शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

आगप्रतिबंधक सुविधा कागदावरच

By admin | Updated: November 11, 2016 01:58 IST

महापालिकेने शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा बसविण्यासाठी काढलेली निविदा वर्ष होत आले तरी अद्याप कागदावरच आहे.

पुणे : महापालिकेने शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा बसविण्यासाठी काढलेली निविदा वर्ष होत आले तरी अद्याप कागदावरच आहे. कोल्हापूर येथे एका शाळेला नुकत्याच लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासनाची ही बेपर्वा वृत्ती दिसत आहे. लाखभर विद्यार्थ्यांची सुरक्षितता त्यामुळे धोक्यात आहे. राज्य सरकारने प्रत्येक शाळेत आग प्रतिबंधक उपकरणे असणे काही वर्षांपूर्वी बंधनकारक केले आहे. त्याचाच आधार घेत सुमारे ३ वर्षांपूर्वी महापालिकेने शिक्षण मंडळाच्या शाळांसाठी आगप्रतिबंधक उपकरणे खरेदी करण्याची निविदा काढली. आग विझवताना वापरण्याचे सिलिंडर त्यात खरेदी केले गेले. काही शाळांमधील शिक्षक व काही विद्यार्थ्यांना पालिकेच्या अग्निशामक विभागाच्या वतीने ही उपकरणे कशी वापरायची याचे प्रशिक्षणही दिले गेले. विशिष्ट मुदतीत ही सिलिंडर्स वापरली गेली नाहीत तर निकामी होतात. त्यामुळेच दरवेळी असा खर्च करण्याऐवजी पाण्याची टाकी, बुस्टर पंप, मोठा पाईप, त्याला नोझल अशी हायड्र्ंट यंत्रणा (आग लागलीच तर त्यावर या यंत्रणेचा वापर करून लगेचच पाण्याचा मारा करता येतो.) प्रत्येक शाळेत बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अंदाजपत्रकात २ कोटी ३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. महापालिका शिक्षण मंडळाने त्यातील ६६ लाख रुपये द्यायचे असेही ठरले. ते वर्गीकरण व्हायच्या आतच निविदा काढण्यात आली. या निविदेला काही कंपन्यांचा प्रतिसादही मिळाला. नियमाप्रमाणे त्यातील कमी किंमत दर्शविलेल्या कंपनीला हे काम देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र या प्रक्रियेला आता वर्ष होत आले तरीही पुढे काहीच झालेले नाही. सुरुवीताला १२० इमारतींमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार होती. दरम्यान, पालिकेच्या शाळांमध्ये बसविलेले आगप्रतिबंधक सिलिंडर्स त्यांची मुदत संपल्यामुळे काही ठिकाणी निकामे झाले आहेत. अनेक शाळांमध्ये असे सिलिंडर्स ठेवण्यासाठी जागाही नव्हती. त्यामुळे अशा शाळांनी ते ठेवलेच नाहीत. ज्यांनी ते ठेवले त्यांनी नंतर कधी त्याकडे पाहिलेच नाही. त्यामुळे त्यांची मुदत संपून गेली तरीही ते जागेवरच आहेत. सिलिंडर्स बदलावेत असे कोणालाही वाटले नाही. ज्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले ते आता शाळेतही नाहीत.