शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी...

By admin | Updated: December 10, 2015 01:16 IST

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह या शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर यावर वर्षभर गुजराण करणारे बारा

रहाटणी : सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह या शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर यावर वर्षभर गुजराण करणारे बारा बलुतेदार गाव सोडून शहरात दाखल होत आहेत. मात्र, या ठिकाणीही त्यांना त्यांचे काम सोडून इतर कामे करावी लागत आहेत. पारंपरिक व्यवसाय ग्रामीण भागात चालत नसल्याने अनेक कारागीर शहराच्या वाटा धरल्या. परंतु, या ठिकाणीदेखील या कामाची वानवा असल्याने अनेकांना इतर व्यवसायांकडे वळावे लागत आहे. कालांतराने हे पारंपरिक व्यवसाय कालबाह्य होतात की काय, अशी शंका काही कारागीर व्यक्त करीत आहेत. उदरनिर्वाह चालविण्यासाठी अनेकांनी गाव सोडून इतरत्र भटकंती सुरू केली. मात्र, सर्वत्र हीच परिस्थिती असल्याने अनेकांनी शहर गाठले. मात्र, शहरात या व्यवसायांना थारा नसल्याने काहींना इतर कामे करावी लागत आहेत, तर काही जमेल तसे आपला व्यवसाय करताना दिसून येत आहेत. दिवसभर काम नाही मिळाले की, त्यांच्यावर अन्नासाठी भटकंती करण्याची वेळ येते. अनेक ठिकाणी हे लोक पैसे मागत हिंडत असतात. काही जण गावाकडे जाण्यासाठी पैसे द्या, अशी मागणी करत असतात. नेमके हे लोक शहरात कामासाठी येतात, पण त्यांना लवकर काम मिळत नाही. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे खंगल्याने शहरातही त्यांना कामासाठी भटकावे लागते.(वार्ताहर)