शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

अग्निशामक दलालाच तांत्रिक अडचणींची झळ

By admin | Updated: March 30, 2016 02:17 IST

शहराचा विस्तार वेगाने होत असताना अग्निशामक दलाच्या सक्षमीकरणाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. दलात महत्त्वाचा घटक असलेल्या यंत्रचालकांचा तुटवडा जाणवत असल्याची

पुणे : शहराचा विस्तार वेगाने होत असताना अग्निशामक दलाच्या सक्षमीकरणाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. दलात महत्त्वाचा घटक असलेल्या यंत्रचालकांचा तुटवडा जाणवत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यंत्रचालकांची तब्बल २४ पदे रिक्त असून, वारंवार पाठपुरावा करूनही तांत्रिक अडचणींमुळे ती भरण्यास विलंब होत आहे. आग लागल्याची माहिती मिळूनही चालक नसल्याने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी वेळेत न पोहोचल्याची गंभीर घटना मंगळवारी घडली.सहकारनगर पोलीस ठाण्यासमोरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या बेवारस वाहनांना दुपारी आग लागली. याबाबची माहिती अग्निशामक दलाला कळविण्यात आली; मात्र सहकारनगरपासून जवळ असलेल्या कात्रज केंद्रात चालक नसल्याने भवानी पेठ केंद्रातून अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. यामध्ये बराच वेळ गेल्याने आग आटोक्यात आणण्यासही विलंब लागला. चालक नसल्याने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी लवकर पोहोचू शकत नाही, ही खूप गंभीर बाब आहे. अग्निशामक दलात यंत्रचालकाची एकूण ८१ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी २४ जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे.शहरात अग्निशामक दलाची १२ केंद्रे असून, एकूण २७ (फायर इंजिन) गाड्या आहेत. याशिवाय, इतर अत्याधुनिक वाहनेही दलाकडे आहेत. या प्रत्येक केंद्रावर अग्निशामक दलाची एक गाडी आहे, तर नियंत्रण कक्षामध्ये ८ गाड्या ठेवण्यात येतात. सर्व ठिकाणी ३ शिफ्टमध्ये चालकांची नियुक्ती करावी लागते. सध्या चालकांची पदे रिक्त असल्याने प्रत्येक गाडीसाठी प्रत्येक शिफ्टमध्ये एका चालकाची नेमणूक केली जाते. पण, विविध कारणांमुळे चालकाने सुटी घेतल्याने किंवा अन्य आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास चालकाअभावी या गाड्या केंद्रातच उभ्या ठेवाव्या लागत आहेत. मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. सहकारनगरमधील आग मोकळ्या जागेतील वाहनांना लागल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र, ही आग एखाद्या सोसायटीत लागली असती, तर अग्निशामक दलाची गाडी पोहोचण्यास विलंब झाल्याने विपरीत घटना घडण्याची शक्यता अधिक होती. शहराचा विस्तार वेगाने होत असताना आगीच्या घटनांमध्ये वाढ होणे साहजिक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.दोन वर्षांपासून यंत्रचालकांची पदे भरण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. चालकांसाठी पूर्वी सातवी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता होती. आता ही पात्रता दहावी उत्तीर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन पदे भरण्यात तसेच इतर काही प्रक्रिया पूर्ण करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने अडथळे येत आहेत. फायरमन किंवा इतर पदेही काही प्रमाणात रिक्त आहेत; पण चालकही खूप महत्त्वाचे असतात. चालक नसल्याने गाडी केंद्राबाहेर पडू शकत नाही; त्यामुळे गरज ओळखून तातडीने रिक्त पदे भरायला हवीत.- प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी