शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

गरोदरपणातील आहाराची पहिली पायरी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST

- डॉ. गिरिजा वाघ राष्ट्रीय आहार सप्ताहा प्रीत्यर्थआहार हा नुसताच भूक शमविण्यासाठी नसून आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्यासाठी अतिमहत्त्वाचा असा मूलभूत ...

- डॉ. गिरिजा वाघ

राष्ट्रीय आहार सप्ताहा प्रीत्यर्थआहार हा नुसताच भूक शमविण्यासाठी नसून आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्यासाठी अतिमहत्त्वाचा असा मूलभूत घटक आहे. गरोदर अवस्थेत आहाराचे एक विशेष महत्त्व आहे. याचे कारण की, गरोदरपण ही एक गतिशील स्थिती आहे. जिथे ऊर्जेची आवश्यकता अफाट असते. शिवाय, आहारात अशा काही गोष्टींचा समाविष्ट असणे गरजेचे असते की, ज्याने गर्भाचे कुपोषण होता कामा नये, तसेच मातेचे आरोग्य टिकून राहणे गरजेचे आहे.

सध्याच्या काळात स्थूलपणा, रक्तदाब, थायरॉईड व्याधी आणि हृदयरोग अशा आजारांचे वाढते प्रमाण हे आहाराशी नक्कीच निगडित आहे. नुसताच मातेचाच नव्हे तर गर्भाचे पण संस्करण आईच्या आहारावर अवलंबून असते. फर्स्ट 1000 days असा एक नवीन उपक्रम सध्या बराच चर्चेत आहे. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा हा देशभर राष्ट्रीय आहार सप्ताह म्हणून मानला जातो त्या निमित्ताने गरोदर मातेचा आहार, विहार आणि फर्स्ट 1000days ह्या उपक्रमाबद्दल लिहिण्याची इच्छा झाली. आरोग्य सप्ताहाच्या प्रयोजनच मुळी प्रबोधन आणि माहिती असेच असल्याने हे मला योग्य वाटते. गरोदर मातेच्या आहाराला पहिले गालबोट लागते म्हणजे सुरुवातीच्या काळात अनुभवयास येणारी मळमळ आणि वांती. खरतर हा काळ पूरक, समतोल आणि पोषक असणे फार गरजेचे असते. कारण या काळात गर्भाच्या प्रारंभिक अवस्थेत शरीरातील सर्व संस्थांची स्थापना होत असते त्याच बरोबर वारेचे रोपण हे झपाट्याने होत असते. ह्या अंतर्गत घटना घडत असताना आईच्या शरीरामध्ये HCG, progesterone तसेच estrogen नामक संप्रेरकांची पातळी वाढते. ह्या होणाऱ्या अंतर्गत बदलांना अंगवळणी पाडणे गरजेचे असते.

बऱ्याच वेळा सर्वप्रथम भीती आणि काळजी यानेच महिला ग्रासलेल्या दिसतात. शिवाय, नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आहार आणि विश्रांती ह्या दोन्हींचा अभाव दिसतो ज्याची कारणे अनेक असू शकतात. पण थोडेसे स्वतःकडे लक्ष केंद्रित केल्यावर ह्या लक्षणांवर मात मिळवता येते. सरासरी ६० ते ७० टक्के स्त्रियांना मळमळ अनुभवास येते, तर १-२ टक्के अतिप्रमाणात वांत्याना सामोरे जातात आणि हतबल होताना दिसतात. नुसत्याच मळमळ असणाऱ्या स्थितीला NVP म्हणजे nausea vomitting of pregnancy असे म्हणतात तर अतिप्रमाणात होणाऱ्या वांत्यानच्या स्तितीला HG. म्हणजे Hyperemesis Gravidarum असे म्हटले जाते. काहीजणी वास नीट येत नाही किवा वास येतो म्हणून खावेसे वाटत नाही असे सांगतात. किती प्रमाणात त्रास आहे ह्याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले जाते आणि त्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना केल्या जातात. काही इतरत्र कारणे पण असू शकतात उदा: अगोदरची पित्त प्रवृत्ती, निकस (junk) आहाराचे सेवन, अति प्रमाणात उपस्माराचा कालावधी, मसालेदार आहार.

काही रक्त तपासण्या करणे गरजेचे असते ज्याने स्त्रीची आरोग्यस्थिती पडतळता येते. गरज भासल्यास शिरेतून इंजेक्शन किंवा दवाखण्यात भरती करावी लागू शकते. काही सुरक्षित आशी औषधे सुध्दा उपयुक्त ठरतात, पण ही योग्य मार्गदर्शनाने घेतलेली बरी.

खालील उपाययोजना उपयुक्त ठरू शकतील

1. सर्वप्रथम मनातील भीती आणि काळजी काढून टाका आणि आत्मविश्वासाने गरोदरपण स्वीकारा.

2. समतोल आहार साधने गरजेचे आहे : भरपूर प्रमाणात भाज्या, फळभाज्या, नट्स, दाणे, कसदार आहार घ्या.

3. किमान 3 वेळा पूरक आहार घ्या. सर्व प्रकारची भारतीय आहार पद्धती ही पूरक मानली जाते

4.मधल्या काळातील नाश्ता हा पौष्टिक असावा. उदा: चिक्की, लाडू , वड्या, सलाड्स, दही, ढोकळा ,सूप ,फळे ई.

5. दुधाचे सेवन करा, पचत नसल्यास दुग्धजन्य पदार्थ घ्या

6. उपवास टाळा

7. चहा, कॉफी याचे अतिसेवन नको

काही घरगुती उपाय आपण बघू या

: आले आणि मध, आलेपाक, मधपाणी, कोकम, आवळा, कोरडे पदार्थ, वारंवार थोडा काहीतरी पौष्टिक घेतल्याने NVP आपण नियंत्रित करू शकतो.

फर्स्ट 1000 डेझ..असे निदर्शनास आले आहे की गर्भावस्थेतील आईच्या उदरातील कालावधी (२७० दिवस), स्तनपान संस्कारित कालावधी (३६५ दिवस)आणि आयुष्याचे दुसरे वर्ष (३६५ दिवस) म्हणजेच गर्भधारणा पासून ते दोन वर्षांचा असा 1000 days चा आयुष्याच्या सुरुवातीचा कालावधी हा भावी आयुष्यातील आरोग्य स्थितीचा पाया आहे आणि त्याचमुळे मातेचा आहार जपणे हे अतिमहत्वाच्या आहे.

ह्या काळात आहार, सुरक्षा, व्यायाम, प्रेम, वातावरण ह्या पाच मूलभूत तत्त्वांचा योग्य उपाययोजना केल्यास पुढील जीवनासाठी निर्णायक असे बदल घडवून आणता येऊ शकतील. Journey of First 1000 days हा जीवनक्रम हा पुढच्या पिढ्यांचा आरोग्य नकाशा आहे. याउपर जर गरोदरपणाला सामोरे जाण्यापूर्वी जर स्त्रीने योग्य आरोग्य बांधणी केली उदा: लसीकरण, वजन नियंत्रण, पूरक तत्त्वांचे सेवन, शारीरिक स्वास्थ्य, व्याधी असतील तर त्यांचे वैद्यकीय नियंत्रण असे जर साधले तर खरेच सोने पे सुहागा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असावा ज्याने चित्तवृत्ती समतोल राहतात आणि त्या करता विचारांचा ढाचा महत्त्वाचा आहे. जागरूकपणे आपल्या गरोदर अवस्थेकडे एका सुंदर जबाबदारीच्या दृष्टीने बघा. आपल्या बाळासाठी आपले स्वतःचे आरोग्य वृद्धिंगत करणे आणि बाळाला सातत्याने पोषक तत्त्वांचा स्रोत उपलब्ध करणे हे मातेचे महत्त्वाचे कर्तव्य आहे आणि प्रत्येक मातेचे हे निरोगी समाजबांधणीसाठीचे योगदान आहे.