शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

टेकडीवर प्लास्टिक टाकल्यास ५०० रूपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST

पुणे : म्हातोबा टेकडीवर गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्या उचलण्याचे काम काही नागरिक व लहान मुले करीत आहेत. या ...

पुणे : म्हातोबा टेकडीवर गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्या उचलण्याचे काम काही नागरिक व लहान मुले करीत आहेत. या पिशव्यांमुळे टेकडीवरील जैवविविधता नष्ट होत आहे. त्यामुळे टेकडीवर या पिशव्यांची बंदी करून जो कोणी ते टाकेल, त्यांना ५०० रूपये दंड करण्याचा विचार वन विभाग करत आहे. तसेच यासंबंधीचे फलकही लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

प्लास्टिक पिशव्या टेकडीवर पडल्याने त्या मातीत जाऊन ती खराब करत आहेत. त्या नष्ट होत नसल्याने तशाच पडून राहतात. म्हणून स्थानिक नागरिक आभा भागवत त्यांचा मुलगा तुहिन, ओजस हे येथील प्लास्टिक पिशव्या जमा करत आहेत. त्यांनी आतापर्यंत कितीतरी किलो प्लास्टिक संकलित केले आहे. याबाबत त्यांनी वन्यजीव मंडळाचे मानद सदस्य अनुज खरे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मग वन विभागाशी संपर्क साधून याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

या विषयी वन परीक्षेत्र अधिकारी दीपक म्हणाले,‘‘टेकडीवर प्लास्टिक पिशव्या टाकू नये म्हणून आम्ही ५०० रूपये दंड करण्याचा विचार करत आहोत. तसेचही प्लास्टिकवर बंदीच आहे. त्यामुळे टेकडीवरही कोणी प्लास्टिक टाकताना आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या विषयी टेकडीवर फलक लावण्याचाही विचार आहे.’’

टेकडीवर अनेक नागरिक प्लास्टिक पिशव्या टाकतात. त्या आम्ही संकलित करून संबंधित यंत्रणेला देत आहोत. आताही आम्ही प्लास्टिकच्या जाळ्या जमा केल्या आहेत. त्या खूप जास्त असून, वन विभागाकडून त्या हलविण्यात येणार आहेत. हे प्लास्टिक मातीत रूतत असल्याने येथील मातीही खराब होत आहे.

- आभा भागवत, स्थानिक नागरिक