शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

नऱ्हेत शॉर्टसर्किटमुळे आग; 3 घरे भस्मसात

By admin | Updated: August 31, 2015 03:51 IST

भाटघर धरणाच्या काठावर असलेल्या नऱ्हे गावात शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन घरे जळाली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. आगीत घरातील धान्य,

भोर : भाटघर धरणाच्या काठावर असलेल्या नऱ्हे गावात शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन घरे जळाली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. आगीत घरातील धान्य, कपडे, किमती वस्तू तसेच रोख रक्कम असे एकूण १५ ते २० लाखांचे नुक सान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. नऱ्हे गावातील अंकुश लक्ष्मण वीर, नामदेव गणपती वीर व कुंडलिक धोंडिबा वीर या तिघा जणांची एकमेकांना लागून घरे आहेत. शनिवारी रात्री २ वाजता वीज गेली होती. ती पुन्हा परत आल्यावर शॉर्टसर्किट होऊन घराच्या माळ्यावरील गोवऱ्या जळाल्याने आग लागली. धुरामुळे घरातील लहान मुलाला व लहू वीर यांना जाग आली. त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. तातडीने घरामधील तसेच आजूबाजूच्या घरातील लोकांना बाहेर काढत त्यांनी गावकऱ्यांना आग विझवण्यासाठी मदत मागितली. मात्र, आग मोठी असल्याने घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या. सासवड व पुणे येथून दोन आगीचे बंब पहाटे साडेचार वाजता आले. तोपर्यंत चार खोल्या जळून खाक झाल्या होत्या. या घटनेत नामदेव वीर यांच्या घरात शेतीची कागदपत्रे, सोन्याचे गंठण, १० हजार रोख, ३ पोती गहू, २ पोती तांदूळ, ५ पोती शेंगा, पाण्याची मोटार, ४० साड्या व कपडे, किमती वस्तू असे ७ लाखांचे नुकसान झाले. अंकुश वीर व कुंडलिक वीर यांचे १० पोती तांदूळ, दोन पोती गहू, ४ खाटा, बॅरल, भांडी, कपडे, ५ हजार रोख, किमती वस्तू जळून सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले. तिघांचे मिळून एकूण १५ ते २० लाखांचे नुक सान झाले आहे. सर्व संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने नुकसानभरपाईची मागणी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांनी केली आहे. दरम्यान, नायब तहसीलदार धनंजय जाधव यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. महिला बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, माजी उपसभाती अमोल पांगारे यांनी गावात येऊन कुटुंबांची भेट घेऊन घराची पाहणी केली. (वार्ताहर)