शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

केंजळ गाव होणार पहिले सौरग्राम!

By admin | Updated: August 29, 2016 03:24 IST

‘आमचा गाव-आमचा विकास’ योजनेअंतर्गत केंजळ येथे आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी संपूर्ण गावच सौरग्राम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच अविनाश जाधव यांनी सांगितले.

भोर : ‘आमचा गाव-आमचा विकास’ योजनेअंतर्गत केंजळ येथे आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी संपूर्ण गावच सौरग्राम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच अविनाश जाधव यांनी सांगितले.केंजळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत वीज वितरण कंपनीची वीज न वापरता सौरऊर्जेवर निर्माण होणारी वीज वापरली जाते. त्यासाठी नेट मीटरची परवानगी मिळाली आहे. यापुढे ग्रामपंचायत कार्यालय, गावातील स्ट्रीट लाइट व गावातील पाणीपुरवठा करणारे पंपसेट यांच्यासाठीदेखील सौरऊर्जा वापरली जाणार आहे. त्यासाठी गावातील सार्वजनिक ऊर्जेस पर्याय म्हणून सौर पॉवर प्लान्ट उभारण्यात येणार आहे. दिवसा सौरऊर्जा निर्माण करून नेट मीटरद्वारे एमएसइबीला देऊन त्याबदल्यात रात्री स्ट्रीट लाइटसाठी विजेचा वापर केला जाणार आहे. या कामासाठी जिल्हा परिषद निधी अथवा जिल्हा परिषदेकडून कर्ज घेतले जाणार असून केंजळ हे तालुक्यातील पहिले सौरग्राम होणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी सांगितले.या वेळी ग्रामसभेत गावातील ११ ग्रामस्थांनी वैयक्तिक आपल्या घरांवर सौर पॉवर पॅक बसविण्याची तयारी दर्शवली आहे. लोकांच्या मागणीनुसार भविष्यात कौलारू घरांवरही कमी वजनाचे सौर पॉवर पॅक बसवले जाणार असल्याचे ग्रामसेवक एम. व्ही. लेंडवे यांनी सांगितले. (वार्ताहर)