शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

मंगलाष्टकांनंतर होतेय फटाक्यांची आतषबाजी

By admin | Updated: November 15, 2016 02:54 IST

घरासमोरील अंगण आणि त्यातील तुळशी वृंदावन नाहीसे झाले असले, तरीही किवळे-विकासनगर व रावेत भागात फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणाऱ्या मंडळींनी

देहूरोड : घरासमोरील अंगण आणि त्यातील तुळशी वृंदावन नाहीसे झाले असले, तरीही किवळे-विकासनगर व रावेत भागात फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणाऱ्या मंडळींनी आजही तुळशीविवाहाची परंपरा जपली आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या ग्रामीण भागातील चिंचोली, किन्हई, शेलारवाडी व मामुर्डी भागात अद्यापही बहुतांश घरांपुढे तुळशी वृंदावन असल्याने साग्रसंगीत तुळशीविवाह लावण्यात येत असल्याचे चित्र दिसून आले. ‘तदैव लग्नम्...’ असे शब्द कानावर पडताक्षणी चिमुकल्यांनी आपल्याजवळील फटाके वाजविण्याचा आनंद घेतला.रावेत, किवळे व विकासनगर भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असतानाही तुळशीविवाहासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. ठिकठिकाणी तुळशी नवरीच्या थाटात नटविल्या होत्या. मोठ्या अंगणातल्या वृंदावनाची सर छोटेखानी कुंडीतल्या तुळशीला नसली, तरीही या कुंड्यांना गेरू लावून तुळशीविवाहाची तयारी करण्यात आली होती. ऊस, बोरे, चिंचा अशा खट्ट्या-मिठ्ठ्यांना या विवाहामध्ये महत्त्वाचे स्थान असते. ग्रामीण भागात रांगोळीने सजलेल्या अंगणात व सदनिकेच्यासमोर गॅलरीत फुलांच्या तोरणमाळा व रोषणाई केलेल्या प्रसन्न वातावरणामध्ये ‘आली घटिका समीप’चे सूर आळवले गेले. ठिकठिकाणच्या सोसायट्या, वाडे व वस्त्यांमध्येही तुलसीविवाह उत्साहात लावण्यात आले. पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा झाल्यानंतर उपस्थित महिलांनी तुळशीचे दर्शन घेतले. विष्णूला जिंकण्यासाठी वृंदेने तुळशीरूप घेऊन केलेल्या विवाहाचे स्मरण म्हणून तुळशीविवाह साजरा करण्यात येतो. त्यातील आध्यात्मिक अर्थाचा अधिक व्यापक अर्थाने विचार केल्यास तुळस ही आरोग्यासाठी संजीवनी ठरते, ती सदाबहार असते, तिचे चैतन्य नटलेल्या नव्या नवरीसारखे घरादारावर राहावे, असा उदात्त विचार त्यामागे असतो. तुळशीविवाहासाठी परिसरातील बहुतांश घरांसमोर, तसेच वृंदावनाभोवती रांगोळी काढण्यात आली होती. आंतरपाट, अक्षता आणल्यानंतर हा सोहळा घरांसमोर सुरू झाला. याविषयी उत्सुकता असलेल्या बालगोपाळांनी या वेळी गर्दी केली होती. (वार्ताहर)