना आईच्या शरीरामध्ये HCG, progesterone तसेच estrogen नामक संप्रेरकांची पातळी वाढते. ह्या होणाऱ्या अंतर्गत बदलांना अंगवळणी पाडणे गरजेचे असते.

बऱ्याच वेळा सर्वप्रथम भीती आणि काळजी यानेच महिला ग्रासलेल्या दिसतात. शिवाय, नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आहार आणि विश्रांती ह्या दोन्हींचा अभाव दिसतो ज्याची कारणे अनेक असू शकतात. पण थोडेसे स्वतःकडे लक्ष केंद्रित केल्यावर ह्या लक्षणांवर मात मिळवता येते. सरासरी ६० ते ७० टक्के स्त्रियांना मळमळ अनुभवास येते, तर १-२ टक्के अतिप्रमाणात वांत्याना सामोरे जातात आणि हतबल होताना दिसतात. नुसत्याच मळमळ असणाऱ्या स्थितीला NVP म्हणजे nausea vomitting of pregnancy असे म्हणतात तर अतिप्रमाणात होणाऱ्या वांत्यानच्या स्तितीला HG. म्हणजे Hyperemesis Gravidarum असे म्हटले जाते. काहीजणी वास नीट येत नाही किवा वास येतो म्हणून खावेसे वाटत नाही असे सांगतात. किती प्रमाणात त्रास आहे ह्याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले जाते आणि त्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना केल्या जातात. काही इतरत्र कारणे पण असू शकतात उदा: अगोदरची पित्त प्रवृत्ती, निकस (junk) आहाराचे सेवन, अति प्रमाणात उपस्माराचा कालावधी, मसालेदार आहार.

काही रक्त तपासण्या करणे गरजेचे असते ज्याने स्त्रीची आरोग्यस्थिती पडतळता येते. गरज भासल्यास शिरेतून इंजेक्शन किंवा दवाखण्यात भरती करावी लागू शकते. काही सुरक्षित आशी औषधे सुध्दा उपयुक्त ठरतात, पण ही योग्य मार्गदर्शनाने घेतलेली बरी.

खालील उपाययोजना उपयुक्त ठरू शकतील

1. सर्वप्रथम मनातील भीती आणि काळजी काढून टाका आणि आत्मविश्वासाने गरोदरपण स्वीकारा.

2. समतोल आहार साधने गरजेचे आहे : भरपूर प्रमाणात भाज्या, फळभाज्या, नट्स, दाणे, कसदार आहार घ्या.

3. किमान 3 वेळा पूरक आहार घ्या. सर्व प्रकारची भारतीय आहार पद्धती ही पूरक मानली जाते

4.मधल्या काळातील नाश्ता हा पौष्टिक असावा. उदा: चिक्की, लाडू , वड्या, सलाड्स, दही, ढोकळा ,सूप ,फळे ई.

5. दुधाचे सेवन करा, पचत नसल्यास दुग्धजन्य पदार्थ घ्या

6. उपवास टाळा

7. चहा, कॉफी याचे अतिसेवन नको

काही घरगुती उपाय आपण बघू या

: आले आणि मध, आलेपाक, मधपाणी, कोकम, आवळा, कोरडे पदार्थ, वारंवार थोडा काहीतरी पौष्टिक घेतल्याने NVP आपण नियंत्रित करू शकतो.

फर्स्ट 1000 डेझ..असे निदर्शनास आले आहे की गर्भावस्थेतील आईच्या उदरातील कालावधी (२७० दिवस), स्तनपान संस्कारित कालावधी (३६५ दिवस)आणि आयुष्याचे दुसरे वर्ष (३६५ दिवस) म्हणजेच गर्भधारणा पासून ते दोन वर्षांचा असा 1000 days चा आयुष्याच्या सुरुवातीचा कालावधी हा भावी आयुष्यातील आरोग्य स्थितीचा पाया आहे आणि त्याचमुळे मातेचा आहार जपणे हे अतिमहत्वाच्या आहे.

ह्या काळात आहार, सुरक्षा, व्यायाम, प्रेम, वातावरण ह्या पाच मूलभूत तत्त्वांचा योग्य उपाययोजना केल्यास पुढील जीवनासाठी निर्णायक असे बदल घडवून आणता येऊ शकतील. Journey of First 1000 days हा जीवनक्रम हा पुढच्या पिढ्यांचा आरोग्य नकाशा आहे. याउपर जर गरोदरपणाला सामोरे जाण्यापूर्वी जर स्त्रीने योग्य आरोग्य बांधणी केली उदा: लसीकरण, वजन नियंत्रण, पूरक तत्त्वांचे सेवन, शारीरिक स्वास्थ्य, व्याधी असतील तर त्यांचे वैद्यकीय नियंत्रण असे जर साधले तर खरेच सोने पे सुहागा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असावा ज्याने चित्तवृत्ती समतोल राहतात आणि त्या करता विचारांचा ढाचा महत्त्वाचा आहे. जागरूकपणे आपल्या गरोदर अवस्थेकडे एका सुंदर जबाबदारीच्या दृष्टीने बघा. आपल्या बाळासाठी आपले स्वतःचे आरोग्य वृद्धिंगत करणे आणि बाळाला सातत्याने पोषक तत्त्वांचा स्रोत उपलब्ध करणे हे मातेचे महत्त्वाचे कर्तव्य आहे आणि प्रत्येक मातेचे हे निरोगी समाजबांधणीसाठीचे योगदान आहे.