शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

केंजळ गाव होणार पहिले सौरग्राम!

By admin | Updated: August 29, 2016 03:24 IST

‘आमचा गाव-आमचा विकास’ योजनेअंतर्गत केंजळ येथे आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी संपूर्ण गावच सौरग्राम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच अविनाश जाधव यांनी सांगितले.

भोर : ‘आमचा गाव-आमचा विकास’ योजनेअंतर्गत केंजळ येथे आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी संपूर्ण गावच सौरग्राम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच अविनाश जाधव यांनी सांगितले.केंजळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत वीज वितरण कंपनीची वीज न वापरता सौरऊर्जेवर निर्माण होणारी वीज वापरली जाते. त्यासाठी नेट मीटरची परवानगी मिळाली आहे. यापुढे ग्रामपंचायत कार्यालय, गावातील स्ट्रीट लाइट व गावातील पाणीपुरवठा करणारे पंपसेट यांच्यासाठीदेखील सौरऊर्जा वापरली जाणार आहे. त्यासाठी गावातील सार्वजनिक ऊर्जेस पर्याय म्हणून सौर पॉवर प्लान्ट उभारण्यात येणार आहे. दिवसा सौरऊर्जा निर्माण करून नेट मीटरद्वारे एमएसइबीला देऊन त्याबदल्यात रात्री स्ट्रीट लाइटसाठी विजेचा वापर केला जाणार आहे. या कामासाठी जिल्हा परिषद निधी अथवा जिल्हा परिषदेकडून कर्ज घेतले जाणार असून केंजळ हे तालुक्यातील पहिले सौरग्राम होणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी सांगितले.या वेळी ग्रामसभेत गावातील ११ ग्रामस्थांनी वैयक्तिक आपल्या घरांवर सौर पॉवर पॅक बसविण्याची तयारी दर्शवली आहे. लोकांच्या मागणीनुसार भविष्यात कौलारू घरांवरही कमी वजनाचे सौर पॉवर पॅक बसवले जाणार असल्याचे ग्रामसेवक एम. व्ही. लेंडवे यांनी सांगितले. (वार्ताहर)