शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक दलालाच तांत्रिक अडचणींची झळ

By admin | Updated: March 30, 2016 02:17 IST

शहराचा विस्तार वेगाने होत असताना अग्निशामक दलाच्या सक्षमीकरणाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. दलात महत्त्वाचा घटक असलेल्या यंत्रचालकांचा तुटवडा जाणवत असल्याची

पुणे : शहराचा विस्तार वेगाने होत असताना अग्निशामक दलाच्या सक्षमीकरणाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. दलात महत्त्वाचा घटक असलेल्या यंत्रचालकांचा तुटवडा जाणवत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यंत्रचालकांची तब्बल २४ पदे रिक्त असून, वारंवार पाठपुरावा करूनही तांत्रिक अडचणींमुळे ती भरण्यास विलंब होत आहे. आग लागल्याची माहिती मिळूनही चालक नसल्याने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी वेळेत न पोहोचल्याची गंभीर घटना मंगळवारी घडली.सहकारनगर पोलीस ठाण्यासमोरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या बेवारस वाहनांना दुपारी आग लागली. याबाबची माहिती अग्निशामक दलाला कळविण्यात आली; मात्र सहकारनगरपासून जवळ असलेल्या कात्रज केंद्रात चालक नसल्याने भवानी पेठ केंद्रातून अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. यामध्ये बराच वेळ गेल्याने आग आटोक्यात आणण्यासही विलंब लागला. चालक नसल्याने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी लवकर पोहोचू शकत नाही, ही खूप गंभीर बाब आहे. अग्निशामक दलात यंत्रचालकाची एकूण ८१ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी २४ जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे.शहरात अग्निशामक दलाची १२ केंद्रे असून, एकूण २७ (फायर इंजिन) गाड्या आहेत. याशिवाय, इतर अत्याधुनिक वाहनेही दलाकडे आहेत. या प्रत्येक केंद्रावर अग्निशामक दलाची एक गाडी आहे, तर नियंत्रण कक्षामध्ये ८ गाड्या ठेवण्यात येतात. सर्व ठिकाणी ३ शिफ्टमध्ये चालकांची नियुक्ती करावी लागते. सध्या चालकांची पदे रिक्त असल्याने प्रत्येक गाडीसाठी प्रत्येक शिफ्टमध्ये एका चालकाची नेमणूक केली जाते. पण, विविध कारणांमुळे चालकाने सुटी घेतल्याने किंवा अन्य आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास चालकाअभावी या गाड्या केंद्रातच उभ्या ठेवाव्या लागत आहेत. मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. सहकारनगरमधील आग मोकळ्या जागेतील वाहनांना लागल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र, ही आग एखाद्या सोसायटीत लागली असती, तर अग्निशामक दलाची गाडी पोहोचण्यास विलंब झाल्याने विपरीत घटना घडण्याची शक्यता अधिक होती. शहराचा विस्तार वेगाने होत असताना आगीच्या घटनांमध्ये वाढ होणे साहजिक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.दोन वर्षांपासून यंत्रचालकांची पदे भरण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. चालकांसाठी पूर्वी सातवी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता होती. आता ही पात्रता दहावी उत्तीर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन पदे भरण्यात तसेच इतर काही प्रक्रिया पूर्ण करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने अडथळे येत आहेत. फायरमन किंवा इतर पदेही काही प्रमाणात रिक्त आहेत; पण चालकही खूप महत्त्वाचे असतात. चालक नसल्याने गाडी केंद्राबाहेर पडू शकत नाही; त्यामुळे गरज ओळखून तातडीने रिक्त पदे भरायला हवीत.- प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी